शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

सोलापूर जिल्ह्यातील शेतकºयांची कर्जमाफी प्रक्रिया ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 12:23 IST

ग्रीन लिस्टच येईना : जिल्हा बँकेचे ३० हजारांहून अधिक शेतकरी लटकले

ठळक मुद्दे३१ मे नंतर कर्जमाफीस पात्र यादी राज्यभरातच आलेली नाहीकर्जमाफी योजनेची प्रक्रिया तब्बल अडीच महिन्यांपासून ठप्प ९३ हजार शेतकºयांच्या कर्जमाफीचा निर्णय शासनाने घेतला

अरुण बारसकर 

सोलापूर : सोलापूरसह राज्यातील शेतकºयांसाठीची छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजनेची प्रक्रिया तब्बल अडीच महिन्यांपासून ठप्प झाली आहे. ३१ मे नंतर कर्जमाफीस पात्र यादी राज्यभरातच आलेली नाही. 

राज्य शासनाने जून २०१७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना जाहीर केली. मागील वर्षी जून-जुलैमध्ये कर्जमाफीसाठी अर्ज भरलेल्यांपैकी अनेक शेतकºयांची कर्जमाफी अद्याप झालेली नाही. राज्य शासनाने राज्यभरातील जिल्हा तसेच राष्टÑीयीकृत बँकांना  ३१ मे २०१८ पर्यंत ९ ग्रीन (पात्र) याद्या पाठविल्या आहेत. ३१ मे रोजी पाठविलेल्या याद्यातील पात्र शेतकºयांच्या खात्यावर रकमा जमा केल्याही आहेत, त्यानंतर  मात्र बँकेने पाठविलेल्या याद्या शासनाकडेच लटकल्या आहेत. एकट्या सोलापूर जिल्हा बँकेच्या एक लाख २४ हजार सभासद शेतकºयांनी कर्जमाफीसाठी अर्ज  भरले होते. त्यापैकी ९३ हजार शेतकºयांच्या कर्जमाफीचा निर्णय शासनाने घेतला असून, अन्य शेतकºयांच्या याद्या शासनाकडेच पेंडिंग आहेत. 

याशिवाय शासनाने त्यानंतर २००१ ते २००९ या कालावधीतील कर्जदारांचे अर्ज भरण्याबाबतचा आदेश काढला. त्यासाठीही पात्र असलेल्या शेतकºयांनी विकास सोसायटीमार्फत आॅनलाईन अर्ज  भरले आहेत. या अर्जांचाही शासनाकडून अद्याप निर्णय झालेला नाही. त्यानंतर १० आॅगस्ट रोजी पती-पत्नीसाठी प्रत्येकी दीड लाख रुपयांची कर्जमाफी करण्याबाबतचा शासन आदेश निघाला आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या ठोस सूचना नसल्याचे बँकेकडून सांगण्यात आले. 

जिल्हा बँकेला मिळाले ४२७ कोटी 

  • - जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ८३ हजार १४२ शेतकºयांची ४२७ कोटी १३ लाख रुपये इतकी झाली कर्जमाफी. 
  • - राष्टÑीयीकृत बँकांच्या ३२ हजार ४२२ शेतकºयांचे २१३ कोटी ६ लाख रुपयांचे कर्ज माफ झाले आहे.
  • - ग्रामीण बँकेच्या ७ हजार ८०१ शेतकºयांचे ५८ कोटी ५७ लाख रुपये इतके कर्ज माफ झाले आहे.
  • - जिल्हा बँक, राष्टÑीयीकृत व ग्रामीण बँकेच्या एकूण एक लाख २३ हजार ३६५ शेतकºयांचे ६९९ कोटी ३ लाख रुपये इतके कर्ज माफ झाले आहे. 
  • राष्टÑीयीकृत बँकांमुळे ठप्प

- ३१ मे रोजी राज्य शासनाने कर्जमाफीसाठी ९ वी ग्रीन लिस्ट बँकांना दिली होती. या यादीतील ३९ हजार ५२५ शेतकºयांच्या खात्यावर अद्यापही कर्जमाफीची रक्कम जमा केली नाही. हे शेतकरी प्रामुख्याने राष्टÑीयीकृत बँकांचे असल्याचे सांगण्यात आले.

सोलापूरसह अन्य काही जिल्हा बँकांनी पात्र शेतकºयांच्या खात्यावर पैसे जमा करण्याचे काम जुलै महिन्यातच पूर्ण केले असल्याचे सांगण्यात आले. जोपर्यंत राष्टÑीयीकृत बँकांना दिलेले पैसे खात्यावर जमा करुन शासनाला अहवाल जात नाही तोपर्यंत कोणत्याही बँकेला नव्याने शेतकरी याद्या व पैसे न देण्याची भूमिका सहकार खात्याने घेतली असल्याचे सांगण्यात आले. 

टॅग्स :SolapurसोलापूरFarmerशेतकरीbankबँकagricultureशेतीGovernmentसरकार