शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यातील शेतकºयांची कर्जमाफी प्रक्रिया ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 12:23 IST

ग्रीन लिस्टच येईना : जिल्हा बँकेचे ३० हजारांहून अधिक शेतकरी लटकले

ठळक मुद्दे३१ मे नंतर कर्जमाफीस पात्र यादी राज्यभरातच आलेली नाहीकर्जमाफी योजनेची प्रक्रिया तब्बल अडीच महिन्यांपासून ठप्प ९३ हजार शेतकºयांच्या कर्जमाफीचा निर्णय शासनाने घेतला

अरुण बारसकर 

सोलापूर : सोलापूरसह राज्यातील शेतकºयांसाठीची छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजनेची प्रक्रिया तब्बल अडीच महिन्यांपासून ठप्प झाली आहे. ३१ मे नंतर कर्जमाफीस पात्र यादी राज्यभरातच आलेली नाही. 

राज्य शासनाने जून २०१७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना जाहीर केली. मागील वर्षी जून-जुलैमध्ये कर्जमाफीसाठी अर्ज भरलेल्यांपैकी अनेक शेतकºयांची कर्जमाफी अद्याप झालेली नाही. राज्य शासनाने राज्यभरातील जिल्हा तसेच राष्टÑीयीकृत बँकांना  ३१ मे २०१८ पर्यंत ९ ग्रीन (पात्र) याद्या पाठविल्या आहेत. ३१ मे रोजी पाठविलेल्या याद्यातील पात्र शेतकºयांच्या खात्यावर रकमा जमा केल्याही आहेत, त्यानंतर  मात्र बँकेने पाठविलेल्या याद्या शासनाकडेच लटकल्या आहेत. एकट्या सोलापूर जिल्हा बँकेच्या एक लाख २४ हजार सभासद शेतकºयांनी कर्जमाफीसाठी अर्ज  भरले होते. त्यापैकी ९३ हजार शेतकºयांच्या कर्जमाफीचा निर्णय शासनाने घेतला असून, अन्य शेतकºयांच्या याद्या शासनाकडेच पेंडिंग आहेत. 

याशिवाय शासनाने त्यानंतर २००१ ते २००९ या कालावधीतील कर्जदारांचे अर्ज भरण्याबाबतचा आदेश काढला. त्यासाठीही पात्र असलेल्या शेतकºयांनी विकास सोसायटीमार्फत आॅनलाईन अर्ज  भरले आहेत. या अर्जांचाही शासनाकडून अद्याप निर्णय झालेला नाही. त्यानंतर १० आॅगस्ट रोजी पती-पत्नीसाठी प्रत्येकी दीड लाख रुपयांची कर्जमाफी करण्याबाबतचा शासन आदेश निघाला आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या ठोस सूचना नसल्याचे बँकेकडून सांगण्यात आले. 

जिल्हा बँकेला मिळाले ४२७ कोटी 

  • - जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ८३ हजार १४२ शेतकºयांची ४२७ कोटी १३ लाख रुपये इतकी झाली कर्जमाफी. 
  • - राष्टÑीयीकृत बँकांच्या ३२ हजार ४२२ शेतकºयांचे २१३ कोटी ६ लाख रुपयांचे कर्ज माफ झाले आहे.
  • - ग्रामीण बँकेच्या ७ हजार ८०१ शेतकºयांचे ५८ कोटी ५७ लाख रुपये इतके कर्ज माफ झाले आहे.
  • - जिल्हा बँक, राष्टÑीयीकृत व ग्रामीण बँकेच्या एकूण एक लाख २३ हजार ३६५ शेतकºयांचे ६९९ कोटी ३ लाख रुपये इतके कर्ज माफ झाले आहे. 
  • राष्टÑीयीकृत बँकांमुळे ठप्प

- ३१ मे रोजी राज्य शासनाने कर्जमाफीसाठी ९ वी ग्रीन लिस्ट बँकांना दिली होती. या यादीतील ३९ हजार ५२५ शेतकºयांच्या खात्यावर अद्यापही कर्जमाफीची रक्कम जमा केली नाही. हे शेतकरी प्रामुख्याने राष्टÑीयीकृत बँकांचे असल्याचे सांगण्यात आले.

सोलापूरसह अन्य काही जिल्हा बँकांनी पात्र शेतकºयांच्या खात्यावर पैसे जमा करण्याचे काम जुलै महिन्यातच पूर्ण केले असल्याचे सांगण्यात आले. जोपर्यंत राष्टÑीयीकृत बँकांना दिलेले पैसे खात्यावर जमा करुन शासनाला अहवाल जात नाही तोपर्यंत कोणत्याही बँकेला नव्याने शेतकरी याद्या व पैसे न देण्याची भूमिका सहकार खात्याने घेतली असल्याचे सांगण्यात आले. 

टॅग्स :SolapurसोलापूरFarmerशेतकरीbankबँकagricultureशेतीGovernmentसरकार