शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

सोलापूर जिल्ह्यातील शेतकºयांची कर्जमाफी प्रक्रिया ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 12:23 IST

ग्रीन लिस्टच येईना : जिल्हा बँकेचे ३० हजारांहून अधिक शेतकरी लटकले

ठळक मुद्दे३१ मे नंतर कर्जमाफीस पात्र यादी राज्यभरातच आलेली नाहीकर्जमाफी योजनेची प्रक्रिया तब्बल अडीच महिन्यांपासून ठप्प ९३ हजार शेतकºयांच्या कर्जमाफीचा निर्णय शासनाने घेतला

अरुण बारसकर 

सोलापूर : सोलापूरसह राज्यातील शेतकºयांसाठीची छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजनेची प्रक्रिया तब्बल अडीच महिन्यांपासून ठप्प झाली आहे. ३१ मे नंतर कर्जमाफीस पात्र यादी राज्यभरातच आलेली नाही. 

राज्य शासनाने जून २०१७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना जाहीर केली. मागील वर्षी जून-जुलैमध्ये कर्जमाफीसाठी अर्ज भरलेल्यांपैकी अनेक शेतकºयांची कर्जमाफी अद्याप झालेली नाही. राज्य शासनाने राज्यभरातील जिल्हा तसेच राष्टÑीयीकृत बँकांना  ३१ मे २०१८ पर्यंत ९ ग्रीन (पात्र) याद्या पाठविल्या आहेत. ३१ मे रोजी पाठविलेल्या याद्यातील पात्र शेतकºयांच्या खात्यावर रकमा जमा केल्याही आहेत, त्यानंतर  मात्र बँकेने पाठविलेल्या याद्या शासनाकडेच लटकल्या आहेत. एकट्या सोलापूर जिल्हा बँकेच्या एक लाख २४ हजार सभासद शेतकºयांनी कर्जमाफीसाठी अर्ज  भरले होते. त्यापैकी ९३ हजार शेतकºयांच्या कर्जमाफीचा निर्णय शासनाने घेतला असून, अन्य शेतकºयांच्या याद्या शासनाकडेच पेंडिंग आहेत. 

याशिवाय शासनाने त्यानंतर २००१ ते २००९ या कालावधीतील कर्जदारांचे अर्ज भरण्याबाबतचा आदेश काढला. त्यासाठीही पात्र असलेल्या शेतकºयांनी विकास सोसायटीमार्फत आॅनलाईन अर्ज  भरले आहेत. या अर्जांचाही शासनाकडून अद्याप निर्णय झालेला नाही. त्यानंतर १० आॅगस्ट रोजी पती-पत्नीसाठी प्रत्येकी दीड लाख रुपयांची कर्जमाफी करण्याबाबतचा शासन आदेश निघाला आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या ठोस सूचना नसल्याचे बँकेकडून सांगण्यात आले. 

जिल्हा बँकेला मिळाले ४२७ कोटी 

  • - जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ८३ हजार १४२ शेतकºयांची ४२७ कोटी १३ लाख रुपये इतकी झाली कर्जमाफी. 
  • - राष्टÑीयीकृत बँकांच्या ३२ हजार ४२२ शेतकºयांचे २१३ कोटी ६ लाख रुपयांचे कर्ज माफ झाले आहे.
  • - ग्रामीण बँकेच्या ७ हजार ८०१ शेतकºयांचे ५८ कोटी ५७ लाख रुपये इतके कर्ज माफ झाले आहे.
  • - जिल्हा बँक, राष्टÑीयीकृत व ग्रामीण बँकेच्या एकूण एक लाख २३ हजार ३६५ शेतकºयांचे ६९९ कोटी ३ लाख रुपये इतके कर्ज माफ झाले आहे. 
  • राष्टÑीयीकृत बँकांमुळे ठप्प

- ३१ मे रोजी राज्य शासनाने कर्जमाफीसाठी ९ वी ग्रीन लिस्ट बँकांना दिली होती. या यादीतील ३९ हजार ५२५ शेतकºयांच्या खात्यावर अद्यापही कर्जमाफीची रक्कम जमा केली नाही. हे शेतकरी प्रामुख्याने राष्टÑीयीकृत बँकांचे असल्याचे सांगण्यात आले.

सोलापूरसह अन्य काही जिल्हा बँकांनी पात्र शेतकºयांच्या खात्यावर पैसे जमा करण्याचे काम जुलै महिन्यातच पूर्ण केले असल्याचे सांगण्यात आले. जोपर्यंत राष्टÑीयीकृत बँकांना दिलेले पैसे खात्यावर जमा करुन शासनाला अहवाल जात नाही तोपर्यंत कोणत्याही बँकेला नव्याने शेतकरी याद्या व पैसे न देण्याची भूमिका सहकार खात्याने घेतली असल्याचे सांगण्यात आले. 

टॅग्स :SolapurसोलापूरFarmerशेतकरीbankबँकagricultureशेतीGovernmentसरकार