शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

पुरामुळे १३३ गावातील १० हजार ८२० हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 13:30 IST

पंढरपूर, माळशिरस, मंगळवेढा, दक्षिण सोलापूर तालुक्यातील पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश

सोलापूर : वीर व उजनी धरणातून नीरा व भीमेत सोडलेल्या पाण्यामुळे निर्माण झालेल्या पुरात जिल्ह्यातील १३३ गावांमधील १० हजार ८२० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी  व्यक्त केला आहे. 

जिल्ह्यामध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे नदीकाठच्या शेतीतील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. अद्याप शेतांमधून पाणी वाहत असल्याने उभी पिके नष्ट होणार आहेत. पुरामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.   पहिल्या टप्प्यातील पंचनाम्यात   १0 हजार ८२० हेक्टर क्षेत्रावरील पिकांना पुराची हानी पोहोचल्याचे दिसून येत आहे. यात गावनिहाय व पीकनिहाय नुकसानीचा काढलेला अंदाज पुढीलप्रमाणे आहे. 

दक्षिण सोलापूर, गावे: १५,क्षेत्र: ६४१.८0 हेक्टर. पिकनिहाय नुकसान: ऊस: ५३३ हेक्टर, केळी: २0.२0, पेरू: १.६0, चिंच: 0.४0, नारळ: 0.२0, मका: ३३.00, मूग: ३.00, उडीद: १५.00, सोयाबीन: २.00, तूर: ३0.00, भुईमूग: १.८0, बांबू: १.६0. पंढरपूर, गावे: ४४, क्षेत्र: ७२९१.00 हेक्टर, ऊस: ६२५५.00, मका:४५२.00, चारापिके: ४१४.00, केळी: १0८.00, डाळिंब: १८.00, कांदा: ४४. मंगळवेढा : गावे : १५, क्षेत्र : १७0.00 हेक्टर. ऊस: ५0.00, सूर्यफूल: १0.00, मका: ११0.00. माढा : गावे: २६, क्षेत्र: ७८0.00. सर्व ऊस, मोहोळ: गावे: ५, क्षेत्र: २७५.00 हेक्टर, सर्व ऊस. माळशिरस: गावे: २८, क्षेत्र: १६६२.४0 हेक्टर, बाजरी: ११८.00, मका: ३१९.00, कडवळ: २३0, ऊस: ६९६.00, केळी: १९९.00, डाळिंब: ६४.४0, भाजीपाला: २२.00, मका चारा: १४.00.

बाधितांची संख्या २२ हजार- पुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांची संख्या २२ हजार ७१५ इतकी झाली आहे. यात दक्षिण सोलापूर, अक्कलकोट आणि मंगळवेढ्यातील लोकांची संख्या वाढली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील ६०७ कुटुंबातील २८७१ जणांना तर मंगळवेढा तालुक्यातील १५९ कुटुंबातील ९२0 जणांना आणि अक्कलकोट तालुक्यातील धारसंग येथील एका कुटुंबातील १0 जणांना गुरुवारी सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. 

बाधित लोकांची व्यवस्था करण्याची जबाबदारी पंढरपूर: उपजिल्हाधिकारी दीपक शिंदे, शिरढोण—कौठाळी: शैलेश सूर्यवंशी, गोपाळपूर—मुंढेवाढी : प्रांत अधिकारी ज्योती कदम, सुस्ते: तहसीलदार संजय पाटील, शेगाव दुमाला: सुशील बेल्हेकर, ६५ एकर: अनिल कारंडे यांच्यावर देण्यात आली आहे. - उजनी व वीर धरणातील गेल्या चार दिवसात मोठ्या प्रमाणात झालेल्या पाण्याच्या विसर्गामुळे हिळ्ळी बंधारा ओव्हरफ्लो झाला आहे, कर्नाटक राज्यातील इंडी तालुक्यातील गुब्याड गावचा संपर्क तुटला असून, हिळ्ळीत पाच किलोमीटर अंतरावरील शेतात उभ्या पिकात पाणी शिरल्याने शेतकºयांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागणार आहे. 

तडवळ परिसरात पाहणी- अक्कलकोट तालुक्यातील हिळ्ळी, कुडल, आंदेवाडी, आंदेवाडी खु., कोर्सेगाव, देवीकवठा, म्हैसलगी, खानापूर, अंकलगे, आळगे, शावळ या १२ गावांना  पुराचा फटका बसलेला आहे. गेली तीन वर्षे दुष्काळी परिस्थितीने हवालदिल झालेल्या शेतकºयांवर आता पुराचे संकट आल्याने हातचे पीक गेले आहे. पुराने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यात यावेत अशी मागणी झेडपीचे उपाध्यक्ष शिवानंद पाटील यांनी केली आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरfloodपूरPandharpurपंढरपूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय