शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

सोलापुरात आज सायंकाळी पाचनंतर संचारबंदी; जाणून घ्या काय बंद, काय असणार चालू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 13:13 IST

मनपा आयुक्तांचे आदेश;  किराणा, भाजीपाला वगळून वीकेंडला सर्व दुकाने बंद

सोलापूर : कोरोनाच्या नव्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात सोमवारपासून दररोज सायंकाळी पाच ते पहाटे पाच वाजेपर्यंत संचारबंदी लागू असेल. अत्यावश्यक सेवा म्हणून किराणा, भाजीपाला, डेअरी, बेकरीची दुकाने, कृषी उपक्रम दररोज सायंकाळी चारवाजेपर्यंत सुरू राहतील. इतर सर्व दुकाने केवळ सोमवार ते शुक्रवार सायंकाळी चार वाजेपर्यंत चालू राहतील, असे आदेश आयुक्त पी. शिवशंकर यांनी रविवारी दिले. या निर्बंधांमधून मेडिकल, वैद्यकीय सेवांना वगळण्यात आले आहे.

कोरोनाच्या डेल्टा या नव्या विषाणूचा जिल्ह्यात शिरकाव होईल, असा आरोग्य यंत्रणेचा अंदाज आहे. राज्य शासनाने राज्यात मिनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यानुसार मनपा आयुक्तांनी रविवारी आदेश जारी केले. शहरातील सर्व दुकाने सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरू राहतील. सायंकाळी पाच वाजेपर्यंत शहरात जमावबंदी लागू असेल. सायंकाळी पाच वाजल्यानंतर अत्यावश्यक कारणांशिवाय नागरिकांना बाहेर पडता येणार नाही. पाच वाजल्यानंतर संचारबंदी लागू होईल. सर्व खासगी कार्यालयांतील कामकाज ५० टक्के कर्मचारी क्षमतेने सुरू ठेवण्यात यावे. वर्क फ्रॉम होमला प्राधान्य देण्यात यावे. विवाह सोहळ्यासाठी ५० जणांना तर अंत्यसंस्कारासाठी केवळ २० जणांना परवानगी असेल, असेही आयुक्तांनी सांगितले आहे.

पेट्रोल पंपही चार वाजेपर्यंत सुरू राहणार

सार्वजनिक वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे; परंतु प्रवासी उभे न करता सेवा एकूण क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने सेवा देता येईल. दुचाकी व रिक्षाला शासन नियमानुसार परवानगी असेल. माल वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये जास्तीत जास्त तीन व्यक्तींना परवानगी असेल. शहरातील पेट्रोल पंप सायंकाळी चार वाजेपर्यंतच सुरू राहतील, असे मनपा उपायुक्त एन.के. पाटील यांनी सांगितले.

 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका