शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
4
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
5
हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग...
6
Crime: 'मी तुमच्या मुलीची हत्या केलीये'; मित्रासोबत रुमवर गेली अन् निळ्यामध्ये ड्रममध्ये...; तरुणीची हत्या का केली?
7
Neena Kulkarni: जेष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना मानाचा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!
8
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
9
वीटभट्टीवर जुळले प्रेमसंबंध! दोन नातवंडांची आजी सुनेच्या दागिन्यांसह प्रियकरासोबत पळाली
10
Video - कॉर्पोरेट शॉक! "हे कल्चर सगळीकडे करा... "; बरोबर ५ वाजता संपूर्ण ऑफिस रिकामं
11
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
12
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
13
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
14
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
15
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
16
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
17
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
18
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
19
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
20
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?

पुन्हा संकट; शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी अन् हातात विम्याचा कागद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 11:14 IST

चपळगाव मंडल: खरीप पीक विमा मंजूर व्हावे- शेतकऱ्यांची मागणी

चपळगाव - शंभूलिंग अकतनाळ

कोरोनामुळे शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे.यातुन सावरण्यासाठी खरीप हंगामातील पिके साथ देतील असे वाटत असतानाच गेल्या पंधरा दिवसांपासून चपळगाव मंडलात पडणारा रिपरिप पाऊस मात्र खरीप हंगामातील पिकांना घातकीचा ठरत आहे. पिकांमधील वाढलेले तण, पिवळे पडणारे रोग, जमिनीतील दलदलीने कुजणारे पीक अशा अनेक संकटातुन वावरणाऱ्या शेतकऱ्यांच्या नशिबी यावर्षीचा पीक विमा मंजूर झाला तरच चांगले आहे.अन्यथा आर्थिक संकटातील शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी धोक्याची घंटा निर्माण झाली आहे. 

चपळगाव मंडलातील विशेषतः चपळगाव, हन्नुर, डोंबरजवळगे, बोरेगाव, बऱ्हाणपूर, पितापूर, चुंगी, किणी, दर्शनाळ, कुरनूर, चुंगी, अरळी, बावकरवाडी, सिंदखेड, मोट्याळ, दहिटणे आदी गावातील शेतकरी प्रामुख्याने दरवर्षी खरीप हंगामातील तुर, मुग, उडीद, सोयाबीन, सुर्यफूल, भुईमूग, मका, बाजरी आदी पिकांचे उत्पादन घेतात. यावर्षीदेखील खरीप पिकांवर बहुतांश शेतकऱ्यांनी भर दिला आहे. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून पडणारा रिपरिप पाऊस शेतकऱ्यांच्या कामात अडथळा निर्माण करत आहे. कोळपे मारण्यासाठी वापसाच नसल्याने यावर्षी खरीप पिकांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर तण वाढले आहे. परिणामी पिकांवर विविध रोगांचा प्रादृर्भाव झाला आहे.औषध मारण्यासाठी उपयुक्त परिस्थिती नाही. अनेक दिवसांपासून सुर्यदर्शन नाही.यामुळे पिकांचे भवितव्य अंधारात जाणार आहे.

शेतकऱ्यांच्या संपूर्ण वर्षाचे अर्थकारण खरीप हंगामातील पिकांवर अवलंबून असते. मात्र यावर्षी प्रमाणापेक्षा जास्त पडणारा पाऊस खरीप पिकांना घातक ठरत आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शेतकऱ्यांनी खरीप पिक विम्याचा हप्ता भरला आहे. सद्यस्थितीत संबधित प्रशासनाकडून पिकांची पाहणी होणे गरजेचे आहे.तसेच शासनाकडून खरीप पिक विमा रक्कम मंजूर होण्यासाठी आवश्यक कार्यवाही व्हावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

आता आधार फक्त पीक विम्याचाच!... 

सद्यस्थितीत जास्तीच्या पावसाने मुग व उडीद पिकांना फटका बसला आहे.कित्येकांच्या शेतात पाणी असल्याने उभी खरीप पिके कुजत चालली आहेत.संपूर्ण वर्षाचे अर्थकारण खरीप पिकांवर अवलंबून असते. मात्र जास्तीच्या पावसाने खरीप पिके हातुन गेल्यात जमा आहेत.आता आधार आहे तो भविष्यात पिक विम्याची रक्कम मिळण्यावरच....!

चपळगाव मंडलात

सरासरीच्या २४० टक्के पाऊस..

कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार जुलै महिन्यात चपळगाव मंडलात सरासरीच्या २४० टक्के पाऊस पडला आहे.तर पावसाळा सुरू झाल्यापासून सरासरीच्या १७२ टक्के इतका पाऊस पडल्याने खरीप पिके धोक्यात आली आहेत.।

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरी