शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा संकट; शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी अन् हातात विम्याचा कागद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 11:14 IST

चपळगाव मंडल: खरीप पीक विमा मंजूर व्हावे- शेतकऱ्यांची मागणी

चपळगाव - शंभूलिंग अकतनाळ

कोरोनामुळे शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे.यातुन सावरण्यासाठी खरीप हंगामातील पिके साथ देतील असे वाटत असतानाच गेल्या पंधरा दिवसांपासून चपळगाव मंडलात पडणारा रिपरिप पाऊस मात्र खरीप हंगामातील पिकांना घातकीचा ठरत आहे. पिकांमधील वाढलेले तण, पिवळे पडणारे रोग, जमिनीतील दलदलीने कुजणारे पीक अशा अनेक संकटातुन वावरणाऱ्या शेतकऱ्यांच्या नशिबी यावर्षीचा पीक विमा मंजूर झाला तरच चांगले आहे.अन्यथा आर्थिक संकटातील शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी धोक्याची घंटा निर्माण झाली आहे. 

चपळगाव मंडलातील विशेषतः चपळगाव, हन्नुर, डोंबरजवळगे, बोरेगाव, बऱ्हाणपूर, पितापूर, चुंगी, किणी, दर्शनाळ, कुरनूर, चुंगी, अरळी, बावकरवाडी, सिंदखेड, मोट्याळ, दहिटणे आदी गावातील शेतकरी प्रामुख्याने दरवर्षी खरीप हंगामातील तुर, मुग, उडीद, सोयाबीन, सुर्यफूल, भुईमूग, मका, बाजरी आदी पिकांचे उत्पादन घेतात. यावर्षीदेखील खरीप पिकांवर बहुतांश शेतकऱ्यांनी भर दिला आहे. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून पडणारा रिपरिप पाऊस शेतकऱ्यांच्या कामात अडथळा निर्माण करत आहे. कोळपे मारण्यासाठी वापसाच नसल्याने यावर्षी खरीप पिकांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर तण वाढले आहे. परिणामी पिकांवर विविध रोगांचा प्रादृर्भाव झाला आहे.औषध मारण्यासाठी उपयुक्त परिस्थिती नाही. अनेक दिवसांपासून सुर्यदर्शन नाही.यामुळे पिकांचे भवितव्य अंधारात जाणार आहे.

शेतकऱ्यांच्या संपूर्ण वर्षाचे अर्थकारण खरीप हंगामातील पिकांवर अवलंबून असते. मात्र यावर्षी प्रमाणापेक्षा जास्त पडणारा पाऊस खरीप पिकांना घातक ठरत आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शेतकऱ्यांनी खरीप पिक विम्याचा हप्ता भरला आहे. सद्यस्थितीत संबधित प्रशासनाकडून पिकांची पाहणी होणे गरजेचे आहे.तसेच शासनाकडून खरीप पिक विमा रक्कम मंजूर होण्यासाठी आवश्यक कार्यवाही व्हावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

आता आधार फक्त पीक विम्याचाच!... 

सद्यस्थितीत जास्तीच्या पावसाने मुग व उडीद पिकांना फटका बसला आहे.कित्येकांच्या शेतात पाणी असल्याने उभी खरीप पिके कुजत चालली आहेत.संपूर्ण वर्षाचे अर्थकारण खरीप पिकांवर अवलंबून असते. मात्र जास्तीच्या पावसाने खरीप पिके हातुन गेल्यात जमा आहेत.आता आधार आहे तो भविष्यात पिक विम्याची रक्कम मिळण्यावरच....!

चपळगाव मंडलात

सरासरीच्या २४० टक्के पाऊस..

कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार जुलै महिन्यात चपळगाव मंडलात सरासरीच्या २४० टक्के पाऊस पडला आहे.तर पावसाळा सुरू झाल्यापासून सरासरीच्या १७२ टक्के इतका पाऊस पडल्याने खरीप पिके धोक्यात आली आहेत.।

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरी