शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
5
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
6
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
7
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
8
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
9
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
10
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
11
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
12
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!

सोलापूर जिल्हा न्यायालयातील फौजदारी खटल्यात शिक्षेचे प्रमाण वाढले, माहिती अधिकारात सत्यता उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 13:16 IST

तपासातील चुका आणि साक्षीदारांची फितुरी याचा कोणत्याही गुन्ह्यातील शिक्षेच्या प्रमाणावर नेहमीच परिणाम होतो.  आरोपींना शिक्षेचे प्रमाण कमी असल्याची ओरडसुद्धा नेहमीच होते; मात्र गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत यंदा आरोेपींना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढल्याची माहिती ही माहिती अधिकारातून समोर आली आहे.

ठळक मुद्देसत्र न्यायालय आणि प्रथम श्रेणी न्यायालयांमध्ये चालणाºया फौजदारी खटल्यात आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी आजवरच्या सर्वच सरकारी वकिलांनी प्रयत्न केलेपोलिसांची सदोष दोषारोपपत्रे, सरकारी पक्ष-पोलीस-पंच साक्षीदारांमध्ये समन्वयाचा अभाव आदी बाबी अनेकदा आरोपींना शिक्षा देण्यात अडसर येतातअलीकडच्या काळात गुन्ह्यांचे दोषारोपपत्र सरकारी वकिलांच्या नजरेखालून घालण्यात येत आहे

अमित सोमवंशी सोलापूर दि १८ : तपासातील चुका आणि साक्षीदारांची फितुरी याचा कोणत्याही गुन्ह्यातील शिक्षेच्या प्रमाणावर नेहमीच परिणाम होतो.  आरोपींना शिक्षेचे प्रमाण कमी असल्याची ओरडसुद्धा नेहमीच होते; मात्र गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत यंदा आरोेपींना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढल्याची माहिती ही माहिती अधिकारातून समोर आली आहे.सत्र न्यायालय आणि प्रथम श्रेणी न्यायालयांमध्ये चालणाºया फौजदारी खटल्यात आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी आजवरच्या सर्वच सरकारी वकिलांनी प्रयत्न केले आहेत. पोलिसांची सदोष दोषारोपपत्रे, सरकारी पक्ष-पोलीस-पंच साक्षीदारांमध्ये समन्वयाचा अभाव आदी बाबी अनेकदा आरोपींना शिक्षा देण्यात अडसर येतात. अलीकडच्या काळात गुन्ह्यांचे दोषारोपपत्र सरकारी वकिलांच्या नजरेखालून घालण्यात येत आहे. आजवर झालेल्या चुका दुरुस्त होऊ लागल्या. त्याचा चांगला परिणाम न्यायालयीन खटल्यातील शिक्षेच्या प्रमाणावर झाला आहे. सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात सरकार पक्षाच्या बाजूने निकाल होण्याचे प्रमाण दोन वर्षांत दुप्पट झाले आहे. सन २०१५ या वर्षात २२.५४ टक्के असलेले प्रमाण २०१६  साली ३१.५ टक्के झाले आणि २०१७ साली ४५.३५  टक्के झाले. -------------------- सोलापूर न्यायालयातील फौजदारी खटल्यांमध्ये जयसिंह मोहिते-पाटील, कुमार करजगी,शरद मुथा, आ. रमेश कदम, मनोज जैन इफेड्रिन प्रकरण, समाजकल्याण खात्यातील अपहार,पंजाब नॅशनल बँक फसवणूक प्रकरण,  काटगावकर फसवणूक प्रकरण, मनोहरभाऊ डोंगरे खुनीहल्ला प्रकरणातील आरोपी, तौफिक शैख,सुरेंद्र कर्णिक,उदय पाटील आणि  सालार ग्रुप यांचा समावेश आहे.---------------आरोपींना झालेली शिक्षा- जिल्हा सरकारी वकील संतोष न्हावकर यांनी चालविलेल्या १५ पैकी ५ खटल्यांचे निकाल लागले असून यात पाचही केसमध्ये आरोपींना शिक्षा झाली. तीन खटल्यांमध्ये जन्मठेप व दोन लाख रुपयांचा दंड न्यायालयाने आरोपींना ठोठावला आहे. उर्वरित खटले निकालाच्या शेवटच्या टप्प्यात आहेत. जिल्हा सरकारी वकिल यांच्या दोन वर्षांच्या कारकिर्दीत आर्थिक आणि गंभीर गुन्ह्यातील आरोपींना अटकपूर्व किंवा जामीन मंजूर मिळू दिला नाही हे विशेष .----------------------न्यायालयातील सुरक्षाही वाढवली- शिक्षेचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत असले तरी गुन्हेगारांची हिम्मतसुद्धा वाढल्याचे लक्षात आले. मागील दोन महिन्यांखाली सोलापूर न्यायालयात काही जणांनी न्यायाधीशांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. कारागृहातील एका बंदीने पोलीस शिपायावर हल्ला केला. त्यामुळे पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी न्यायालयाच्या सुरक्षेत वाढ केली.--------------------सरकारने टाकलेला विश्वास आम्ही सार्थ ठरविल्याचे समाधान आहे. सरकारपक्षाच्या  बाजूने आलेले यश हे संपूर्ण सरकारी वकिलांच्या टीमचे आहे. त्यांनी घेतलेल्या मेहनतीने व कष्टाने हे शक्य झाले आहे. -संतोष न्हावकर, जिल्हा सरकारी वकील------------------तीन वर्षांतील फौजदारी केसेस वर्ष    २०१५    २०१६    २०१७दाखल केसेस          ३५११    ३७१२    ४३४४निकाली केसेस    २८५६    १८२८    ३७७५सरकारच्या बाजूने निकाली    ६४४    ५७६    १७१२टक्केवारी    २२.५४    ३१.०५    ४५.३५

टॅग्स :Solapurसोलापूर