शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

सोलापूर जिल्हा न्यायालयातील फौजदारी खटल्यात शिक्षेचे प्रमाण वाढले, माहिती अधिकारात सत्यता उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 13:16 IST

तपासातील चुका आणि साक्षीदारांची फितुरी याचा कोणत्याही गुन्ह्यातील शिक्षेच्या प्रमाणावर नेहमीच परिणाम होतो.  आरोपींना शिक्षेचे प्रमाण कमी असल्याची ओरडसुद्धा नेहमीच होते; मात्र गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत यंदा आरोेपींना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढल्याची माहिती ही माहिती अधिकारातून समोर आली आहे.

ठळक मुद्देसत्र न्यायालय आणि प्रथम श्रेणी न्यायालयांमध्ये चालणाºया फौजदारी खटल्यात आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी आजवरच्या सर्वच सरकारी वकिलांनी प्रयत्न केलेपोलिसांची सदोष दोषारोपपत्रे, सरकारी पक्ष-पोलीस-पंच साक्षीदारांमध्ये समन्वयाचा अभाव आदी बाबी अनेकदा आरोपींना शिक्षा देण्यात अडसर येतातअलीकडच्या काळात गुन्ह्यांचे दोषारोपपत्र सरकारी वकिलांच्या नजरेखालून घालण्यात येत आहे

अमित सोमवंशी सोलापूर दि १८ : तपासातील चुका आणि साक्षीदारांची फितुरी याचा कोणत्याही गुन्ह्यातील शिक्षेच्या प्रमाणावर नेहमीच परिणाम होतो.  आरोपींना शिक्षेचे प्रमाण कमी असल्याची ओरडसुद्धा नेहमीच होते; मात्र गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत यंदा आरोेपींना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढल्याची माहिती ही माहिती अधिकारातून समोर आली आहे.सत्र न्यायालय आणि प्रथम श्रेणी न्यायालयांमध्ये चालणाºया फौजदारी खटल्यात आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी आजवरच्या सर्वच सरकारी वकिलांनी प्रयत्न केले आहेत. पोलिसांची सदोष दोषारोपपत्रे, सरकारी पक्ष-पोलीस-पंच साक्षीदारांमध्ये समन्वयाचा अभाव आदी बाबी अनेकदा आरोपींना शिक्षा देण्यात अडसर येतात. अलीकडच्या काळात गुन्ह्यांचे दोषारोपपत्र सरकारी वकिलांच्या नजरेखालून घालण्यात येत आहे. आजवर झालेल्या चुका दुरुस्त होऊ लागल्या. त्याचा चांगला परिणाम न्यायालयीन खटल्यातील शिक्षेच्या प्रमाणावर झाला आहे. सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात सरकार पक्षाच्या बाजूने निकाल होण्याचे प्रमाण दोन वर्षांत दुप्पट झाले आहे. सन २०१५ या वर्षात २२.५४ टक्के असलेले प्रमाण २०१६  साली ३१.५ टक्के झाले आणि २०१७ साली ४५.३५  टक्के झाले. -------------------- सोलापूर न्यायालयातील फौजदारी खटल्यांमध्ये जयसिंह मोहिते-पाटील, कुमार करजगी,शरद मुथा, आ. रमेश कदम, मनोज जैन इफेड्रिन प्रकरण, समाजकल्याण खात्यातील अपहार,पंजाब नॅशनल बँक फसवणूक प्रकरण,  काटगावकर फसवणूक प्रकरण, मनोहरभाऊ डोंगरे खुनीहल्ला प्रकरणातील आरोपी, तौफिक शैख,सुरेंद्र कर्णिक,उदय पाटील आणि  सालार ग्रुप यांचा समावेश आहे.---------------आरोपींना झालेली शिक्षा- जिल्हा सरकारी वकील संतोष न्हावकर यांनी चालविलेल्या १५ पैकी ५ खटल्यांचे निकाल लागले असून यात पाचही केसमध्ये आरोपींना शिक्षा झाली. तीन खटल्यांमध्ये जन्मठेप व दोन लाख रुपयांचा दंड न्यायालयाने आरोपींना ठोठावला आहे. उर्वरित खटले निकालाच्या शेवटच्या टप्प्यात आहेत. जिल्हा सरकारी वकिल यांच्या दोन वर्षांच्या कारकिर्दीत आर्थिक आणि गंभीर गुन्ह्यातील आरोपींना अटकपूर्व किंवा जामीन मंजूर मिळू दिला नाही हे विशेष .----------------------न्यायालयातील सुरक्षाही वाढवली- शिक्षेचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत असले तरी गुन्हेगारांची हिम्मतसुद्धा वाढल्याचे लक्षात आले. मागील दोन महिन्यांखाली सोलापूर न्यायालयात काही जणांनी न्यायाधीशांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. कारागृहातील एका बंदीने पोलीस शिपायावर हल्ला केला. त्यामुळे पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी न्यायालयाच्या सुरक्षेत वाढ केली.--------------------सरकारने टाकलेला विश्वास आम्ही सार्थ ठरविल्याचे समाधान आहे. सरकारपक्षाच्या  बाजूने आलेले यश हे संपूर्ण सरकारी वकिलांच्या टीमचे आहे. त्यांनी घेतलेल्या मेहनतीने व कष्टाने हे शक्य झाले आहे. -संतोष न्हावकर, जिल्हा सरकारी वकील------------------तीन वर्षांतील फौजदारी केसेस वर्ष    २०१५    २०१६    २०१७दाखल केसेस          ३५११    ३७१२    ४३४४निकाली केसेस    २८५६    १८२८    ३७७५सरकारच्या बाजूने निकाली    ६४४    ५७६    १७१२टक्केवारी    २२.५४    ३१.०५    ४५.३५

टॅग्स :Solapurसोलापूर