शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

ग्रामीण भागातील लोकांना शहरात येण्यासाठी कोरोना चाचणीचे प्रमाणपत्र बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 14:56 IST

मनपा आयुक्तांचे नवे आदेश : ग्रामीण भागातील नागरिकांना बसणार फटका

सोलापूर : शहरातील किराणा, भाजी-फळे, मांस विक्रीची दुकाने उद्या दि. १५ मेपासून सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू ठेवता येतील, असे आदेश महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिले आहेत. उर्वरित सर्व दुकाने १ जूनपर्यंत बंद असतील. शहरात प्रवेश करायचा असेल तर कोरोना चाचणीचा अहवाल दाखविणे बंधनकारक असेल.

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शुक्रवारी शहरातील कोरोनास्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी शहरातील दुकाने व घरपोच सेवा सुरू असेल, असे आदेश दिले होते. त्यानुसार पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी शुक्रवारी रात्री उशिरा आदेश जारी केले. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जाहीर केलेला लॉकडाऊन १ जून सकाळी सात वाजेपर्यंत कायम असेल. परंतु, अत्यावश्यक सेवा म्हणून किराणा दुकाने, फळ व भाजी, मांस, अंडी विक्री करणाऱ्या दुकानांना सकाळी ७ ते ११ या कालावधीत परवानगी आहे. दुधाचे संकलन, वाहतूक व प्रक्रिया तसेच घरपोच सेवा देण्यास परवानगी आहे. मात्र, त्यांनी यापूर्वी दिलेल्या निर्बंधांचे पालन करणे आवश्यक आहे. अत्यावश्यक सेवेतील उत्पादक व निर्यातदारांना नियम व अटी लावून परवानगी असेल.

माल वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या बाबतीत एकाचवेळी वाहनांमध्ये दोन व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्तींना प्रवास करता येणार नाही. ही वाहने राज्याबाहेरील असतील तर त्यांनी राज्यात प्रवेश करण्यापूर्वी ४८ तास अगोदर केलेल्या कोरोना चाचणीचा अहवाल दाखविणे बंधनकारक आहे. हे प्रमाणपत्र सात दिवसांसाठी वैध असेल.

 

आरटीपीसीआर चाचणी अहवाल आवश्यक

महापालिका हद्दीत प्रवेश करणाऱ्या प्रवाशांना मागील ४८ तासांपूर्वी केलेला आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल दाखविणे बंधनकारक असेल. परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांना हा नियम अनिवार्य असेल, असे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी सांगितले. याचा फटका ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या नागरिकांना बसणार आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका