शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Breaking; सोलापूर जिल्ह्यातील १०२९ पैकी ७३६ गावांत पोहोचला कोरोना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 12:35 IST

२९३ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले : नियम शिथिल झाल्याने आव जाव घर तुम्हारा..

ठळक मुद्देएप्रिलअखेरपर्यंत कोरोनामुक्त राहिलेल्या जिल्ह्यात आता संसर्ग वाढला आहेअजूनही २९३ गावांनी कोरोनाला वेशीवर अडवून ठेवण्यात यश मिळविले नियम शिथिल झाल्याने गावकरी कामानिमित्त कुठेही फिरत आहेत

सोलापूर : जिल्ह्यातील १0२९ गावांपैकी आता ७३६ गावांमध्ये कोरोनाचा संसर्ग पोहोचला आहे. १३ आॅगस्ट रोजी ६०९ गावांनी कोरोनाला वेशीवर रोखले होते. पण आता महिनाभरात ३१६ गावांची वेस कोरोना विषाणूने ओलांडल्याचे चित्र दिसत आहे.

एप्रिलअखेरपर्यंत कोरोनामुक्त राहिलेल्या जिल्ह्यात आता संसर्ग वाढला आहे. अजूनही २९३ गावांनी कोरोनाला वेशीवर अडवून ठेवण्यात यश मिळविले आहे. लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यानंतर लोक कोरोनाबाधित गावे व शहरांमध्ये प्रवास करू लागल्यामुळे ही स्थिती निर्माण झाल्याचे आरोग्य अधिकाºयांचे म्हणणे आहे. लॉकडाऊन काळात नियम कडक असल्याने प्रत्येक गावांमध्ये बाहेरून येणाºयांना प्रवेश दिला जात नव्हता. त्याचबरोबर जे कोणी गावकरी बाहेरून परतले त्यांना शाळेत चौदा दिवस अलगीकरणात ठेवण्यात येत होते. पण आता हे नियम शिथिल झाल्याने गावकरी कामानिमित्त कुठेही फिरत आहेत. त्याचा परिणाम आता दिसून येत आहे.

अनलॉकनंतर ग्रामीण भागात रुग्ण वाढत गेले. १३ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यात ६0९ गावे कोरोनामुक्त होती व फक्त ६ हजार ७७२ पॉझिटिव्ह रुग्ण होते व मृतांची संख्या फक्त १९४ होती. पण आता महिना होत नाही तोवर ९ सप्टेंबरअखेर रुग्णांची संख्या १४ हजार ९१६ तर मृतांची संख्या ४३९ झाली आहे.

का वाढतोय संसर्ग ?लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यानंतर कामानिमित्त लोक बाहेर पडले. बाधित गावे व शहरात प्रवास. कोरोना प्रतिबंधासाठी सांगितलेल्या मास्क वापर, फिजिकल डिस्टन्स, हात धुणे या नियमावलीचा विसर. भाजीपाला, इतर खरेदीसाठी गर्दीत वावर.

तपासणीकडे होतेय दुर्लक्ष..जिल्ह्यात सतत ढगाळी हवामान. यामुळे सर्दी, खोकला, तापाचा त्रास. त्रास होऊनही आजार अंगावर काढणे. ज्येष्ठ व्यक्तींच्या आजाराबाबत माहिती न देणे. गरज नसताना प्रवास करणे. बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यावरही माहिती न देणे.

आम्ही हे करतोय...ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने रॅपिड अँटिजेन चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. याद्वारे बाधितांचा शोध घेऊन संसर्गावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न होत आहे. तरीही चाचणी करण्यास लोकांची मानसिकता दिसत नसल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांनी सांगितले. 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय