शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

कोरोना मृतांसाठी मनपा कर्मचारी ठरले अखेरचे सोबती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 16:11 IST

सोलापुरात आजवर सहा जणांवर केले अंत्यसंस्कार;रात्री-अपरात्रीची, जीवाची पर्वा न करणारे मनपाचे कर्मचारी

ठळक मुद्देअंत्यसंस्कार करताना मनपाचे अधिकारी, कर्मचारी पीपीई कीटचा वापर करतातएकदाच या कीटचा वापर केला जातो. त्यानंतर पुन्हा नवे कीट घेतले जातेअंत्यसंस्कार झाल्यानंतर स्मशानभूमी परिसराचे औषध फवारणी करुन निर्जंतुकीकरण केले जाते

राकेश कदम 

सोलापूर : जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार कोरोनाग्रस्त व्यक्तीवर सरकारी यंत्रणेकडून अंत्यसंस्कार करण्यात येतात. सोलापुरात आजवर सहा व्यक्तींचे निधन झाले. या मृतदेहांचे दहन आणि दफन करण्याचे काम मनपाचे आरोग्याधिकारी डॉ. संतोष नवले आणि त्यांच्या सहकाºयांनी केले आहे. त्यासाठी त्यांनी रात्री-अपरात्रीची, जीवाची पर्वा केली नाही. मनपाचे कर्मचारी, अधिकारी मृत व्यक्तींचे अखेरचे सोबती ठरले आहेत. 

कोरोनाग्रस्त व्यक्तीवर धार्मिक परंपरेनुसार अंत्यसंस्कार करण्यात येतात. या अंत्यसंस्काराची जबाबदारी मनपावर सोपवण्यात आली आहे. मृत व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्ती, नातेवाईक यापैकी एक-दोन लोकांना सोबत घेतले जाते. स्मशानात मनपाचे चार-पाच कर्मचारी, आरोग्य अधिकारी असतात. बाजूला पोलिसांची व्हॅन थांबलेली असते. 

 कोरोनाचा पहिला बळी ठरलेल्या व्यक्तीचे दफन करण्यात आले. त्यासाठी कर्मचाºयांनी स्मशानभूमीत जेसीबीने खड्डा खोदून घेतला. खड्ड्यात औषधे टाकून निर्जंतुकीकरण करुन घेतले. मृतदेहावर औषधांची फवारणी केली. कर्मचाºयांवर कोरोनाची दहशत होती. त्यांचे मनोबल वाढवण्याचे काम आरोग्याधिकारी संतोष नवले, नागेश मेंडगुळे, नगरसेवक बाबा मिस्त्री आदींनी केले. दफन होईपर्यंत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मनपा आयुक्त दीपक तावरे जागेच होते. त्यानंतर चार दिवसांनी आणखी एकाचे दफन करण्यात आले. चार मृतदेहांचे मोदी स्मशानभूमीच्या विद्युत दाहिनीत दहन करण्यात आले आहे. यावेळी आरोग्य अधिकाºयांसह मनपाच्या विद्युत विभागाचे प्रमुख राजेश परदेशी, कल्याणी बिराजदार व इतर कर्मचारी हजर राहिले.

नातेवाईकांची अशीही भूमिकाच्काही मृत व्यक्तींच्या कुटुंबातील लोक सोबत येण्याचा हट्ट धरतात तर काही लोक तुमचे तुम्ही बघा, असेही सांगून टाकत आहेत. या मृतांसाठी मनपाचे अधिकारीच अखेरच्या प्रवासातील सोबती ठरले. अंत्यसंस्कार पूर्ण होईपर्यंत आयुक्त तावरे, उपायुक्त पवार यांच्यासह इतर अधिकारी सतत संपर्कात असतात. पीपीई कीटचा एकदाच वापर- अंत्यसंस्कार करताना मनपाचे अधिकारी, कर्मचारी पीपीई कीटचा वापर करतात. एकदाच या कीटचा वापर केला जातो. त्यानंतर पुन्हा नवे कीट घेतले जाते. अंत्यसंस्कार झाल्यानंतर स्मशानभूमी परिसराचे औषध फवारणी करुन निर्जंतुकीकरण केले जाते. 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस