शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
5
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
6
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
7
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
8
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
9
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
10
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
11
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
12
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
13
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
14
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
15
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
16
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
17
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
18
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
19
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
20
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध

विकासासाठी योगदान द्या; गाव डोक्यावर घेईल ; यजुर्वेद महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 14:49 IST

सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टिक व थर्माकॉल निर्मूलन या विषयावर जिल्हास्तरावर कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले़

ठळक मुद्दे प्लास्टिकमुळे मुक्या प्राण्यांचे जीव धोक्यात - सीईओ डॉ. भारुड सोलापूर जिल्ह्यात १३०० गाव वाड्या-वस्त्या - सीईओ डॉ. भारुड गावचा विकास करण्यासाठी मनापासून योगदान द्या - महाजन

सोलापूर :  सरपंच आणि पदाधिकाºयांनी आयुष्यात मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन गावाचे खºया अर्थाने नेतृत्व करावे. गावचा विकास करण्यासाठी मनापासून योगदान द्या. निश्चितच गाव तुम्हाला डोक्यावर घेईल, असे प्रतिपादन दीपस्तंभ फाउंडेशन (जळगाव)चे संस्थापक यजुर्वेद महाजन यांनी केले. 

जिल्हा परिषदेच्या वतीने सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टिक व थर्माकॉल निर्मूलन या विषयावर जिल्हास्तरावर कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. पहिली कार्यशाळा  जुळे सोलापुरातील जामगुंडी मंगल कार्यालयात घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. 

जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते बळीराम साठे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अनिल नवाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) विजय लोंढे, जि. प. सदस्या विद्युल्लता कोरे, दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड, उत्तर सोलापूर पंचायत समितीच्या उपसभापती रंजना कांबळे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, दक्षिण सोलापूरचे गटशिक्षणाधिकारी धनंजय चोपडे, उत्तर सोलापूरचे मल्हारी बनसोडे आदी उपस्थित होते. या कार्यशाळेला दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, विस्तार अधिकारी, शाळा केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, ग्रामसेवक, अंगणवाडी पर्यवेक्षक, पर्यवेक्षिका, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आदी उपस्थित होते.महाजन म्हणाले, आज जे स्वप्न बघत नाहीत ते काहीच करू शकत नाहीत. गावचे सरपंच, उपसरपंच व पदाधिकारी यांनी आपल्या गावाच्या विकासाचे स्वप्न पाहावे आणि गावातील सांडपाणी व घनकचºयाचे सुयोग्य व्यवस्थापन करून आपले गाव स्वच्छ, सुंदर ठेवण्याचा ध्यास घ्यावा.  सूत्रसंचालन सहशिक्षक जीवराज खोबरे यांनी केले.

वडाळ्याचा आदर्श घ्या : भारुड सीईओ डॉ. भारुड म्हणाले, पदाधिकाºयांनी गावात सांडपाणी व घनकचºयाचे व्यवस्थापन चांगले करून प्लास्टिक बंदीची सुरुवात करायला हवी. कारण प्लास्टिकमुळे मुक्या प्राण्यांचे जीव धोक्यात आले आहेत. सोलापूर जिल्ह्यात १३०० गाव वाड्या-वस्त्या आहेत. यामध्ये सांडपाण्यासाठी ३० हजारांपेक्षा जास्त शोषखड्डे घेण्यात आले आहेत. ५० गावे गटार व डासमुक्त झाली आहेत. विशेषत: विरोधी पक्षनेते बळीरामकाका साठे यांच्या नेतृत्वाखाली वडाळा गावात एकूण १०१० कुटुंबांकडे १०३० इतके शोषखड्डे तयार करण्याचे अद्भुत काम केले आहे. या कामाचाही आदर्श समोर ठेवा. सोलापूर जिल्ह्यात एकही डास न दिसण्यासाठी गाव स्वच्छ व सुंदर असले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषद