शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

विकासासाठी योगदान द्या; गाव डोक्यावर घेईल ; यजुर्वेद महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 14:49 IST

सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टिक व थर्माकॉल निर्मूलन या विषयावर जिल्हास्तरावर कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले़

ठळक मुद्दे प्लास्टिकमुळे मुक्या प्राण्यांचे जीव धोक्यात - सीईओ डॉ. भारुड सोलापूर जिल्ह्यात १३०० गाव वाड्या-वस्त्या - सीईओ डॉ. भारुड गावचा विकास करण्यासाठी मनापासून योगदान द्या - महाजन

सोलापूर :  सरपंच आणि पदाधिकाºयांनी आयुष्यात मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन गावाचे खºया अर्थाने नेतृत्व करावे. गावचा विकास करण्यासाठी मनापासून योगदान द्या. निश्चितच गाव तुम्हाला डोक्यावर घेईल, असे प्रतिपादन दीपस्तंभ फाउंडेशन (जळगाव)चे संस्थापक यजुर्वेद महाजन यांनी केले. 

जिल्हा परिषदेच्या वतीने सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टिक व थर्माकॉल निर्मूलन या विषयावर जिल्हास्तरावर कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. पहिली कार्यशाळा  जुळे सोलापुरातील जामगुंडी मंगल कार्यालयात घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. 

जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते बळीराम साठे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अनिल नवाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) विजय लोंढे, जि. प. सदस्या विद्युल्लता कोरे, दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड, उत्तर सोलापूर पंचायत समितीच्या उपसभापती रंजना कांबळे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, दक्षिण सोलापूरचे गटशिक्षणाधिकारी धनंजय चोपडे, उत्तर सोलापूरचे मल्हारी बनसोडे आदी उपस्थित होते. या कार्यशाळेला दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, विस्तार अधिकारी, शाळा केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, ग्रामसेवक, अंगणवाडी पर्यवेक्षक, पर्यवेक्षिका, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आदी उपस्थित होते.महाजन म्हणाले, आज जे स्वप्न बघत नाहीत ते काहीच करू शकत नाहीत. गावचे सरपंच, उपसरपंच व पदाधिकारी यांनी आपल्या गावाच्या विकासाचे स्वप्न पाहावे आणि गावातील सांडपाणी व घनकचºयाचे सुयोग्य व्यवस्थापन करून आपले गाव स्वच्छ, सुंदर ठेवण्याचा ध्यास घ्यावा.  सूत्रसंचालन सहशिक्षक जीवराज खोबरे यांनी केले.

वडाळ्याचा आदर्श घ्या : भारुड सीईओ डॉ. भारुड म्हणाले, पदाधिकाºयांनी गावात सांडपाणी व घनकचºयाचे व्यवस्थापन चांगले करून प्लास्टिक बंदीची सुरुवात करायला हवी. कारण प्लास्टिकमुळे मुक्या प्राण्यांचे जीव धोक्यात आले आहेत. सोलापूर जिल्ह्यात १३०० गाव वाड्या-वस्त्या आहेत. यामध्ये सांडपाण्यासाठी ३० हजारांपेक्षा जास्त शोषखड्डे घेण्यात आले आहेत. ५० गावे गटार व डासमुक्त झाली आहेत. विशेषत: विरोधी पक्षनेते बळीरामकाका साठे यांच्या नेतृत्वाखाली वडाळा गावात एकूण १०१० कुटुंबांकडे १०३० इतके शोषखड्डे तयार करण्याचे अद्भुत काम केले आहे. या कामाचाही आदर्श समोर ठेवा. सोलापूर जिल्ह्यात एकही डास न दिसण्यासाठी गाव स्वच्छ व सुंदर असले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषद