शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

"काँग्रेसचे नेते संधिसाधू, गरिबांच्या समस्येबद्दल त्यांना काहीही देणं-घेणं नाही", माधवी लतांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 14:03 IST

विश्व हिंदू परिषदेच्यावतीने रविवारी (ता. १०) माधवनगर पटांगणात आयोजित लोकजागर अभियानात माधवी लता बोलत होत्या. 

सोलापूर : काँग्रेसचे नेते संधिसाधू, अवसरवादी आहेत. त्यांना गरिबांच्या समस्येबद्दल काहीही देणे घेणे नाही, अशी टीका हिंदुत्ववादी नेत्या माधवी लता यांनी रविवारी केली. विश्व हिंदू परिषदेच्यावतीने रविवारी (ता. १०) माधवनगर पटांगणात आयोजित लोकजागर अभियानात माधवी लता बोलत होत्या. 

त्या म्हणाल्या, काँग्रेसच्या सर्व नेत्यांना जहागीरदारीतून सत्ता मिळाली. या नेत्यांना काहीही कमवावे लागले नाही. वरपासून खालपर्यंत सर्व नेते जहागीरदारीचे साम्राज्य चालवतात. गरिबाच्या घरात अन्न गेले आहे की नाही, त्यांना रोजगार मिळतोय की नाही याबद्दल त्यांना काहीही देणे घेणे नसते. केवळ ते जहागीरदारीची परंपरा चालवत आहेत. ज्यांना देशाची संस्कृती माहिती नाही, त्या लोकांच्या हातात अनेक वर्षे सत्ता राहिली. त्यामुळे संस्कृतीचा ऱ्हास झाला असा दावाही माधवी लता यांनी केला.

यावेळी परिषदेचे प्रांत सदस्य लक्ष्मण चव्हाण, संपर्कप्रमुख पुरुषोत्तम उडता, विभाग सहमंत्री विजयकुमार पिसे, खजिनदार हितेश माधू, जिल्हा मंत्री संजय जमादार आणि बजरंग दलाचे जिल्हा सहसंयोजक नागेश बंडी धर्मप्रसार प्रमुख रवी बोल्ली आदी उपस्थित होते. 

हैदराबादेत वक्फ बोर्डाच्या मालमत्तांचा भ्रष्टाचारहैदराबाद शहरात वक्फ बोर्डाच्या जमिनीवर गरिबांच्या वस्ती आहेत. या मालमत्ता ताब्यात घेऊन काही लोकांनी टोलेजंग इमारती उभारल्या आहेत. यातून केवळ गरिबांचे नुकसान झाले. जमिनी लाटणाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पैसे कमावले. हे थांबवण्याची हिंमत कोणामध्येही नाही, असे माधवी लता म्हणाल्या.

यावर कधी बोलणार?माधवी लता म्हणाल्या, काही लोक पाकिस्तान आणि बांगलादेशातून होणाऱ्या घुसखोरीविरोधात कधीच बोलत नाहीत. ब्रिटिशांनंतर भारतातील ब्रिटिश विचारांच्या लोकांनी भारतावर ६० वर्षे राज्य केले. तसेच, वक्फ बोर्डाच्या नावाखाली अनेक जमिनी विकल्या गेल्या. त्यावर कधी बोलणार आहात? असा सवालही माधवी लता यांनी केला.

टॅग्स :Solapurसोलापूर