शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

तिरंगी लढतीत काँग्रेस-सेना युतीचा विजय

By admin | Updated: February 24, 2017 18:42 IST

करमाळा : पंचायत समितीवर भगवा फडकला

सोलापूर इलेक्शन : तिरंगी लढतीत काँग्रेस-सेना युतीचा विजयनासीर कबीर - आॅनलाईन लोकमत करमाळातिरंगी लढतीत करमाळा तालुका पंचायत समितीवर भगवा फडकला असून, आ.नारायण पाटील व माजी आ.जयवंतराव जगताप यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना व काँग्रेस युतीने जिल्हा परिषदेत पाच पैकी चार गटात विजय मिळवला असून, पंचायत समितीमध्ये दहा पैकी आठ जागा पटकावल्या आहेत. बागल गटाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्हा परिषदेचा एक गट तर पंचायत समितीच्या दोन गणावर विजय मिळाला आहे. संजय श्ािंदे यांच्या नेतृत्वाखालील भाजपा, रासप, स्वाभिमानी पक्ष या आघाडीला एकही जागा मिळवता आली नाही.जिल्हा परिषदेच्या महिला राखीव पांडे गटात अटीतटीची लढत होऊन राष्ट्रवादी काँगे्रसच्या जातेगावच्या सरपंच राणी संतोष वारे विजयी झाल्या असून, काँग्रेस आयच्या सुजाता दादा जाधव व भाजपाच्या रोहिणी दत्तात्रय रेगुडे यांना पराभव पत्करावा लागला आहे. रावगाव गणात काँग्रेसच्या गुणमाला संतोष शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वाती विलास मुळे व भाजपाच्या अश्विनी सुजित बागल यांच्यात लढत होऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वाती मुळे विजयी झाल्या आहेत. पांडे पंचायत समितीच्या सर्वसाधारण गणात अपक्ष अ‍ॅड. राहुल सावंत यांनी बाजी मारली आहे. अ‍ॅड. सावंत यांना शिवसेना व काँग्रेसने पुरस्कृत केले होते. या गणात राष्ट्रवादी काँग्रेसचे विनय ननवरे व अपक्ष उमेदवार पाडळीचे सरपंच गौतम ढाणे दुसरे संजय श्ािंदे यांच्या गटाचे अपक्ष उमेदवार शहाजी झिंजाडे या तिघात मतविभागणी झाली आहे.जिल्हा परिषदेच्या महिला राखीव वीट गटात शिवसेनेच्या लक्ष्मी जनार्दन आवटे या विजयी झाल्या असून, या गटात ऐन निवडणुकीच्या तोंडावर मंदाकिनी बाळनाथ जगदाळे यांनी बागल गटाला सोडचिठ्ठी देत संजय शिंदे गटात प्रवेश करून उमेदवारी मिळवली होती,या गटातसुद्धा मतविभागणीचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्षा दादासाहेब चौगुले यांना बसला आहे. कुंभेज गणात विजयी झालेले शिवसेनेचे अतुल प्रतापराव पाटील, जेऊर गणात उभे राहण्यास इच्छुक होते पण आ.पाटील यांनी कुंभेज गण इतर मागासवर्ग राखीव असल्याने पै.अतुल यांना संधी देऊन निवडून आणले. या गणात सतीश नीळ यांनासुद्धा मतविभागणीचा फटका सहन करावा लागला आहे.वीट गणात उमेदवार निवडीवरून राष्ट्रवादीत नाराजी होती तेथे तिरंगी लढतीत मतविभागणीचा फायदा शिवसेनेचे गहिनीनाथ चंद्रसेन ननवरे यांना झाला आहे. जिल्हा परिषदेच्या महिला राखीव कोर्टी गटात शिवसेनेच्या सवितादेवी राजेभोसले व राष्ट्रवादी काँग्रेसच्या माया झोळ यांच्यात चुरशीची लढत होऊन सवितादेवी राजेभोसले विजयी झाल्या. माया झोळ व आघाडीतील भाजपाच्या स्वाती झोळ यांचा मतविभागणीमुळेच पराभव झाला आहे.केत्तूर गणात काँग्रेस आयच्या मंदाकिनी नागनाथ लकडे यांना शिवसेना-काँग्रेस युतीमुळे विजय मिळाला असून राष्ट्रवादीच्या ठकुबाई रामचंद्र येडे,भाजपाच्या भाग्यश्री राजेंद्र वारगड पराभूत झाल्या आहेत.कोर्टी गणात मात्र शिवसेनेच्या विठाबाई भानुदास अभंग पराभूत झाल्या असून, राष्ट्रवादीच्या स्वाती अशोक जाधव १७१ मतांनी विजयी झाल्या. तिरंगी लढतीत मतविभागणीचा फटका अभंग यांना बसला आहे. वांगी व केम जिल्हा परिषदेच्या गटात आ.नारायण पाटील यांचे परंपरागत वर्चस्व असल्याने व माजी आ.जयवंतराव जगताप यांच्याबरोबर युती झाल्याने वांगी जिल्हा परिषदेच्या गटात शिवसेनेचे नीलकंठ तुकाराम देशमुख व केम गटातून शिवसेनेचे अनिरुद्ध विठ्ठल कांबळे अपेक्षेप्रमाणे विजयी झाले आहेत.वांगी गणात केशर भानुदास चौधरी या शिवसेना उमेदवार विजयी झाल्या आहेत. साडे महिला राखीव पंचायत समिती गणात आघाडीतील स्वाभिमानीच्या उमेदवार सुवर्णा विलास राऊत व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नीता बाळकृष्ण घाडगे यांच्यात मतविभागणी होऊन शिवसेनेच्या साडे ग्रा.पं.च्या सरपंच जयाबाई दत्तात्रय जाधव अपेक्षे प्रमाणे विजयी झाल्या आहेत.--------------------पक्षीय बलाबलआ. नारायण पाटील यांची शिवसेना,माजी आ.जयवंतराव जगताप यांची काँगे्रस आय अशी युती करमाळा तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये झाली होती. या युतीमधून जिल्हा परिषदेत पाच गटांपैकी शिवसेनेला वांगी,केम,वीट,कोर्टी या चार गटात विजय मिळाला तर बागल गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एकमेव पांडे गटात विजय मिळाला आहे. पंचायत समितीच्या दहा गणापैकी शिवसेनेला कुंभेज, वीट, जेऊर, वांगी, केम, साडे असे सहा तर राष्ट्रवादी काँग्रेसला रावगाव,कोर्टी हे दोन व काँग्रेस आयकडे केत्तूर व पांडे गण काँग्रेस आय पुरस्कृत अपक्ष. पंचायत समितीमध्ये बागल गटाची सलग वीस वर्षांपासून सत्ता अबाधित होती.या निवडणुकीत बागल गटाला सत्ता गमवावी लागली.-------------------पराभव मान्य : बागलजिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत सुगीमुळे कमी मतदान झाले.सर्वच मतदारापर्यंत आम्ही पोहोचू शकलो नाही. तरीसुद्धा झालेला पराभव आम्हास मान्य असून पराभवाचे आत्मपरीक्षण करून पुन्हा नव्याने जोमाने जनता जनार्दनाच्या कामाला लागू, असे मकाई सह.साखर कारखान्याचे अध्यक्ष व बागल गटाचे नेते दिग्विजय बागल यांनी सांगितले.----------------------विकासकामामुळेच विजय : नारायण पाटीलगेल्या दोन वर्षांत आमदारकीच्या काळात तालुक्यातील दहिगाव उपसा सिंचन योजना,कुकडीचे पाणी ,सीना-कोळगाव सिंचन आदी प्रश्नासह रस्ते,वीज,पाणी हे मूलभूत प्रश्न सोडवल्याने यश संपादन करता आले असे आ.नारायण पाटील यांनी सांगितले.----------------------बागलांनी जनतेला फसवले : जयवंतराव जगतापगोड-गोड बोलून..आश्वासने देऊन बागल गटाने तालुक्यातील सत्ता आजपर्यंत घेतली पण कोणतेच आश्वासन पूर्ण न केल्याने जनतेने आता बागल गटास ओळखले आहे, त्याचाच परिणाम म्हणून गेल्या वीस वर्षांपासून असलेली पंचायत समितीची सत्ता आज गेली असे माजी आ.जयवंतराव जगताप यांनी सांगितले.