शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

संगणकाच्या युगात तरुणाईला पडतोय संस्काराचा विसर : अप्पासाहेब खोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 14:43 IST

जनता सहकारी बँक सांस्कृतिक मंडळातर्फे गणेशोत्सवानिमित्त व्याख्यानमाला

ठळक मुद्देप्रा. खोत यांनी अस्सल ग्रामीण भाषेत ‘गॅदरिंगचा पाहुणा’ ही कथा ढंगदार शैलीत सांगत उपस्थितांना खळखळून हसविलेकथाकथनाच्या माध्यमातून त्यांनी परिसरातील छोट्या-मोठ्या गोष्टी विनोदी शैलीत मांडल्या

सोलापूर : संगणक, मोबाईलच्या युगामध्ये प्रगती झाली; मात्र संस्कार, मूल्य, आपुलकीबाबतची स्थिती चिंताजनक आहे. आई-वडिलांना नमस्कार करणे, त्यांच्याबद्दल आदरभाव जपण्याचे संस्कारमूल्य सध्याची तरुणाई विसरत चालली आहे, असे प्रतिपादन ग्रामीण कथाकथनकार प्रा. अप्पासाहेब खोत यांनी केले.

जनता सहकारी बँक सांस्कृतिक मंडळातर्फे गणेशोत्सवानिमित्त हुतात्मा स्मृती मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रा. खोत बोलत होते. ‘कथाकथन’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला बँकेचे संचालक प्रमोद भुतडा यांनी प्रा. खोत यांचे स्वागत केले. 

प्रा. अप्पासाहेब खोत म्हणाले, झाड, वेलीवरील फुलांचा सुगंध हवेत पसरतो, वाळल्यानंतर ती मातीवर पडल्यावरही त्या सुगंध देत असतात. ज्या मातीत रुजलो, वाढलो, त्यासही सुगंधी करण्याचा आदरभाव झाड, फुलांकडून शिकण्यासारखा आहे. विविध क्षेत्रात कर्तृत्वाने मोठी झालेली व्यक्ती मातीचे ऋण फेडण्यासाठी अव्याहतपणे प्रयत्न करतात. यामुळे ते यशस्वी होण्यासोबत लौकिकही मिळवतात. या मोठ्या माणसाचे कार्य हे झाड व फुलांसारखे आहे. त्यांच्या प्रमाणे माणूस म्हणून जगताना आपण इतरांना काय दिले? याबाबत आत्मचिंतन करून सकारात्मक कृतीशीलता जपणे महत्त्वाचे आहे.  माय-माती या शब्दामध्ये वेलांटीचा फरक असून दोघांचे ऋण फेडणे हे माणसांचे आद्य कर्तव्य आहे. या दोघांचे स्थान आपल्या आयुष्यात खूप वरचे आहे. त्यांच्यामुळेच जीवनाला अर्थ मिळत असल्याने त्यांचा आदर राखायलाच हवा.

प्रा. खोत यांनी अस्सल ग्रामीण भाषेत ‘गॅदरिंगचा पाहुणा’ ही कथा ढंगदार शैलीत सांगत उपस्थितांना खळखळून हसविले. कथाकथनाच्या माध्यमातून त्यांनी परिसरातील छोट्या-मोठ्या गोष्टी विनोदी शैलीत मांडल्या. 

टॅग्स :SolapurसोलापूरdigitalडिजिटलEducationशिक्षण