शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

अपघाती मृत्यूप्रकरणी विमा कंपनीस नुकसानभरपाईचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 13:06 IST

महालोकअदालत, वारसांना ८ लाख रूपये देण्याचे विमा कंपनीस बजावले

ठळक मुद्देन्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीस ८ लाख रुपये मयताच्या वारसांना देण्याचा आदेशमहालोकअदालतीमध्ये वाय. जी. देशमुख यांच्यासमोर ही सुनावणी झाली

सोलापूर: पत्नीच्या अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या रिक्षाचालक, मालकासह इन्शुरन्स कंपनीविरुद्ध दाखल झालेल्या खटल्यात सोलापूर मोटार अपघात न्यायप्राधिकरणाने यामध्ये न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीस ८ लाख रुपये मयताच्या वारसांना देण्याचा आदेश बजावला. महालोकअदालतीमध्ये वाय. जी. देशमुख यांच्यासमोर ही सुनावणी झाली.

यातील मयत लक्ष्मी लिंगराज पल्लोलू या २४ आॅक्टोबर २०१५ रोजी सायंकाळी ४.३० च्या सुमारास कुमठा नाका येथून सिव्हिल हॉस्पिटलकडे नातेवाईकांना भेटण्यासाठी एम. एच. १३ जी ८५१५ या रिक्षातून जात होत्या. गेंट्याल टॉकीजजवळ रिक्षाचालक निसार अहमद रशीदखान (रा. ५, पोलीस मुख्यालय, सोलापूर) याने निष्काळजीपणे वाहन चालवल्याने त्याने दुभाजकाला धडक दिल्याने रिक्षा उलटली. यात लक्ष्मी पल्लोलू या गंभीर जखमी होऊन मृत्यू पावल्या. यामुळे मयताची वारस मुले अंबादास (वय १५), अक्षय (१४), सुनील (वय १२), अंजली (वय ६ वर्षे) यांचे अज्ञान पालनकर्ते लिंगराज पल्लोलू यांनी अ‍ॅड. श्रीनिवास कटकूर यांच्यामार्फत सोलापूर जिल्हा मोटार अपघात न्यायप्राधिकरण यांच्या न्यायालयात १० लाख रुपये नुकसानभरपाईसाठी दावा दाखल केला. 

न्यायालयाने रिक्षाचालक, मालक व न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीला न्यायालयात हजर राहण्याचा आदेश बजावला. याकामी वारसातर्फे अ‍ॅड. श्रीनिवास कटकूर, अ‍ॅड. दीपक मैंदरकर, अ‍ॅड. किरण कटकूर, अ‍ॅड. मयूरेश शिंदे यांनी तर इन्शुरन्स कंपनीतर्फे अ‍ॅड. जी. एच. कुलकर्णी यांनी काम पाहिले. याकामी वारसातर्फे अ‍ॅड. श्रीनिवास कटकूर, अ‍ॅड. दीपक मैंदरकर, अ‍ॅड. किरण कटकूर, अ‍ॅड. मयुरेश शिंदे यांनी तर इन्शुरन्स कंपनीतर्फे अ‍ॅड. जी. एच. कुलकर्णी यांनी काम पाहिले. 

टॅग्स :SolapurसोलापूरCourtन्यायालयAccidentअपघात