शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

मोदींना घालवणे हाच सर्वसामान्यांचा अजेंडा : कुमार सप्तर्षी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 14:44 IST

मतदारांनो शांत राहा, विचार करा, मतदानातून देशाची व्यवस्था सुधारायची आहे़ मतदानाची टक्केवारी वाढवायची आहे असे आवाहन कुमार सप्तर्षी यांनी केले.

ठळक मुद्दे‘मन की बात’ ही मोदींची नव्हे तर हिटलर यांचीच होती - डॉ. कुमार सप्तर्षीमतदारांनो शांत राहा, विचार करा, मतदानातून देशाची व्यवस्था सुधारायची आहे - डॉ. कुमार सप्तर्षी

सोलापूर : हिंदू राष्ट्र येणार नव्हते तर ७९ वर्षीय महात्मा गांधींना मारुन काय फायदा झाला? उलट धर्म, जात आड न येता बंधुता आणण्याचा प्रयत्न झाला़  धर्माला राजकारणात ओढण्याचे काही कारण नाही़ तरीही ओढलं जातंय. लोकशाही टिकवायची असेल तर मोदींना घालवणे हाच सर्वसामान्यांचा अजेंडा राहील, अशी टीका युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांनी केली.

मतदार जागृती परिषदेच्या वतीने हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या अ‍ॅम्फी थिएटर येथे आयोजित केलेल्या ‘लोकशाही निवडणूक २०१९ आणि देशासमोरील आव्हाने’ या विषयावर डॉ़ सप्तर्षी बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर कार्यवाह  संदीप बर्वे, माजी प्राचार्य नरेंद्र बदनोरे, अ‍ॅड़ गोविंद पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हेमू चंदेले यांची प्रमुख उपस्थिती होती.

‘मन की बात’ ही मोदींची नव्हे तर हिटलर यांचीच होती, असा आरोप करून डॉ. सप्तर्षी म्हणाले, मतदारांनो शांत राहा, विचार करा, मतदानातून देशाची व्यवस्था सुधारायची आहे़ मतदानाची टक्केवारी वाढवायची आहे. 

आजचे राजकारण हे चिखल झाले आहे आणि चिखलातच कमळ उगवते़ आज कमळ निवडून दिलात तर देशाचे भवितव्य अवघड आहे़ आज संविधानाला जोडून दुसरे संविधान आणू पाहत आहेत़ अभूतपूर्व घटना घडण्याचा काळ आणला आहे़ लोकशाहीला ग्रहण लावण्याचा प्रयत्न होतोय.

प्रास्ताविक अ‍ॅड़ गोविंद पाटील यांनी केले़ प्रा. बदनोरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून लोकशाहीची सध्यस्थिती मांडत ती बळकट करण्यावर कसे प्रयत्न करता येतील यावर भाष्य केले.

सूत्रसंचालन बागवान यांनी केले तर आभार  सुभाष शास्त्री यांनी मानले. यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ धनंजय माने, रवींद्र मोकाशी, चंदुभाई देढिया, डॉ़ श्रीकांत येळेगावकर, केशव इंगळे यांच्यासह असंख्य मान्यवर उपस्थित होते़ 

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsolapur-pcसोलापूरElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग