शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

दिलासादायक बातमी; सोलापुरात कोरोनातून बरे होण्याचा दर ५४.६४ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 10:42 IST

३६ टक्के रुग्णांवर उपचार; प्लाझ्मा थेरपी, अँटीजेन टेस्टचाही होणार लाभ

ठळक मुद्देसर्दी, खोकला घसा दुखणे असे त्रास झाल्यास त्वरित तपासणी करुन घ्यायला हवीकोरोनाने मृत झालेल्या ७२ टक्के रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब, मूत्रपिंड आणि हृदयाचे विकार आजार असलेल्या रुग्णांनी अधिक काळजी घेऊन रक्तदाब व मधुमेह नियंत्रणात ठेवल्यास ते पूर्णपणे बरे होऊ शकतात.

सोलापूर : शहर आणि जिल्ह्यामध्ये कोरोना आजाराचे रुग्ण वाढत आहेत. त्याचबरोबर रुग्ण बरे होण्याच्या संख्येतही वाढ होत आहे. कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी ५४.६४ टक्के बाधित या आजारातून बरे झाले आहेत. तर साधारणपणे ३६ टक्के रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांचे प्रमाण हे जवळपास १० टक्के इतके आहे. तर या आजारातून बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे. जिल्ह्यामध्ये एकूण दोन हजार ७२७ इतके कोरोनाचे रुग्ण असून एक हजार ४९० रुग्ण हे बरे होऊन घरी परतले आहेत. तर २७३ जणांचा मृत्यू झाला. 

सोलापूर जिल्ह्यातील कोरोना आजाराचा पहिला रुग्ण हा १२ एप्रिल रोजी आढळला. त्यापूर्वी एक महिना आधी १२ मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयामध्ये फीव्हर ओपीडी सुरु करण्यात आली. येथे २४ तास स्क्रीनिंग सुरु असून आत्तापर्यंत १७ हजार ७९ रुग्णांची तपासणी करण्यात आली. संशयितांना क्वारंटाईन, कोरोना आजार असलेल्यांना आयसोलेट करण्यात आले तर कोरोना आजार नसलेल्या नागरिकांना घरी पाठवले.

शहर व जिल्ह्यामध्ये सर्वेक्षण सुरू असून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. प्रशासनातर्फे रॅपीड अँटीजन टेस्ट सुरु करण्यात येणार आहे. यामुळे कोरोना आजाराचे रुग्ण लवकर शोधून त्यांच्यावर वेळेवर उपचार करता येणे शक्य होईल.

पीएम केअर फंडातून नऊ व्हेंटिलेटरसिव्हिल रुग्णालयाला पीएम केअर फंडातून नऊ व्हेंटिलेटर मिळाले आहेत. सिव्हिलकडे यापूर्वी १८ व्हेंटिलेटर होते, आता यात वाढ होऊन व्हेंटिलेटरची संख्या २७ होणार आहे. यामुळे अतिगंभीर रुग्णांचे अधिक चांगले उपचार करणे शक्य होईल. तंत्रज्ञामार्फत हे व्हेंटिलेटर रुग्णालयात बसविण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. रेमडीसीवीर, टोसिलोझुमॅब, फॅव्हीपीरॅवीर या नव्या औषधांचा वापर सिव्हिलमध्ये करण्यात येत आहे. तसेच प्लाझ्मा थेरपीची सुरुवात ही करण्यात आली असून यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर आणखी वाढणार आहे.

रुग्ण बरा होण्याचा दर वाढवता येणे शक्य आहे. यासाठी नागरिकांनी फिजिकल डिस्टन्स, मास्कचा वापर, वारंवार हात धुणे, फक्त गरजेच्या वेळीच घराबाहेर पडणे ही काळजी घेणे आवश्यक आहे. सर्दी, खोकला घसा दुखणे असे त्रास झाल्यास त्वरित तपासणी करुन घ्यायला हवी. कोरोनाने मृत झालेल्या ७२ टक्के रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब, मूत्रपिंड आणि हृदयाचे विकार होते. हे आजार असलेल्या रुग्णांनी अधिक काळजी घेऊन रक्तदाब व मधुमेह नियंत्रणात ठेवल्यास ते पूर्णपणे बरे होऊ शकतात.- डॉ. राजेश चौगुले, सहायक वैद्यकीय अधीक्षक, जनऔषध वैद्यकशास्त्र तज्ज्ञ

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल