शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

 दिलासादायक; राज्यात अहमदनगर बाजार समितीत कांद्याला पाच हजारी भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 16:59 IST

सर्वाधिक दर : राज्यात सर्वच बाजार समित्यामध्ये विकतोय चार हजाराने कांदा

सोलापूर: राज्यात सर्वच बाजार समितीत कांद्याची आवक कमी होत असल्याचे दरात सुधारणा होत आहे. दरम्यान अहमदनगर बाजार समितीत शनिवारी क्विंटलला सर्वाधिक पाच हजाराचा भाव मिळाला.

यावर्षी काही जिल्ह्यात सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यात झालेल्या संततधार व अतिवृष्टीमुळे कांदा पीकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. हा फटका सोलापूर जिल्ह्याला सर्वाधिक बसला होता. त्यामुळे सोलापूरसह काही जिल्ह्यातील कांद्याचे पीक शेतकर्यांच्या हाती लागले नाही. अशातही औषधावर मोठा खर्च करुन शेतकर्यांनी कांदा आणला. उशिराने लागवड झालेला कांदा हाती लागला माञ हे क्षेत्र फारच कमी आहे.

शनिवारी अहमदनगर बाजार समितीत २३ हजार ८९२ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. कमीतकमी एक हजार तर सर्वाधिक पाच हजाराचा भाव मिळाला. पिंपळगाव बसवंत बाजार समितीत क्विंटल ला २४०० ते ४२९९ रुपये तर ३९५१ रुपये, उमराणा बाजार समितीत ११०० ते ४२०० तर सरासरी ३६०० रुपये, लासलगाव ८ हजार १७२ क्विंटल आवक तर १३०० ते ४३०० तर सरासरी चार हजार, चांदवड बाजार समितीत १३०० ते ३९२१ रुपये तर सरासरी ३७०० रुपये इतका दर मिळाला.

सोलापूर बाजार समितीत प्रति क्विंटल २००ते ४५०० रुपये तर सरासरी २८०० रुपयाने कांदा विकला.२७ हजार ८८५ क्विंटल कांद्याची आवक झाली. राज्यातील इतर बाजार समित्यांमध्येही चांगला दर मिळत असल्याचे सांगण्यात आले.

सोलापूर बाजार समितीत कांद्याची सर्वाधिक आवक

राज्यात अहमदनगर व सोलापूर बाजार समितीत कांद्याची सर्वाधिक आवक होते. माञ अहमदनगर बाजार समितीत कमीतकमी दर एक हजारापेक्षा कमी होत नाही. सोलापूर बाजार समितीत १०० रुपयापासुन कांद्याचे लिलाव होतो. सोलापूर बाजार समितीत दोन हजार रुपयापर्य॔तच मोठ्या प्रमाणावर कांद्याला दर मिळतो. दोन हजारापेक्षा अधिक दर फारच कमी कांद्याला मिळतो. त्यामुळे सोलापूर बाजार समितीत कांद्याला सरासरी दर सतत कमी असतो.

टॅग्स :SolapurसोलापूरAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीMarketबाजारonionकांदा