शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

थंडी वाढली.. घरोघरी सर्दीही सुरू झाली; चारचौघांत खोकताच भीतीही पसरली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 12:07 IST

दवाखान्यांमध्ये गर्दी : कोरोनाची भीती न बाळगता तपासणी करण्याचे आवाहन

ठळक मुद्देवातावरणातील बदलांमुळे शरीराचे तापमान स्थिर राहत नाहीशहरात सध्या थंडी, ताप, सर्दी, खोकला अशा रुग्णांचे प्रमाण वाढले यावेळी प्रतिकारशक्ती कमी होऊन, विषाणूंच्या संसर्गाचे प्रमाण वाढते

सोलापूर : शहरात सातत्याने होणाºया वातावरणातील बदलांमुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. हवेतील गारवा, आर्द्रता आणि मध्येच जाणवणारी उष्णता आणि धुळीचे कण यामुळे संसर्गजन्य आजारांचा जोर वाढल्याचे दिसून येत आहे. गेल्या आठवड्यापासून दुपारी कडक ऊन, संध्याकाळी ढगाळ आणि रात्री थंडी अशा वातावरणामुळे नागरिक आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे.

सर्दी, ताप आणि खोकल्याने अनेकजण बेजार आहेत. त्यामुळे क्लिनिकमध्ये रूग्णांची गर्दी दिसून येत आहे. सध्याचा कोरोना काळ असल्यामुळे अनेकांना या महामारीच्या संसर्गाचीही भीती वाटत आहे.  मात्र सर्दी खोकला झाला म्हणजे कोरोना झाला नसल्याचे वैद्यकीय तज्ञांनी सांगितले. मात्र तीन दिवसापेक्षा जास्त काळ हा आजार राहिला तर त्वरित टेस्ट करून घ्यावी, असे आवाहन डॉक्टरांनी केले.

सध्या सकाळच्या सत्रात कधी थंडी जाणवते तर कधी उकाडाही जाणवतो. अनेकांना हवामान बदलामुळे सर्दी आणि खोकल्याचा त्रास जाणवत आहे. ही लक्षणे किरकोळ असली तरी यातून अनेकांच्या मनामध्ये भीती निर्माण होत आहे. कमी वेळेत झालेल्या हवामानातील बदलांमुळे हवेतील विषाणूंच्या वाढीसाठी पोषक स्थिती निर्माण होते त्यामुळे संसर्गाचे प्रमाण वाढले आहे.

मुलं अन् ज्येष्ठांना त्रासकोरोनाचे रुग्ण वाढत असताना दुसरीकडे सर्दी, खोकल्याचे ही रुग्ण वाढत आहेत. वातावरणातील बदलामुळे बालकांसह नागरिकांचे आरोग्य बिघडत आहे. विशेषत: लहान मुलांना,ज्येष्ठ नागरिकामध्ये सर्दी, खोकल्याचा त्रास सहन करावा लागत आहे. यामधील बहुतांश रुग्ण हे व्हायरल फिव्हरचे आहेत.

वातावरणातील बदलांमुळे शरीराचे तापमान स्थिर राहत नाही. त्यातून शहरात सध्या थंडी, ताप, सर्दी, खोकला अशा रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. यावेळी प्रतिकारशक्ती कमी होऊन, विषाणूंच्या संसर्गाचे प्रमाण वाढते. तीन दिवसापेक्षा जास्त काळ हे आजार असतील तर तातडीने टेस्ट करून घ्या.- डॉ. विशाल गोरे 

टॅग्स :SolapurसोलापूरHealthआरोग्यhospitalहॉस्पिटलcorona virusकोरोना वायरस बातम्या