शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

स्वच्छता, सुरक्षा आणि भाविकांना सुविधांवर भर - पालकमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 13:02 IST

आषाढी वारी सोहळा आढावा बैठकीत पालकमंत्री विजय देशमुख यांची ग्वाही

ठळक मुद्देचंद्रभागेत आषढीवारीपूर्वी पाणी सोडण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतींना विशेष निधी देण्यासाठीचा प्रस्ताव

 पंढरपूर,   :-  आषाढी एकादशी -वारी सोहळयात वारक-यांना स्वच्छता, सुरक्षा आणि आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा  पुरविण्यात येतील, अशी ग्वाही पालकमंत्री विजय देशमुख यांनी  आज दिली.

 आषाढी एकादशी वारी सोहळ्यासाठीच्या तयारीसाठी आढावा घेण्यासाठी पालकमंत्री विजय देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली  श्री संत तुकाराम भवन येथे बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विठ्ठल-रुक्मिणी मंदीर समितीचे अध्यक्ष डॉ.अतुल भोसले, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, आमदार बबनदादा शिंदे, भारत भालके, प्रशांत परिचारक, नगराध्यक्षा साधना भोसले, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, पोलीस अधिक्षक एस. वीरेश प्रभू, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे उपस्थित होते.

            पालकमंत्री देशमुख  यांनी बैठकीत प्रथम संत संस्थान, पालखी सोहळा प्रमुख आणि विविध संघटनांचे म्हणने ऐकून घेतले. त्यानंतर ते बोलत होते. त्यांनी सांगितले, पंढरपूरात दरवर्षी भाविकांची संख्या वाढत जात आहे. मात्र या वाढत्या संक्ष्येने येणा-या भाविकांना सुविधा पुरवझ्यावर शासनाचा भर आहे. त्या अनुषंगाने प्रशासन आणि जिल्हा परिषद यांनी तयारी केली आहे.

            पालकमंत्री म्हणाले,  पालखी मार्गावरील गावांना दिला जाणारा निधी पंधरा दिवस अगोदर  देण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. आषाढी वारीसाठी पुरेसे वेळेत पाणी सोडले जाईल. त्यासाठी जलसंपदा विभागाच्या आवश्यक सूचना दिल्या जातील.

 जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी प्रदक्षिणा मार्गावर खडी असणार नाही. चंद्रभागेत आषढीवारीपूर्वी पाणी सोडण्याचा प्रयत्न करु. पंढरपुरला जोडले जाणारे सर्व रस्ते 30 जून पूर्वी सुस्थितीत ठेवण्यासाठी सूचना दिल्या जातील. पंढरपूर शहरातील अतिक्रमण हटविले जातील. रस्ते नीट केले जातील, असे सांगितले.

            ग्रामपंचायतींना विशेष निधी देण्यासाठीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्याचा पाठपुरावा केला जाईल. पालखी विश्वस्तांनी मांडलेल्या मुद्यांबाबत सर्व संबंधितांशी चर्चा केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

            यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख विकास ढगे, श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुख सुनिल मोरे, कार्यवाह अभिजीत मोरे, श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा प्रमुख संजयनाना धोंडगे, श्री संत सोपानकाका पालखी सोहळा प्रमुख गोपाळ गोसावी यांनी आपल्या मागण्या व समस्या मांडल्या.

यावेळी अन्नधान्य वितरण अधिकारी श्रीमंत पाटोळे, उपविभागीय अधिकारी सचिन ढोले, उपजिल्हाधिकारी मारुती बोरकर, शमा ढोक-पवार, प्रमोद गायकवाड, तहसिलदार रमा जोशी, बाई माने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील,  पंढरपूरचे मुख्याधिकारी अभिजीत बापट, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुमेध आणदूरकर, महावितरणचे मधुकर पडळकर, एस.टीचे विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड आदि उपस्थित होते.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpurपंढरपूरVijaykumar Deshmukhविजयकुमार देशमुख