शहरं
Join us  
Trending Stories
1
AirStrike on Pakistan: मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
3
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
4
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
5
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
6
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
7
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
8
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
9
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
10
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
11
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
12
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
13
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
14
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
15
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
16
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
17
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
18
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
19
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
20
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय

शहराला पाण्याची गरज १७० दशलक्ष लिटर्स

By admin | Updated: May 9, 2014 00:27 IST

निम्म्या पाण्याचा तुटवडा: वर्षभरात अतिरिक्त पाणी आणण्याचे नियोजन

निम्म्या पाण्याचा तुटवडा: वर्षभरात अतिरिक्त पाणी आणण्याचे नियोजन सोलापूर: सोलापूर शहराची सध्याची लोकसंख्या विचारात घेता प्रतिमाणसी १३५ लिटर्स या मानकाप्रमाणे पाणी देण्यासाठी १७० ते १७५ एमएलडी (दशलक्ष लिटर्स) एवढ्या पाण्याची गरज आहे; मात्र उजनी जलवाहिनी, टाकळी जलवाहिनी आणि हिप्परगा योजना याचा विचार करता अवघा ११० दशलक्ष लिटर्स पाणी उपसा केला जातो़ यातील एअर वॉल्व्हमधील गळत्या तसेच इतर गळत्या विचार करता दररोज ७५ एमएलडी पाणी देखील मिळत नाही़ त्यामुळे शहरात पाण्याचा तुडवडा असून अतिरिक्त पाणी आणण्याचे नियोजन सुरू असल्याचे मनपा प्रशासनाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे़महापालिकेचे प्रभारी सार्वजनिक आरोग्य अभियंता विजयकुमार राठोड यांनी प्रसिद्धीमाध्यमांना तसेच मनपा पदाधिकार्‍यांना पाणीपुरवठ्याबद्दल वस्तुस्थिती दर्शविणारी माहिती दिली आहे़ शहराची सध्याची लोकसंख्या १० लाख ७५ हजार असून या लोकसंख्येसाठी प्रतिमाणसी १३५ लिटर्सप्रमाणे पाणी देण्यासाठी १७५ दशलक्ष लिटर्स पाणी आवश्यकता आहे़ एकरुख तलाव ही योजना १९३२ साली सुरू झाली असून ती २७ दशलक्ष लिटर्सची असली तरी तलावात पाणी नसणे, यंत्रणा जुनी होणे यामुळे फक्त ५ एमएलडी पाणी येथून घेतले जाते़ टाकळी योजना (भीमानदीवरुन) १९६५ साली सुरू केली असून ती १०८ एमएलडीची असली तरी तीचे आयुष्य संपले आहे़ वारंवार गळत्या होतात त्यामुळे येथून अवघे ५५ एमएलडी पाणी उचलले जाते़उजनी ते सोलापूर या १०० किमीची जलवाहिनी १९९७ साली कार्यान्वित झाली़ तिची क्षमता ८० एमएलडी असून चिंचोळी एमआयडीसीला १० एमएलडी पाणी देण्याचा करार झाला आहे़ ३५० ठिकाणच्या एअर वॉल्व्हमधून हायवेवरील नागरिक वारंवार पाणी घेतात, काही ठिकाणी गळत्या आहेत त्यामुळे या जलवाहिनीतून ५५ एमएलडी पाणी येते़त्यामुळे तीनही उद्भवातून ११० ते ११५ एमएलडी पाणी उचलले जात असले तरी गळत्यांचा विचार करता शहरात अवघे ७५ एमएलडी पाणी येते़ उन्हाळ्यातील वाढलेली मागणी यामुळेही पाणी कमी पडत आहे़ शहरात ३३४७ सार्वजनिक बोअरच्या माध्यमातूनही पाणीपुरवठा सुरू आहे़ १३८ ठिकाणी बोअरवर विद्युतपंप बसवून पाणीपुरवठा सुरू आहे़ नव्याने २१० ठिकाणी बोअर घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे़ ---------------------------टाकळी ते सोलापूर ही १९६५ साली कार्यान्वित झालेली योजना जुनी झाली असून तीचे आयुष्य संपले आहे़ त्यामुळे गळत्या वाढल्या आहेत़ यासाठी नवीन समांतर जलवाहिनी टाकण्याचा १६७ कोटींचा प्रस्ताव मनपा सभेपुढे सादर केला आहे़ वर्षभरात हे काम करण्याचे आयुक्तांचे नियोजन आहे़-उजनी-सोलापूर ही १०० किमी लांबीची जलवाहिनी १९९७ साली सुरू झाली़ यावर ३५० एअर वॉल्व्ह असून हायवेवरील नागरिकांकडून या वॉल्व्हमधून गळती केली जाते़ उन्हाळ्यात हे प्रकार वाढतात़ या जलवाहिनीला देखील अनेक ठिकाणी गळत्या आहेत़ १८ मोठ्या गळत्या नुकत्यात बंद केल्या आहेत़-युआयडीएसएसएमटीतून १०० कोटी खर्चून १७ टाक्या बांधल्या आहेत़ ४४ किमी ट्रान्समिशन तर १७१ किमी वितरण नलिका टाकली आहे़ यातील ६० किमी लाईन सुरू झाली आहे़ वर्षभरात नव्याने सहा हजार कनेक्शन दिले आहेत़-पाणीपुरवठा सुधारण्याकामी आयुक्तांनी आपल्या अधिकारात १८ ठिकाणी जलवाहिनी व पाणीपुरवठ्याचे काम केले असून त्यावर २ कोटी ६६ लाखांचा खर्च झाला आहे़ ज्या भागात जलवाहिनीच नव्हती अशा ठिकाणी जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे़-------------------------------२८ टँकरने पाणीपुरवठामहापालिकेच्या मालकीच्या आठही झोन कार्यालयासाठी प्रत्येकी एक याप्रमाणे आठ पाण्याचे टँकर आहेत़ शिवाय खासगी २१ टँकर आहेत, त्यामुळे शहरात ज्या भागात पाणी येत नाही अशा भागात टॅँकरने पाणीपुरवठा केला जात असून दररोज १२५ ते १५० खेपा याद्वारे केल्या जातात़ पाणीपुरवठा सुधारण्याकामी ३० इंजिनिअरची स्टोअरमध्ये नियुक्ती केली आहे़