शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

शहराला पाण्याची गरज १७० दशलक्ष लिटर्स

By admin | Updated: May 9, 2014 00:27 IST

निम्म्या पाण्याचा तुटवडा: वर्षभरात अतिरिक्त पाणी आणण्याचे नियोजन

निम्म्या पाण्याचा तुटवडा: वर्षभरात अतिरिक्त पाणी आणण्याचे नियोजन सोलापूर: सोलापूर शहराची सध्याची लोकसंख्या विचारात घेता प्रतिमाणसी १३५ लिटर्स या मानकाप्रमाणे पाणी देण्यासाठी १७० ते १७५ एमएलडी (दशलक्ष लिटर्स) एवढ्या पाण्याची गरज आहे; मात्र उजनी जलवाहिनी, टाकळी जलवाहिनी आणि हिप्परगा योजना याचा विचार करता अवघा ११० दशलक्ष लिटर्स पाणी उपसा केला जातो़ यातील एअर वॉल्व्हमधील गळत्या तसेच इतर गळत्या विचार करता दररोज ७५ एमएलडी पाणी देखील मिळत नाही़ त्यामुळे शहरात पाण्याचा तुडवडा असून अतिरिक्त पाणी आणण्याचे नियोजन सुरू असल्याचे मनपा प्रशासनाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे़महापालिकेचे प्रभारी सार्वजनिक आरोग्य अभियंता विजयकुमार राठोड यांनी प्रसिद्धीमाध्यमांना तसेच मनपा पदाधिकार्‍यांना पाणीपुरवठ्याबद्दल वस्तुस्थिती दर्शविणारी माहिती दिली आहे़ शहराची सध्याची लोकसंख्या १० लाख ७५ हजार असून या लोकसंख्येसाठी प्रतिमाणसी १३५ लिटर्सप्रमाणे पाणी देण्यासाठी १७५ दशलक्ष लिटर्स पाणी आवश्यकता आहे़ एकरुख तलाव ही योजना १९३२ साली सुरू झाली असून ती २७ दशलक्ष लिटर्सची असली तरी तलावात पाणी नसणे, यंत्रणा जुनी होणे यामुळे फक्त ५ एमएलडी पाणी येथून घेतले जाते़ टाकळी योजना (भीमानदीवरुन) १९६५ साली सुरू केली असून ती १०८ एमएलडीची असली तरी तीचे आयुष्य संपले आहे़ वारंवार गळत्या होतात त्यामुळे येथून अवघे ५५ एमएलडी पाणी उचलले जाते़उजनी ते सोलापूर या १०० किमीची जलवाहिनी १९९७ साली कार्यान्वित झाली़ तिची क्षमता ८० एमएलडी असून चिंचोळी एमआयडीसीला १० एमएलडी पाणी देण्याचा करार झाला आहे़ ३५० ठिकाणच्या एअर वॉल्व्हमधून हायवेवरील नागरिक वारंवार पाणी घेतात, काही ठिकाणी गळत्या आहेत त्यामुळे या जलवाहिनीतून ५५ एमएलडी पाणी येते़त्यामुळे तीनही उद्भवातून ११० ते ११५ एमएलडी पाणी उचलले जात असले तरी गळत्यांचा विचार करता शहरात अवघे ७५ एमएलडी पाणी येते़ उन्हाळ्यातील वाढलेली मागणी यामुळेही पाणी कमी पडत आहे़ शहरात ३३४७ सार्वजनिक बोअरच्या माध्यमातूनही पाणीपुरवठा सुरू आहे़ १३८ ठिकाणी बोअरवर विद्युतपंप बसवून पाणीपुरवठा सुरू आहे़ नव्याने २१० ठिकाणी बोअर घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे़ ---------------------------टाकळी ते सोलापूर ही १९६५ साली कार्यान्वित झालेली योजना जुनी झाली असून तीचे आयुष्य संपले आहे़ त्यामुळे गळत्या वाढल्या आहेत़ यासाठी नवीन समांतर जलवाहिनी टाकण्याचा १६७ कोटींचा प्रस्ताव मनपा सभेपुढे सादर केला आहे़ वर्षभरात हे काम करण्याचे आयुक्तांचे नियोजन आहे़-उजनी-सोलापूर ही १०० किमी लांबीची जलवाहिनी १९९७ साली सुरू झाली़ यावर ३५० एअर वॉल्व्ह असून हायवेवरील नागरिकांकडून या वॉल्व्हमधून गळती केली जाते़ उन्हाळ्यात हे प्रकार वाढतात़ या जलवाहिनीला देखील अनेक ठिकाणी गळत्या आहेत़ १८ मोठ्या गळत्या नुकत्यात बंद केल्या आहेत़-युआयडीएसएसएमटीतून १०० कोटी खर्चून १७ टाक्या बांधल्या आहेत़ ४४ किमी ट्रान्समिशन तर १७१ किमी वितरण नलिका टाकली आहे़ यातील ६० किमी लाईन सुरू झाली आहे़ वर्षभरात नव्याने सहा हजार कनेक्शन दिले आहेत़-पाणीपुरवठा सुधारण्याकामी आयुक्तांनी आपल्या अधिकारात १८ ठिकाणी जलवाहिनी व पाणीपुरवठ्याचे काम केले असून त्यावर २ कोटी ६६ लाखांचा खर्च झाला आहे़ ज्या भागात जलवाहिनीच नव्हती अशा ठिकाणी जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे़-------------------------------२८ टँकरने पाणीपुरवठामहापालिकेच्या मालकीच्या आठही झोन कार्यालयासाठी प्रत्येकी एक याप्रमाणे आठ पाण्याचे टँकर आहेत़ शिवाय खासगी २१ टँकर आहेत, त्यामुळे शहरात ज्या भागात पाणी येत नाही अशा भागात टॅँकरने पाणीपुरवठा केला जात असून दररोज १२५ ते १५० खेपा याद्वारे केल्या जातात़ पाणीपुरवठा सुधारण्याकामी ३० इंजिनिअरची स्टोअरमध्ये नियुक्ती केली आहे़