शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्हा बँकेच्या संचालक मंडळ बरखास्तीला उच्च न्यायालयात आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 16:48 IST

सोलापूर: महाराष्टÑ शासन व रिझर्व्ह बँक यांच्या निर्णय प्रक्रियेतील विसंगती, जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती सुधारल्याची खरी माहिती रिझर्व्ह बँकेला दिली नाही, या मुद्यावर जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक मंडळ बरखास्तीला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.  संचालक शिवानंद सिद्रामप्पा पाटील यांनी याचिका दाखल केली आहे.नाबार्डने केलेल्या तपासणी अहवालाच्या आधारे रिझर्व्ह बँकेने सोलापूर ...

ठळक मुद्देप्रशासकाची नियुक्ती ही ९७ व्या घटना दुरुस्ती विरोधीसंचालक मंडळ बरखास्तीची कारवाई रद्द करण्याची मागणी याचिकेतबँकेच्या संचालकांनी चुकीचे कामकाज

सोलापूर: महाराष्टÑ शासन व रिझर्व्ह बँक यांच्या निर्णय प्रक्रियेतील विसंगती, जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती सुधारल्याची खरी माहिती रिझर्व्ह बँकेला दिली नाही, या मुद्यावर जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक मंडळ बरखास्तीला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.  संचालक शिवानंद सिद्रामप्पा पाटील यांनी याचिका दाखल केली आहे.

नाबार्डने केलेल्या तपासणी अहवालाच्या आधारे रिझर्व्ह बँकेने सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्याची कारवाई केली आहे. ३० मे रोजी जिल्हा बँकेवर प्रशासकाची नियुक्ती झाली आहे. या कारवाईला संचालक मंडळाच्या वतीने उच्च न्यायालयात शिवानंद पाटील यांनी आव्हान दिले आहे. एन.पी.ए. चे कारण दाखवून रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार  संचालक मंडळ बरखास्त केल्याचे म्हटले आहे. पाटील हे २०१६ पूर्वी संचालक नव्हते व संचालक मंडळ बरखास्तीसाठीचे सांगितले जात असलेले कारण हे (एन.पी.ए.)  त्याअगोदरचे असल्याचा मुद्दा याचिकेत आहे.

 बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या याचिकेवर १ आॅक्टोबर २०१५ रोजी संचालक मंडळ बरखास्तीसाठी  एन.पी.ए. च्या निकषाचा भंग हे एकमेव कारण योग्य ठरत नसल्याचे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट करीत संचालक मंडळ बरखास्त करण्यास उच्च न्यायालयात नकार दिला होता. २०१५ पेक्षा २०१८ मध्ये जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती सुधारली  आहे, इतर निकषही  २०१५ पेक्षा २०१८ मध्ये भक्कम असल्याचे याचिकेत म्हटले आहे. या विसंगतीच्या आधारे संचालक मंडळ बरखास्तीला आव्हान दिले आहे.

जिल्हा बँकेची खरी आर्थिक परिस्थिती रिझर्व्ह बँकेपासून दडवून ठेवल्याचे व खरी कागदपत्रे रिझर्व्ह बँकेला दिली असती तर ही कारवाई झालीच नसती असे म्हटले आहे. संचालक मंडळ बरखास्त हे एक राजकीय षडयंत्र असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

माहिती अधिकाराची पायमल्ली

  • - जिल्हा बँक बरखास्तीसाठीचे कारण असलेला जो पत्रव्यवहार सहकार आयुक्तांनी रिझर्व्ह बँकेला केला आहे, त्याची माहिती माहिती अधिकारात मागविली होती,२७ जूनच्या पत्रानुसार सहकार आयुक्त कार्यालयाने साक्षांकित प्रती देण्यास नकार दिला आहे. सहकार कार्यालय संचालक मंडळ बरखास्त करण्याची शिफारस करते; मात्र ज्या कारणामुळे बरखास्तीची कारवाई केली जाते ती कागदपत्र ेमात्र दिली जात नसल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणली आहे. 
  • - जिल्हा उपनिबंधक हे जिल्हा बँकेचे पदसिद्ध संचालक असतात, बँकेच्या संचालकांनी चुकीचे कामकाज करते वेळी जिल्हा उपनिबंधकांनी हस्तक्षेप करावयाला हवा होता.
  • - २०११ ते २०१८ या कालावधीत जिल्हा उपनिबंधकांनी कधीही बँकेच्या चुकीच्या कामकाजाबाबत हस्तक्षेप केला नाही. चुकीचे कामकाज झाले असेल तर संचालकाएवढेच जिल्हा उपनिबंधकही जबाबदार आहेत.
  • - पदसिद्ध संचालक जिल्हा उपनिबंधकांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचा हेतू हा प्रशासकाच्या माध्यमातून बँक ताब्यात घेण्याचा सहकार मंत्र्यांचा हेतू असल्याचे नमूद केले आहे.
  • - प्रशासकाची नियुक्ती ही ९७ व्या घटना दुरुस्ती विरोधी असून संचालक मंडळ बरखास्तीची कारवाई रद्द करण्याची मागणी याचिकेत केली आहे.
टॅग्स :SolapurसोलापूरbankबँकBanking Sectorबँकिंग क्षेत्र