शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सावधान; ‘इम्युनिटी बुस्टर’ औषधांचे साईड इफेक्टस् ठरताहेत त्रासदायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 12:55 IST

डॉक्टरांचा सल्ला आवश्यक : कोरोनाचा संसर्ग वाढल्याने अनेक औषधे बाजारात दाखल

ठळक मुद्देविविध माध्यमांमधून रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाºया जाहिराती प्रसिद्ध होत आहेतया जाहिरातीमध्ये प्रत्यक्ष कोरोनापासून बचाव करण्याचा दावा केला जातो कोरोना आजार पसरत असल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढायला हवी या विचाराने लोक औषधे घेतात

शीतलकुमार कांबळे

सोलापूर : कोरोना आजारापासून वाचण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती महत्त्वाची भूमिका बजावते, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अ‍ॅलोपॅथी, आयुर्वेदाची अनेक औषधे बाजारात नव्याने आली असून, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ही औषधे घेतल्याने शरीरातील उष्णता वाढून त्वचेवर पुरळ येणे, बेंड येणे तसेच अन्य त्रासदायक साईड इफेक्टला सामोरे जावे लागेल, असा इशारात तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.

विविध माध्यमांमधून रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाºया जाहिराती प्रसिद्ध होत आहेत. या जाहिरातीमध्ये प्रत्यक्ष कोरोनापासून बचाव करण्याचा दावा केला जातो. कोरोना आजार पसरत असल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढायला हवी या विचाराने लोक औषधे घेतात. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अशी औषधे घेणे धोक्याचे ठरु शकते. खास कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती विशेष अशी औषधे असल्याचे संशोधन अद्याप तरी झालेले नाही.

आयुर्वेद तसेच अ‍ॅलोपॅथीमध्ये व्हिटॅमीन सी, झिंक यासारखी औषधे असतात. ही औषधे कधी घ्यावीत व किती प्रमाणात घ्यावीत हे तपासणीनंतरच कळू शकते. प्रत्येकाची उंची, वजन, वय यानुसार औषधांचे प्रमाण वेगवेगळे असू शकते. प्रत्येकाची मेडिकल हिस्ट्री देखील वेगवेगळी असते. त्यामुळे एकच औषध तितक्याच प्रमाणात सर्वच व्यक्तींना लागू पडते असे नाही. यासाठी तज्ज्ञांकडून तपासणी करुनच औषधे घ्यायला हवीत.

औषधं घ्यायची की नाही हे डॉक्टरांना ठरवू द्याकामामुळे बाहेर पडावे लागते. बाहेर जास्त वेळ थांबून काम करावे लागते. जास्त लोकांशी संपर्क येतो, म्हणून रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारी औषधांची जास्त गरज आहे, असे समजून अनेक लोक अशी औषधे घेतात. यामुळे उष्णता वाढणे, पुरळ येणे, बेंड होणे असे साईड इफेक्ट दिसायला लागू शकतात. आपल्याला कोणते औषध जास्त परिणामकारक व साईड इफेक्ट न करणारे आहेत हे पहावे लागते. त्यामुळे कोणते औषध घ्यायचे ते डॉक्टरांना ठरवू द्यायला हवे.

रोगप्रतिकारक शक्ती मोजण्याचे कोणतेही एकक सध्यातरी नाही. एखादे औषध घेण्याआधी तपासणी करणे गरजेचे आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय थेट औषध विक्रीच्या दुकानातून औषधे घेणे टाळायला हवे. तसेच एखाद्याला दिलेले औषध दुसºयाला देणे अपायकारक ठरु शकते.- डॉ. अभिजित जगतापसार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याMedicalवैद्यकीयmedicineऔषधं