शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 10:32 IST

२३ मे रोजी मतमोजणी होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांनी दिली.

ठळक मुद्दे२७ मार्च रोजी प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी होणार२९ मार्च उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस १८ एप्रिल रोजी मतदान, २३ मे रोजी मतमोजणी

सोलापूर : सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी अधिसूचना प्रसिद्ध होत आहे. या दिवसापासून नामनिर्देशनपत्र विक्री आणि स्वीकृती जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे. २६ मार्च हा नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. शासकीय सुट्टी वगळता इतर दिवशी नामनिर्देशनपत्रे सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत स्वीकारले जाणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी डॉ.राजेंंद्र भोसले यांनी दिली.

उमेदवारी अर्ज दाखल करताना अर्ज मोफत देण्यात येत असला तरी दाखल करताना सर्वसाधारण गटातील उमेदवारासाठी २५ हजार तर राखीव गटातील उमेदवारासाठी साडेबारा हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघ राखीव असल्याने या मतदारसंघातील सर्वच उमेदवारांना साडेबारा हजार रुपयांची अनामत भरावी लागणार आहे. 

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कालावधीत तीन शासकीय सुट्ट्या आहेत. यात एक धुलिवंदन, चौथा शनिवार, रविवार या तीनही दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत, असे जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांनी सांगितले. होलिकाष्टक असल्याने धुलिवंदनानंतरच २२ मार्चपासून नामनिर्देशनपत्रे दाखल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

 २७ मार्च रोजी प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी होणार आहे. २९ मार्च उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस आहे. १८ एप्रिल रोजी मतदान होईल. २३ मे रोजी मतमोजणी होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांनी दिली. 

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElectionनिवडणूक