शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

खराब रस्त्यांमुळे बससेवा बंद

By admin | Updated: August 4, 2014 01:06 IST

खासगी वाहने जोरात: विद्यार्थ्यांसह प्रवाशांची गैरसोय

तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील धोत्री, खडकी ते सोलापूर जिल्हा हद्दीपर्यंत साडेपाच कि.मी.चा रस्ता नादुरुस्त झाल्याचे कारण दाखवत धोत्रीपर्यंत येणारी महापालिकेची सिटीबस बंद केल्याने विद्यार्थ्यांसह दोन गावच्या प्रवाशांचा शहराकडे जाण्याचा संपर्क तुटला आहे. अखेर खासगी जीपने विद्यार्थ्यांना शहराकडे जावे लागते.सोलापूर महापालिकेची परिवहन सेवा धोत्री गावापर्यंत दररोज चालू होती. दिवसाकाठी सहा बसफेऱ्या होत असत. त्यामुळे खडकी, धोत्री येथील ५० महाविद्यालयीन विद्यार्थी व प्रवाशांची सोय होत होती. परंतु,धोत्री ते सोलापूर जिल्हा हद्दीपर्यंत ५ कि.मी. रस्ता नादुरुस्त झाल्याने रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे ही बससेवाच दोन दिवसांपासून बंद करण्यात आली आहे. सदरील रस्ता दुरुस्त झाल्याशिवाय सोलापूरची बससेवा सुरु करणार नाही, असा पवित्रा घेतल्याने प्रवासी आणि विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होऊ लागली आहे. कारण बाजारपेठ जवळ असल्याने या भागातील लोकांचा अधिक संपर्क सोलापूरशी आहे. दरम्यान, दुसरा पर्याय नसल्याने या भागातील प्रवाशांना खासगी जीपने प्रवास करावा लागत आहे. तरी बंद केलेली सिटीबस सेवा तात्काळ सुरु करावी, अशी मागणी खडकी व धोत्री ग्रामस्थांतून होत आहे. ------------------------------एसटी बस सुरू करातुळजापूर आगाराची मंगरुळ, नांदुरी, धोत्री, खडकी मार्गे तुळजापूर-सोलापूर ही बस नव्याने सुरु करावी व गावकरी, विद्यार्थ्यांचे हाल थांबवावेत, अशी मागणी धोत्रीच्या सरपंच अश्विनी शिवाजी साठे व खडकीचे ग्रा.पं. सदस्य सुनील नागणे यांनी केली आहे. दिवसाकाठी चार गाड्या सोडाव्यात नसता, एस.टी. सेवेअभावी गावकऱ्यांच्या समस्या कायम राहणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.