शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

उष्माघातानं घायाळ घारीनं घेतला मोकळा श्वास !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 13:09 IST

प्राणीमित्रांची मदत; वीस दिवसांनंतर घारीची प्रकृती झाली ठणठणीत

ठळक मुद्देप्राणी संग्रहालयात तिच्यावर पशुवैद्यकीय अधिकाºयांच्या निगराणीखाली उपचार सुरू होतेअन्नपाण्याविना तिला अशक्तपणा आल्यामुळे तिची ही स्थिती झाल्याचा निष्कर्ष डॉ. नितीन गोटे, डॉ. भरत शिंदे यांनी काढला

सोलापूर: रंगभवनजवळील आयकर नगरात उष्माघातामुळे घायाळ अवस्थेत सापडलेल्या घारीला उपचार करून वीस दिवसांनंतर मंगळवारी प्राणीमित्रांच्या मदतीने निसर्गाच्या सान्निध्यात सोडून देण्यात आलं. प्राणी संग्रहालयात तिच्यावर पशुवैद्यकीय अधिकाºयांच्या निगराणीखाली उपचार सुरू होते.

वीस दिवसांपूर्वी आयकर नगर येथून एका महिलेचा दुपारच्यावेळी वन्यजीवप्रेमी संस्थेच्या सदस्यांना मोबाईलवर कॉल आला. या परिसरात एक मोठा पक्षी घायाळ अवस्थेत पडला असल्याचे सांगण्यात आले. लागलीच प्रवीण जेऊरे व निकंदन जंगम घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पाहणी केली असता घार क्षीण अवस्थेत तडफडत असल्याचे आढळून आले. तिच्यावर प्राथमिक उपचार करून प्राणी संग्रहालयात आणण्यात आले. वाढत्या तापमानामुळे ती चक्कर येऊन खाली पडली. अन्नपाण्याविना तिला अशक्तपणा आल्यामुळे तिची ही स्थिती झाल्याचा निष्कर्ष डॉ. नितीन गोटे, डॉ. भरत शिंदे यांनी काढला. 

अशक्तपणामुळे तिला धड उडताही येत नव्हते. अशा स्थितीत तिला निसर्गाच्या सान्निध्यात सोडणे धोक्याचे ठरेल म्हणून प्राणी संग्रहालयामध्ये ठेवण्यात आले. पहिल्या दिवशी स्वत:हून खाद्यही खाता येत नव्हते. वन्यजीवप्रेमी संस्थेच्या सदस्यांनी साखर पाणी, गुलकोज पाजवले. त्यानंतर दोन दिवस तिच्या शरीरामध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सदस्यांनी जबरदस्तीनं मांसाहार खाऊ घातला. तिच्या सुरक्षेसाठी मोठ्या पिंजºयात तिची रवानगी करण्यात आली. दोन दिवसांनंतर ताजेतवाने झाल्यानंतर ती स्वत:हून खाऊ लागली. दररोज भरपेट खाद्य दिल्याने हळूहळू तिच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत गेली. १५ दिवसांनंतर ती पिंजºयामध्येही उडू लागली. तिच्या पंखामध्ये बळ आल्याचे डॉ. गोटे आणि डॉ. शिंदे यांच्या लक्षात आले. आणखी पाच दिवस तिला ठेवण्यात आले. वीस दिवसांनंतर मंगळवारी २३ एप्रिल रोजी ती जिथे सापडली होती त्या आयकर नगर येथेच नेऊन निसर्गाच्या सान्निध्यात सोडण्यात आले. 

या उपक्रमासाठी वन्यजीवप्रेमी संस्थेचे मुकुंद शेटे, प्रवीण जेऊरे, निकंदन जंगम यांच्यासह सदस्यांनी घेतलेल्या परिश्रमामुळेच उष्माघाताने बळी जाऊ पाहणाºया घारीला जीवदान मिळाले. 

...तर गतप्राण झाली असती- आयकर नगर परिसरात उष्माघातानं भोवळ येऊन घार पडली असल्याचे या परिसरातून एका महिलेचा फोन आल्यामुळे वन्यजीवप्रेमी सदस्य तातडीने धावले. तिच्यावर वेळीच डॉक्टरांकडून योग्य उपचार करण्यात आले. यामुळे तिच्या पंखात बळ येऊन नव्याने जगण्याची ऊर्मी तिच्यामध्ये निर्माण झाली. याकडे कोणीच लक्ष दिले नसते, काही काळानंतर ती गत्प्राण झाली असती, अशी प्रतिक्रिया पशुवैद्यकीय अधिकाºयांनी व्यक्त केली.

टॅग्स :SolapurसोलापूरTemperatureतापमानHeat Strokeउष्माघात