शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

खºयाखुºया समाधानाची लकेर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 15:05 IST

चार पैशांतून मिळणाºया क्षणिक सुखापेक्षा चेहºयावर चिरंतन समाधान देणाºया स्मृती चिरकाल टिकतात.

दोन महिन्यांपूर्वी घडलेला प्रसंग आजही चेहºयावर खºयाखुºया समाधानाची लकेर उमटवून जातो. विजापूर रोडवरील जनता बँकेत कर्जाचा हप्ता भरण्यासाठी गेलो असतानाची घटना आहे. काउंटरसमोर खूप मोठी लाईन लागली होती. नेहमीच्या कॅशिअर मॅडमऐवजी एक तरूण कॅशिअरच कर्तव्य बजावताना दिसला. भली मोठी लाईन पुढे सरकत माझा नंबर आला. कर्जाचे दोन हप्ते भरायचे होते. पहिला हप्ता ५ हजारांचा व दुसरा १८०० रुपयांचा.

मी नेहमीप्रमाणे दोन्ही विड्रॉल आणेवारीसह व्यवस्थित भरून दोन्ही देय रकमेसह विड्रॉल कॅशिअरकडे देऊन काउंटरवर थांबलो. कॅशिअर म्हणाले, ‘साहेब एकेक करून विड्रॉल द्या. ‘विड्रॉल’ व हप्त्याची रक्कम परत घेऊन ५००० रूपयांचा विड्रॉल व रक्कम कॅशिअरकडे देऊन मी पुन्हा तिथेच थांबलो. काही वेळाने कॅशिअर म्हणाले, ‘साहेब तुम्ही ४००० रुपये जास्त दिलात. हे घ्या परत. ‘मी रक्कम व विड्रॉल व्यवस्थित दिल्याची खात्री करून कॅशिअरना म्हणालो, ‘सर आपलं काही तरी गैरसमज होतंय, मी बरोबर ५००० रुपये दिलेत... तुम्ही परत दिलेले ४००० रुपये माझे नाहीत, हे परत घ्या.’ मी नाही नाही म्हणत असतानाही त्यांनी बळेच पैसे दिले. शेवटी निर्विकार चेहरा करून दुसरा हप्ता भरून मी घरची वाट पकडली.

बँकेच्या बाहेर पडलो. खिशातले व गाडीच्या डिक्कीतले पैसे पुन्हा मोजले. ४००० रुपये जास्तच वाटले, मग पुन्हा कॅशिअरकडे जाऊन पैसे परत घेण्याची विनंती केली, बँकेतला माझा हेलपाटा व पैसे परत करण्याचे व्यर्थ प्रयत्न तेथील सेविकेनेही हेरले, परंतु कॅशिअरचा पवित्रा पाहून घराकडे वाट वळवली. घरी आल्यावरही पुन्हा आकडेवारीची जुळवाजुळव करून पाहिले तरीही ४००० रुपये जास्तच होताहेत लक्षात आले. सौभाग्यवतीला घडलेली हकिकत सांगितली. तीही निर्विकार चेहºयाने माझ्याकडे बघत म्हटली, ‘जास्तीचे पैसे आपले नाहीत, खातेपुस्तकातच ठेवून द्या, कोणाचे आहेत कळल्यावर देऊन टाका.’ आणि शेवटी नाईलाजाने मला ती रक्कम खातेपुस्तिकेत ठेवायला भाग पडले.

बँकेला दोन दिवस सुट्टी असल्याने विषय पुढे निघालाच नाही. तिसºया दिवशी दुपारी दीड वाजता त्याच बँकेच्या माझ्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावर मिसकॉल येऊन गेल्याचे समजताच मी लगेचच त्याच क्रमांकावर फोन केला, तिकडून आवाज आला, ‘घोडके साहेबच बोलता आहात का? ‘मी म्हटलं, ‘होय..आपण?’ तिकडून, ‘साहेब मी विजापूर रोड जनता बँकेतून प्रशांत शिंदे...‘मी त्यांना पुढे बोलायच्या आतच, ‘शिंदे साहेब मला खात्री होती तुमचा फोन येणारच म्हणून..पाचच मिनिटांत मी बँकेत पोहोचतो... ‘असं बोलतच बँकेत पोहोचलो. दिनेश साहेबांनी हात जोडले, ‘साहेब ते ४००० रुपये आमच्या बँकेचेच आहेत. परवा हिशोब करताना लक्षात आले...‘त्यांच्या बोलण्याला मध्ये तोडतच मी खातेपुस्तकातील रक्कम त्यांच्या हातात ठेवून निघणार एवढ्यात बँकेतील सर्व अधिकारी व कर्मचारी माझ्याजवळ आले आणि आभारसत्र सुरू केले. चहापानासाठी विनंती केली. मी त्यावेळची सर्व घटना पुन्हा एकदा सांगितली आणि शेवटी एकाच वाक्यात, ‘जी रक्कम माझी नाहीच ती रक्कम वापरण्याचा मला अधिकार नाही. असो, योग्य ठिकाणी रक्कम परत देतोय यातच समाधान आहे.’ असं सांगत मी खºयाखुºया आनंदी चेहºयानं घराकडे निघालो.

वरील प्रसंग मनाला चिरस्मरणीय आनंद देणारा ठरला. कारण आई-वडील, आजी-आजोबा, भावाबहिणीने केलेले चांगले संस्कारच अशावेळी कामाला येतात. फुकटच्या धनलाभापासून लांब जाण्यास भाग पाडतात, चांगुलपणाची भावना जागृत करतात. चांगला विचार करायला लावणाºया मनाला प्रोत्साहन देण्यासाठी धडपड करतात. चार पैशांतून मिळणाºया क्षणिक सुखापेक्षा चेहºयावर चिरंतन समाधान देणाºया या स्मृती चिरकाल टिकतात.- आनंद घोडके(लेखक शिक्षक आहेत) 

टॅग्स :SolapurसोलापूरBanking Sectorबँकिंग क्षेत्रbankबँक