शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

पीकविमा योजनेत भाजपकडून शेतकºयांची फसवणूक : एम. बी. पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 11:03 IST

सोलापूर लोकसभा काँग्रेस आघाडीचे उमेदवार व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ पाटील सोलापूर दौºयावर आले होते.

ठळक मुद्देमहाराष्ट्र व कर्नाटकात चालू वर्षी भीषण दुष्काळ पडला, शेतकºयांच्या हातून पिके गेली - एम. बी. पाटीलप्रधानमंत्री पीकविमा योजनेतून पाच टक्के शेतकºयांनाही भरपाई मिळालेली नाही - एम. बी. पाटीलमोदी सरकारने शेतकºयांना पीकविमा योजनेत फसविले. बड्या उद्योगपतींना कर्जमाफी दिली - एम. बी. पाटील

सोलापूर : प्रधानमंत्री पीकविमा योजनेत शेतकºयांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप कर्नाटकचे गृहमंत्री एम. बी. पाटील यांनी  येथे बोलताना केला. 

सोलापूर लोकसभा काँग्रेस आघाडीचे उमेदवार व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ पाटील सोलापूर दौºयावर आले होते. सायंकाळी काँग्रेस भवनात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी मोदी सरकारच्या कारभारावर टीका केली. मोठा गाजावाजा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री पीकविमा योजना काढली. या योजनेसाठी देशातील अनेक शेतकºयांनी पैसे भरले.

महाराष्ट्र व कर्नाटकात चालू वर्षी भीषण दुष्काळ पडला. शेतकºयांच्या हातून पिके गेली, पण प्रधानमंत्री पीकविमा योजनेतून पाच टक्के शेतकºयांनाही भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे या योजनेत मोठा घोटाळा करण्यात आल्याचा आरोप पाटील यांनी केला. 

मोदी सरकारने शेतकºयांना पीकविमा योजनेत फसविले. बड्या उद्योगपतींना कर्जमाफी दिली, पण दुष्काळाने होरपळून गेलेल्या शेतकºयांची त्यांना दया आली नाही. नागरिकांच्या खात्यावर १५ लाख देतो म्हणाले होते. त्यासाठी नोटाबंदी केली. यातून काळा पैसा बाहेर काढतो म्हणाले होते. पण नोटाबंदीतून सामान्य लोक, व्यापारी हैराण झाले. काळा पैसा बाहेर आलाच नाही. अनेक पातळ्यांवर हे सरकार अपयशी झाले, असे पाटील यांनी सांगितले.

यावेळी माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, शहर अध्यक्ष प्रकाश वाले, राजशेखर शिवदारे, जाफरताज पटेल, भीमाशंकर जमादार उपस्थित होते.

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsolapur-pcसोलापूरNarendra Modiनरेंद्र मोदीgovernment schemeसरकारी योजना