शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

राष्ट्रवादीच्या अजेंड्यावर ‘दादा’, साेलापूर भाजपच्या अजूनही ‘विमानसेवा”

By राकेश कदम | Updated: July 3, 2023 18:43 IST

व्यापारी आघाडीने वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार पंतप्रधान कार्यालय आणि विमानमंत्र्यांच्या कार्यालयाला तातडीने एक निवेदन पाठवले.

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते अजित पवार यांच्या बंडाने जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. या वातावरणात भाजपच्या अजेंड्यावर अजूनही जिल्ह्यातील विमानसेवा असल्याचे साेमवारी सांगण्यात आले. हाेटगी राेड विमानतळावरुन विनाविलंब नियमित विमानसेवा सुरू व्हावी अशी मागणी भाजपच्या व्यापारी आघाडीने साेमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे निवेदनाव्दारे केली. 

व्यापारी आघाडीने वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार पंतप्रधान कार्यालय आणि विमानमंत्र्यांच्या कार्यालयाला तातडीने एक निवेदन पाठविले. यात म्हटले आहे की, केंद्र सरकारने २०१७ मध्ये उडान योजनेत सोलापूरचा समावेश केला आहे. परंतु सोलापुरातील स्थानिक अडचणीमुळे विमानसेवा सुरू होत नव्हती. महाराष्ट्र शासनाने साखर कारखान्याच्या चिमणीचा अडथळा दूर केला आहे. सोलापूर हा वस्त्रोद्योग, टेक्स्टाईल, शेतीपूरक उद्योग आणि साखर उत्पादक जिल्हा आहे. येथील व्यापार रोजगार वाढीसाठी विमानसेवा लवकरात लवकर सुरू होणे आवश्यक आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सोलापूर जिल्ह्यावर विशेष प्रेम असून ते या जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे केंद्र शासनाने सोलापुरात विमानसेवा लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी भाजपा व्यापारी आघाडीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य श्रीनिवास दायमा आणि व्यापारी आघाडीचे शहर अध्यक्ष जयंत होले - पाटील यांनी केली.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSolapurसोलापूर