शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

नोकरीच्या अमिषाने भाजप सरकारने बेरोजगारांना फसविले, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 14:43 IST

 नरखेड येथे जि. प. सदस्य उमेश पाटील यांच्या सन्मानार्थ उमेश पाटील मित्रमंडळातर्फे आयोजित जिल्हास्तरीय नोकरी महोत्सव, बेरोजगारांची उडाली झुंबड

ठळक मुद्देनोकरी महोत्सवात दहा हजारांच्या आसपास तरुण, तरुणीं उपस्थिती ६३० जणांना कामावर रुजू होण्याबाबत सूचना दिल्या

नरखेड : सध्याच्या सरकारने राज्यातील व देशातील बेरोजगार तरुणांना नोकरी देण्याचे आमिष दाखवून त्यांचा वापर करुन घेतला. परंतु अद्यापपर्यंत आश्वासनाशिवाय काही करता आले नाही. तीन वर्षांचा काळ लोटला तरी त्यांना ना नोकरी मिळाली ना रोजगार, अशी खंत माजी उपमुख्यमंत्री, खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांनी व्यक्त केली.

 नरखेड येथे जि. प. सदस्य उमेश पाटील यांच्या सन्मानार्थ उमेश पाटील मित्रमंडळातर्फे आयोजित जिल्हास्तरीय नोकरी महोत्सवात ते बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजन पाटील, महिला संघटनेच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे, बळीराम साठे, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, जि. प. सदस्य उमेश पाटील, राजूबापू पाटील, अजिंक्यराणा पाटील, संतोष पवार, रमेश बारसकर, अंकुश चव्हाण, देवानंद गुंड-पाटील, विक्रांत माने, आप्पाराव कोरे, लतिफ तांबोळी, स्वप्निल सावंत, मंदा काळे, रेखा राऊत, शंकर साळुंखे, रुपाली दाभाडे, रत्नमाला पोतदार, नागेश अक्कलकोटे, जयदीप साठे, निरंजन भूमकर, हणमंत पोटरे, चंद्रहार चव्हाण, यशोदा कांबळे आदी उपस्थित होते.

तरुणांमध्ये निरुत्साह : भारुड- तरुण वर्गाच्या निरुत्साहीपणामुळे राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढली आहे. आपल्याकडील लोक गाव सोडून जिल्हा, राज्य, परराज्यांमध्ये जाऊ शकत नाहीत. मात्र परराज्यांतील बेरोजगार कुठेही जाऊन काम करण्यास तयार असतात. स्पर्धा परीक्षेमध्ये जिद्द, चिकाटी, इच्छाशक्ती, अथक परिश्रम घेतल्यास यशस्वी होऊ शकता, असे जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारुड यांनी सांगितले. यावेळी जगन्नाथ कोल्हाळ, विनय पाटील, विजयकुमार पाटील, गोविंद पाटील, विजय पोतदार, प्रदीप पाटील, आप्पासोा राऊत, बालाजी साठे, हर्षवर्धन ढवण, दिलीप धावणे, ब्रह्मदेव फंड, राजकुमार पाटील, पंढरीनाथ मोटे, तात्या गोडसे यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक उमेश पाटील यांनी केले.

तरुणांना नोकरी देण्याच्या भूलथापा मारुन सत्तेवर आलेल्या या सरकारला बेरोजगार तरुणांचे काहीच सोयर-सुतक नाही. नोकरी देण्याच्या नावाखाली सरकारने त्यांना पकोडे तळायला लावल्याचे पाप केले. सध्याच्या काळात नोकरी मिळत नसल्याने तरुणांना छोकरी मिळणेही खूपच कठीण झाले आहे.- चित्रा वाघ,प्रदेशाध्यक्षा, राष्ट्रवादी महिला आघाडी

१,२७0 जणांना नियुक्तीपत्र- नरखेड येथील या जिल्हास्तरीय नोकरी महोत्सवात आठ ते दहा हजारांच्या आसपास सुशिक्षित बेरोजगार तरुण, तरुणींनी उपस्थिती लावली होती. ४० नॅशनल व मल्टिनॅशनल कंपन्यांनी सहभागी होऊन १ हजार २७० जणांना नियुक्तीपत्र दिले, तर ६३० जणांना कामावर रुजू होण्याबाबत सूचना दिल्या. बारामती येथील भारत फोर्स कंपनीत २३५ जणांचा समावेश करण्यात आला आहे. यावेळी जॉब कार्डचे प्रकाशन करण्यात आले.

टॅग्स :SolapurसोलापूरjobनोकरीVijaysingh Mohite-Patilविजयसिंह मोहिते-पाटीलBJPभाजपा