शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

भाजप सरकार शिवसेनेच्या मंत्र्यांवर पाळत ठेवत नाही, गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांचे स्पष्टीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 15:04 IST

राज्याचे गृहराज्यमंत्री रणजित पाटील हे सोलापूर दौºयावर होते़ सोलापूर शहर पोलिस आयुक्तालयाला सदिच्छा भेट दिल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते़ यावेळी पोलीस आयुक्त महादेव तांबडे, पोलीस उपायुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त अर्पणा गीते, पोर्णिमा चौगुले, शमिष्ठा वालावलकर, गुन्हे शाखेचे सुर्यकांत पाटील यांच्यासह शहर पोलीस दलातील विविध पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते़

ठळक मुद्देराज्याचे गृहराज्यमंत्री रणजित पाटील हे सोलापूर दौºयावर होते़ सोलापूर शहर पोलिस आयुक्तालयाला सदिच्छा भेट दिल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलापोलिसांना आठ तासांचीच ड्यूट असली पाहिजे : रणजित पाटील सोलापूरातील पोलीसांच्या घरासाठी माहिती घेतली असून, त्यासाठी पाठपुरावा करणार : रणजित पाटील

अमित सोमवंशीसोलापूर दि ८  : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाजप सरकार शिवसेनेच्या मंत्र्यावर पाळत ठेवत असल्याचे बोलले जात आहे़ मात्र राज्य सरकारच्या यंत्रणेकडून शिवसेनेच्या कोणत्याही मंत्र्यावर पाळत ठेवली जात नाही. हा आरोप चुकीचा आहे, असे स्पष्टीकरण गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी आज येथे स्पष्ट केले.राज्याचे गृहराज्यमंत्री रणजित पाटील हे सोलापूर दौºयावर होते़ सोलापूर शहर पोलिस आयुक्तालयाला सदिच्छा भेट दिल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते़ यावेळी पोलीस आयुक्त महादेव तांबडे, पोलीस उपायुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त अर्पणा गीते, पोर्णिमा चौगुले, शमिष्ठा वालावलकर, गुन्हे शाखेचे सुर्यकांत पाटील यांच्यासह शहर पोलीस दलातील विविध पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते़ सरकारतर्फे विरोधी पक्षाचे नेते आणि शिवसेनेच्या मंत्र्यांवर पाळत ठेवत असल्याचा आरोपही हल्ली केला जात आहे. यासंदर्भात विचारले असता त्यांनी वरील स्पष्टता केली.     पुढे बोलताना रणजित पाटील म्हणाले की, पोलिसांना आठ तासांचीच ड्यूट असली पाहिजे, असे मत व्यक्त करतानाच प्रायोगिक तत्वावर मुंबई येथे पोलिसांची आठ तास ड्युटी करण्यात आली आहे, राज्यातही अशाच पध्दतीची आठ तासाची ड्यूटी करण्याचा सरकारचा मानस आहे़ हे सरकार पोलिसांच्या घरासाठी विविध योजना राबवत आहे.  सोलापूरातील पोलीसांच्या घरासाठी माहिती घेतली असून, त्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.  मागील डिसेंबर महिन्यात प्रत्येक जिल्ह्याला फॉरेन्सिक (न्यायवैद्यक) लॅब दिलेली आहे. अपराध सिध्दतेसाठी पुरावा गरजेचा असतो, म्हणुन प्रत्येक जिल्हा ठिकाणी आणि पोलीस कमीशनरला मोबाईल लॅब दिलेली आहे. रक्ताचे नमुने, केसाचे नमुने व फिगर प्रिट इत्यादी अनेक बाबीसाठी थेट जागेवर जाऊन तंत्रकुशल व्यक्तीकडून घेण्यात येत आहे. सर्व पोलीस ठाणे ‘सीसीएनएस’ ने जोडत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सोलापूर शहरासाठी आणखी  चार पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव आहे. येत्या काळात बैठक घेऊन मार्ग काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.-------------------‘सीसीटीव्ही’ चे जाळे उभे करणारपोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या कामात सुसुत्रता आण्यांसाठी शासन प्रयत्न करत आहे. सर्व पोलीस ठाणे ‘सीसीटीव्ह’ चेजाळे निर्माण करणार आहे.य् ाामुळे पोलिसांच्या कामात गती येऊन कायदा व सुव्यवस्था निर्माण होणार नाही. याबात योग्य नियोजन करण्यात यश येईल. यासाठी लोकांचा सक्रीय सहभाग असणे गरजेचे आहे.आगामी काळात पोलीस तपास यंत्रणा आणि बंदोबस्त यंत्रणा वेगळी असा  प्रस्ताव  आहे त्यावर निर्णय होयचा असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरMaharashtraमहाराष्ट्र