शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी; राज्यातील द्राक्ष निर्यात वाढतेय; आतापर्यंत सव्वालाख टन द्राक्ष निर्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2022 16:42 IST

गुणवत्तेची द्राक्षे; निर्यातीचा वेग सुरूच

सोलापूर : मागील दोन वर्षे कोरोनामुळे अडचण झाल्याची सल मनात ठेवत उत्पादक शेतकऱ्यांनी यंदा गुणवत्तेची द्राक्षे तयार केल्याने निर्यात वाढली आहे. सोमवारपर्यंत राज्यातून एक लाख १० हजार ७८२ मे. टन द्राक्षं निर्यात झाली आहेत. अजूनही निर्यातीचा वेग सुरूच असल्याचे सांगण्यात आले.

मागील दोन वर्षे कोरोनामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. गुणवत्तेचे उत्पादन आणण्यासाठी कष्ट व पैसे खर्च केले तरी मालाची विक्री करायची अडचण होती. त्यामुळे शेतकऱ्यांसमोरील अडचणीत वाढच होत गेली. मागील वर्षी देशांतर्गत द्राक्ष विक्रीची अडचण होती; मात्र निर्यात सुरळीत होती. यावर्षी मात्र शेतीमाल विक्रीची अडचण राहिली नाही. शेतकऱ्यांनी यावर्षी निर्यातक्षम गुणवत्तेची द्राक्षे तयार केली असल्याने निर्यात मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.

महाराष्ट्रातील सात जिल्ह्यातून प्रामुख्याने द्राक्षे निर्यात होत आहेत. यामध्ये नाशिक जिल्ह्याचा मोठा वाटा आहे. युरोपियन देशात ८१ हजार १५३ टन द्राक्षाची निर्यात झाली आहे. इतर देशात केवळ नाशिक २३ हजार ७३३ टन तर सांगली जिल्ह्यात ५ हजार ८९६ मे.टन द्राक्ष निर्यात झाली आहेत. एकुण एक लाख १० हजार ७८२ मे.टन द्राक्ष निर्यात झाली असल्याचे सांगण्यात आले.

नाशिकची वाटचाल लाखाकडे..

राज्यातून निर्यात होणाऱ्या द्राक्षांमध्ये ९० टक्के वाटा हा एकट्या नाशिक जिल्ह्याचा आहे. एकट्या नाशिक जिल्ह्यातून ९७ हजार ५४८ टन द्राक्षे निर्यात झाली आहेत. अजूनही नाशिक जिल्ह्यातील द्राक्षाची निर्यात सुरूच आहे.

* सोलापूरसह राज्यातील इतर जिल्ह्यात उशिरापर्यंत व भरपूर पाऊस पडत राहिल्याने अनेक हेक्टर द्राक्ष बागांची नापिकी झाली. याशिवाय जानेवारी महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस व वाऱ्यामुळे द्राक्ष उत्पादनावर परिणाम झाल्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

* सुरुवातीला काही कंटेनर युक्रेन व रशियाला गेले मात्र युद्ध सुरू झाल्यानंतर या दोन्ही देशाची द्राक्ष निर्यात थांबली असल्याचे सांगण्यात आले.

 

अशी झाली निर्यात...

  • * नाशिक- ९७, ५४८
  • * सांगली- १०, ३४७
  • * सातारा- १,७४१
  • * पुणे जिल्हा- ५२७
  • * उस्मानाबाद- ३८६
  • * लातूर - १३६
  • * सोलापूर- ९७

 

एप्रिल महिनाअखेरपर्यंत द्राक्ष निर्यात होईल. सध्या द्राक्षाचा पीक कालावधी आहे. वाऱ्याचे व अवकाळी संकट आले नाही तर निर्यात वेगाने होईल. देशांतर्गत द्राक्ष विक्रीचे दर वाढत असले तरी द्राक्ष निर्यात करणारा शेतकरी वर्ग वेगळा आहे. यावर्षी आतापर्यंतच्या निर्यातीची आकडेवारी सव्वा लाखाच्या पुढे गेली आहे.

- गोविंद हांडे, निर्यात सल्लागार, महाराष्ट्र राज्य

 

यावर्षी पाऊस उशिरापर्यंत पडत राहिल्याने द्राक्ष बागामध्ये अनेक दिवस पाणी थांबले होते. त्यामुळे अनेक बागांना फलधारणा झाली नाही. त्यातूनही मोठ्या प्रमाणावर खर्च करून आणलेल्या मालाला सतत बदलणाऱ्या हवामानामुळे दर मिळाला नाही. १५ मार्चनंतर दर वाढतोय. निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनावर शेतकऱ्यांचा भर आहे.

- शिवाजी पवार, अध्यक्ष, महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघ

टॅग्स :SolapurसोलापूरAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीMarketबाजार