शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

मोठी बातमी; राज्यातील द्राक्ष निर्यात वाढतेय; आतापर्यंत सव्वालाख टन द्राक्ष निर्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2022 16:42 IST

गुणवत्तेची द्राक्षे; निर्यातीचा वेग सुरूच

सोलापूर : मागील दोन वर्षे कोरोनामुळे अडचण झाल्याची सल मनात ठेवत उत्पादक शेतकऱ्यांनी यंदा गुणवत्तेची द्राक्षे तयार केल्याने निर्यात वाढली आहे. सोमवारपर्यंत राज्यातून एक लाख १० हजार ७८२ मे. टन द्राक्षं निर्यात झाली आहेत. अजूनही निर्यातीचा वेग सुरूच असल्याचे सांगण्यात आले.

मागील दोन वर्षे कोरोनामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. गुणवत्तेचे उत्पादन आणण्यासाठी कष्ट व पैसे खर्च केले तरी मालाची विक्री करायची अडचण होती. त्यामुळे शेतकऱ्यांसमोरील अडचणीत वाढच होत गेली. मागील वर्षी देशांतर्गत द्राक्ष विक्रीची अडचण होती; मात्र निर्यात सुरळीत होती. यावर्षी मात्र शेतीमाल विक्रीची अडचण राहिली नाही. शेतकऱ्यांनी यावर्षी निर्यातक्षम गुणवत्तेची द्राक्षे तयार केली असल्याने निर्यात मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.

महाराष्ट्रातील सात जिल्ह्यातून प्रामुख्याने द्राक्षे निर्यात होत आहेत. यामध्ये नाशिक जिल्ह्याचा मोठा वाटा आहे. युरोपियन देशात ८१ हजार १५३ टन द्राक्षाची निर्यात झाली आहे. इतर देशात केवळ नाशिक २३ हजार ७३३ टन तर सांगली जिल्ह्यात ५ हजार ८९६ मे.टन द्राक्ष निर्यात झाली आहेत. एकुण एक लाख १० हजार ७८२ मे.टन द्राक्ष निर्यात झाली असल्याचे सांगण्यात आले.

नाशिकची वाटचाल लाखाकडे..

राज्यातून निर्यात होणाऱ्या द्राक्षांमध्ये ९० टक्के वाटा हा एकट्या नाशिक जिल्ह्याचा आहे. एकट्या नाशिक जिल्ह्यातून ९७ हजार ५४८ टन द्राक्षे निर्यात झाली आहेत. अजूनही नाशिक जिल्ह्यातील द्राक्षाची निर्यात सुरूच आहे.

* सोलापूरसह राज्यातील इतर जिल्ह्यात उशिरापर्यंत व भरपूर पाऊस पडत राहिल्याने अनेक हेक्टर द्राक्ष बागांची नापिकी झाली. याशिवाय जानेवारी महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस व वाऱ्यामुळे द्राक्ष उत्पादनावर परिणाम झाल्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

* सुरुवातीला काही कंटेनर युक्रेन व रशियाला गेले मात्र युद्ध सुरू झाल्यानंतर या दोन्ही देशाची द्राक्ष निर्यात थांबली असल्याचे सांगण्यात आले.

 

अशी झाली निर्यात...

  • * नाशिक- ९७, ५४८
  • * सांगली- १०, ३४७
  • * सातारा- १,७४१
  • * पुणे जिल्हा- ५२७
  • * उस्मानाबाद- ३८६
  • * लातूर - १३६
  • * सोलापूर- ९७

 

एप्रिल महिनाअखेरपर्यंत द्राक्ष निर्यात होईल. सध्या द्राक्षाचा पीक कालावधी आहे. वाऱ्याचे व अवकाळी संकट आले नाही तर निर्यात वेगाने होईल. देशांतर्गत द्राक्ष विक्रीचे दर वाढत असले तरी द्राक्ष निर्यात करणारा शेतकरी वर्ग वेगळा आहे. यावर्षी आतापर्यंतच्या निर्यातीची आकडेवारी सव्वा लाखाच्या पुढे गेली आहे.

- गोविंद हांडे, निर्यात सल्लागार, महाराष्ट्र राज्य

 

यावर्षी पाऊस उशिरापर्यंत पडत राहिल्याने द्राक्ष बागामध्ये अनेक दिवस पाणी थांबले होते. त्यामुळे अनेक बागांना फलधारणा झाली नाही. त्यातूनही मोठ्या प्रमाणावर खर्च करून आणलेल्या मालाला सतत बदलणाऱ्या हवामानामुळे दर मिळाला नाही. १५ मार्चनंतर दर वाढतोय. निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनावर शेतकऱ्यांचा भर आहे.

- शिवाजी पवार, अध्यक्ष, महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघ

टॅग्स :SolapurसोलापूरAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीMarketबाजार