शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

मोठी बातमी; लस घेतली असेल तरच कामावर या; सोलापुरातील विडी कारखानदारांचा फतवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 12:01 IST

 सोलापुरात लसीच उपलब्ध नसताना विडी कामगारांना प्रमाणपत्र बंधनकारक

सोलापूर : जिल्ह्यात फक्त ४ टक्के कोरोना प्रतिबंधक लसीकरण झाले आहे. जिल्ह्यात लसींचा तुटवडा आहे. अशा पार्श्वभूमीवर विडी कामगारांना कारखान्यात काम मिळवण्यासाठी लस घेतल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. जिल्ह्यात लसींची उपलब्धता नसताना लस घेतल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक करणे हे कामगारांवर अन्यायकारक ठरत आहे. ‘इकडे आड-तिकडे विहीर’ अशी कामगारांची अवस्था झाल्यामुळे अनेक कामगारांना कामाविना परतावे लागत आहे. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याची माहिती ज्येष्ठ कामगार नेते माजी आमदार नरसय्या आडम यांनी ‘लोकमत’ला दिली.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे तब्बल दीड महिने विडी उद्योग बंद होता. या काळात ६० हजार विडी कामगारांची उपासमार झाली. कामगार संघटनांच्या आंदोलनानंतर प्रशासनाने विडी उद्योग सुरू करण्यास परवानगी दिली. विडी कारखान्यात येऊन पान-तंबाखू मिळण्याकरिता कामगारांना कारखान्यात कोरोना टेस्टचा निगेटिव्ह अहवाल सादर करणे बंधनकारक करण्यात आले. यासोबत लस घेतल्याचेही प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले.

कोरोना अहवाल फक्त पंधरा दिवसांसाठी वैद्य ठरत असल्याने कारखान्यांकडून लस घेतल्याचे प्रमाणपत्र वारंवार मागितले जात आहे. कारखानदारांना प्रशासनाची भीती आहे. कामगारांना कारखानदारांची भीती आहे. त्यामुळे कामगार लसीकरण केंद्रावर गर्दी करत आहेत. जवळपास ९५ टक्के कामगारांचे लसीकरण झालेले नाही. पूर्व भागातील बहुतांश लसीकरण केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत आहे. चार दिवसांनंतर गुरुवारी लसी उपलब्ध झाल्यामुळे सर्वच केंद्रांवर कामगारांची मोठी गर्दी होती. रोज एक, दोन टक्केच कामगारांना लस मिळत आहे.

अन्यथा रस्त्यावर उतरू

शासनाकडून नियमित लसी उपलब्ध होत नाहीत. सोलापूर जिल्हा इतका मोठा असताना फक्त ४ टक्के लसीकरण व्हावे, ही दुर्दैवाची बाब आहे. कामगारांना पोटासाठी रोज काम करणे गरजेचे आहे. प्रशासकीय अनेक निर्बंधांमुळे कामगारांच्या रोजीरोटीवर पुन्हा एकदा गदा येण्याची शक्यता आहे. शासनाने विडी कारखान्यातच लसीकरण मोहीम राबवावी. कामगारांना स्वतंत्रपणे लसी उपलब्ध करा; अन्यथा त्यांना जाचक अटींमधून सूट द्या. महिला विडी कामगार गरीब असून, अशिक्षित आहेत. त्यांना त्रास होऊ नये, याची काळजी शासनाने घ्यावी. कामगारांना त्रास होत असेल, तर आम्ही मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करू. पुन्हा रस्त्यावर उतरून सरकारचे लक्ष वेधू, असे माजी आमदार नरसय्या आडम यांनी सांगितले.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्या