शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

मोठी बातमी; लस घेतली असेल तरच कामावर या; सोलापुरातील विडी कारखानदारांचा फतवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 12:01 IST

 सोलापुरात लसीच उपलब्ध नसताना विडी कामगारांना प्रमाणपत्र बंधनकारक

सोलापूर : जिल्ह्यात फक्त ४ टक्के कोरोना प्रतिबंधक लसीकरण झाले आहे. जिल्ह्यात लसींचा तुटवडा आहे. अशा पार्श्वभूमीवर विडी कामगारांना कारखान्यात काम मिळवण्यासाठी लस घेतल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. जिल्ह्यात लसींची उपलब्धता नसताना लस घेतल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक करणे हे कामगारांवर अन्यायकारक ठरत आहे. ‘इकडे आड-तिकडे विहीर’ अशी कामगारांची अवस्था झाल्यामुळे अनेक कामगारांना कामाविना परतावे लागत आहे. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याची माहिती ज्येष्ठ कामगार नेते माजी आमदार नरसय्या आडम यांनी ‘लोकमत’ला दिली.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे तब्बल दीड महिने विडी उद्योग बंद होता. या काळात ६० हजार विडी कामगारांची उपासमार झाली. कामगार संघटनांच्या आंदोलनानंतर प्रशासनाने विडी उद्योग सुरू करण्यास परवानगी दिली. विडी कारखान्यात येऊन पान-तंबाखू मिळण्याकरिता कामगारांना कारखान्यात कोरोना टेस्टचा निगेटिव्ह अहवाल सादर करणे बंधनकारक करण्यात आले. यासोबत लस घेतल्याचेही प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले.

कोरोना अहवाल फक्त पंधरा दिवसांसाठी वैद्य ठरत असल्याने कारखान्यांकडून लस घेतल्याचे प्रमाणपत्र वारंवार मागितले जात आहे. कारखानदारांना प्रशासनाची भीती आहे. कामगारांना कारखानदारांची भीती आहे. त्यामुळे कामगार लसीकरण केंद्रावर गर्दी करत आहेत. जवळपास ९५ टक्के कामगारांचे लसीकरण झालेले नाही. पूर्व भागातील बहुतांश लसीकरण केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत आहे. चार दिवसांनंतर गुरुवारी लसी उपलब्ध झाल्यामुळे सर्वच केंद्रांवर कामगारांची मोठी गर्दी होती. रोज एक, दोन टक्केच कामगारांना लस मिळत आहे.

अन्यथा रस्त्यावर उतरू

शासनाकडून नियमित लसी उपलब्ध होत नाहीत. सोलापूर जिल्हा इतका मोठा असताना फक्त ४ टक्के लसीकरण व्हावे, ही दुर्दैवाची बाब आहे. कामगारांना पोटासाठी रोज काम करणे गरजेचे आहे. प्रशासकीय अनेक निर्बंधांमुळे कामगारांच्या रोजीरोटीवर पुन्हा एकदा गदा येण्याची शक्यता आहे. शासनाने विडी कारखान्यातच लसीकरण मोहीम राबवावी. कामगारांना स्वतंत्रपणे लसी उपलब्ध करा; अन्यथा त्यांना जाचक अटींमधून सूट द्या. महिला विडी कामगार गरीब असून, अशिक्षित आहेत. त्यांना त्रास होऊ नये, याची काळजी शासनाने घ्यावी. कामगारांना त्रास होत असेल, तर आम्ही मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करू. पुन्हा रस्त्यावर उतरून सरकारचे लक्ष वेधू, असे माजी आमदार नरसय्या आडम यांनी सांगितले.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्या