शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

मोठी बातमी; सोलापुरातील रिक्षाचा प्रवास आता झाला पाच रूपये महाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2022 17:46 IST

बारा वर्षांनंतर भाडेवाढ : पहिल्या दीड किमी. साठी २३ रूपये

सोलापूर : आता ऑटो रिक्षाने प्रवास करण्यासाठी पहिल्या दीड किलोमीटर प्रवासासाठी अगोदर खिशात २३ रुपये ठेवा मगच बसा. कारण परिवहन रिक्षाचालकांच्या आंदोलनानंतर प्राधिकरणाने नुकतीच १८ रुपये पहिल्या दीड किलोमीटरसाठी दरवाढ जाहीर केली होती. ती मान्य न करता फेरप्रस्तावाची मागणी केली होती. त्यानुसार आता पहिल्या दीड किलोमीटरसाठी २३ रुपये आणि त्यानंतर पुढील प्रत्येक किलोमीटरला १५ रुपये अशी दरवाढ सुचवली आहे.

गेल्या बारा वर्षांपासून महागाई वाढूनही रिक्षाचे प्रवासभाडे वाढले नसल्याने रिक्षाचालक कृती समितीचा उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे पाठपुरावा सुरू होता. आंदोलने, बंदही पुकारला होता. याची दखल घेऊन बैठक घेण्यात आली होती. त्यात रिक्षाचालकांची प्रतिकिलोमीटर ३० रुपयांची मागणी होती, मात्र प्रत्यक्षात बैठकीत पहिल्या दीड किलोमीटर प्रवासासाठी १८ रुपये दरवाढ सुचवली होती. ती मान्य न करता रिक्षा संघटनांनी याचा निषेध करीत आरटीओ प्रशासनाकडे फेरप्रस्ताव सादर केला होता. यात ही दरवाढ तुटपुंजी असल्याचे म्हटले होते. त्यानुसार आरटीओ प्रशासनाने हा प्रस्ताव परिवहन प्राधिकरणाकडे पाठवला होता.

यावर परिवहन प्राधिकरणाकडून साधकबाधक चर्चा होऊन तीन आसनी ऑटो रिक्षांसाठी पहिल्या दीड किलोमीटरसाठी २३ रुपयांची दरवाढ सुचवली आहे. त्यानंतर पुढील किलोमीटरसाठी १५ रुपये आकारता येईल, असे म्हटले आहे. ही दरवाढ १८ जुलैपासून अंमलात येणार असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

----

काय झाला नव्याने निर्णय

रिक्षाच्या नव्या दरवाढीनुसार महानगरपालिका क्षेत्रातील रिक्षांसाठी रात्री १२ ते पहाटे ५ या कालावधीसाठी २५ टक्के अतिरिक्त भाडे आकारता येणार आहे. लगेजसाठी ५ रुपये आकारता येईल. ग्रामीण भागातील रिक्षांसाठी या कालावधीसाठी ४० टक्के भाडे अतिरक्त आकारता येणार आहे.

---

मीटर पुन:प्रमाणीकरण करा

- दरवाढ झाल्यापासून ९० दिवसांच्या आता मीटर पुन:प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे. म्हणजे सध्या मीटरमध्ये नव्या दरवाढीचा समावेश संबंधित मेकॅनिककडून करून घ्यावा लागणार आहे. आणि त्याचे शासकीय तंत्रनिकेतन येथील संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रमाणीकरण करून घ्यावे लागणार आहे. जे रिक्षाचालक याची अंमलबजावणी करणार नाहीत, त्यांना सुधारित दरवाढीचा अंमल करता येणार नाही.

---

आम्ही गेली अनेक दिवसांपासून केलेल्या आंदोलनाला यश आले आहे. याबद्दल आम्ही समाधानी आहोत. मात्र यापुढे हकमी समितीच्या शिफारशीनुसार भाड्याचे रिव्हिजन होऊन दरवाढ व्हावी एवढीच अपेक्षा आहे.

- सलीम मुल्ला, समन्वयक, रिक्षाचालक कृती समिती

---

टॅग्स :Solapurसोलापूरauto rickshawऑटो रिक्षाRto officeआरटीओ ऑफीस