शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

मोठी बातमी; शेतीपंपाच्या वीज बिलात ५० टक्के माफीसाठी २३ दिवस शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2022 16:25 IST

वसुली मोहीम तीव्र; कमी अंतरावरील कृषी जोडण्या सुरू होणार

सोलापूर : शेती वीज बिलात ५० टक्के माफीसाठी २६ दिवस शिल्लक राहिले असून, शेतकऱ्यांनी थकीत बिलाची ५० टक्के रक्कम भरून कृषिपंपाचे वीज बिल कोरे करावे. शेती वीज बिलात ५० टक्के माफीसाठी २४ दिवस शिल्लक राहिले आहेत. दरम्यान, कमी अंतरावरील कृषी जोडण्याचे काम लवकरच सुरू होणार असल्याचेही महावितरणच्या सूत्राने सांगितले.

महाराष्ट्र शासनाने ‘कृषी धोरण-२०२०’ आणून राज्यातील शेतकऱ्यांना वीज थकबाकीतून बाहेर काढण्यासाठी मोठी सवलत दिली आहे. यामध्ये सप्टेंबर २०२० अखेर असलेल्या थकबाकीतील दंड-व्याज माफ करून, व्याजाचे पुनर्रगठण करून, वीज बिलाची दुरुस्ती करून सुधारित थकबाकी निश्चित केली आहे. या सुधारित थकबाकीवर ५० टक्के माफी देऊन शेतकऱ्यांना थकबाकीमुक्त करण्याचे व वसूल रकमेतील ६६ टक्के ‘कृषी आकस्मिक निधीतून’ वीज यंत्रणेला अधिक सक्षम करून गुणवत्तापूर्ण वीज शेतीला देण्याचे शासनाचे धोरण आहे.

शेतीपंपाचे कनेक्शन देताना बारामती परिमंडलाने जिथे खांब लागत नाही अशा ३० मीटर अंतराच्या आतील जोडण्या युद्धपातळीवर दिल्या. आता ३१ ते २०० मीटर अंतरामधील जोडण्या देण्याचे काम हाती घेतले असल्याचे महावितरणने सांगितले.

---------

संपूर्ण चालू वीज बिल भरले तरच वीजपुरवठा...

अनेक भागात काही शेतकरी जुजबी रक्कम भरून पैसे भरल्याचे सांगत आहेत. मात्र, या कालावधीत सप्टेंबर २०२० पासून आलेली शेतीची सर्व त्रैमासिक बिले भरणे सक्तीचे आहे. ही संपूर्ण चालू बिलाची रक्कम भरल्याशिवाय खंडित केलेला वीजपुरवठा सुरू केला जाणार नाही. जर योजनेच्या कालावधीत काही रक्कम भरली असेल तर उर्वरित रक्कम भरणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कारवाई टाळण्यासाठी सप्टेंबर २०२० पासूनची सर्व चालू बिले भरावीत असे आवाहन महावितरणने केले आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरagricultureशेतीmahavitaranमहावितरण