शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

बारा हजार खर्च करून शौचालयं बांधली भाऊसाहेबांनी अनुदान परस्पर उचललं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:23 IST

दक्षिण सोलापूर : स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्वखर्चाने बांधलेल्या शौचालयांचे अनुदान ग्रामसेवकांनी परस्पर उचलले. लाभार्थ्यांच्या हाती रक्कमच मिळाली नाही, अशी ...

दक्षिण सोलापूर : स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्वखर्चाने बांधलेल्या शौचालयांचे अनुदान ग्रामसेवकांनी परस्पर उचलले. लाभार्थ्यांच्या हाती रक्कमच मिळाली नाही, अशी तक्रार होनमुर्गी (ता.द. सोलापूर) येथील ग्रामस्थांनी सोलापूर जिल्हा परिषदेकडे केली आहे.

केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला शौचालय बांधण्याची सक्ती केली होती. होनमुर्गी ग्रामपंचायतीने याबाबत जनजागृती करीत शौचालय उभारणीसाठी प्रोत्साहन दिले. स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकामी पुढाकार घेतला आणि शौचालय उभारणीला गती मिळाली. होनमुर्गीच्या ग्रामसेवकांने यांनी स्वखर्चाने शौचालय उभारल्यास १२ हजार रुपये अनुदान मिळणार असल्याचे सांगितल्याने घरोघरी शौचालय उभारणीला वेग आला. कर्जाऊ रकमा घेऊन अनेकांनी शौचालय बांधकाम केले.

सन २०१६ ते २०१८ या तीन वर्षाच्या कालावधीत शौचालयाची उभारणी केलेल्या लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम देण्यास ग्रामसेवकाने सातत्याने टाळाटाळ केली. त्यानंतर त्यांची अन्यत्र बदली झाली. लाभार्थ्यांनी पंचायत समितीचे उंबरठे झिजवले. प्रशासनाने दाद घेतली नाही. त्यामुळे अजित उमराणी या कार्यकर्त्यांने लाभार्थ्यासह सोलापूर जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी, डेप्युटी सीईओ चंचल पाटील यांच्याकडे तक्रार केली. तक्रारीनंतर चौकशीची चक्रे फिरली आणि लाभार्थ्यांचे अनुदान कागदोपत्री वितरित केल्याचे निदर्शनास आले.

लाभार्थ्यांनी बँक खाती तपासली कोणाच्याही खात्यावर अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली नाही, याची खात्री पटल्यानंतर प्रशासनाने ग्रामसेवकाकडे केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. दरम्यान ग्रामसेवकाची बदली झाल्याने लाभार्थ्यांशी त्यांचा संपर्क राहिला नाही. त्यामुळे ही रक्कम मिळण्यासाठी लाभार्थ्यांनी सीईओ यांनाच साकडे घातले आहे.

-----

कॅश कार्डचा केला वापर

शौचालय बांधकामा दरम्यान अनुदानाच्या रकमा अदा करण्यासाठी लाभार्थ्यांची ॲक्सिस बँकेत खाती उघडण्यात आली. या खात्यांचे कॅश कार्ड काढण्यात आले. सर्व कार्ड ग्रामसेवकांनी स्वतःकडे ठेवून घेतले. याच कार्डचा वापर करीत २२ लाभार्थ्यांची प्रत्येकी १२ हजार रुपये प्रमाणे अनुदानाची रक्कम परस्पर काढण्यात आल्याची तक्रार अजित उमराणी यांनी केली आहे.

-------

ग्रामसेवक नॉट रिचेबल

ग्रामसेवक सी.एस.पाटील यांची बदली झाली आहे. लाभार्थी दोन वर्षापासून त्यांच्याशी संपर्क करण्याच्या प्रयत्नात आहेत. परंतु संपर्क होत नाही, अशी त्यांची तक्रार आहे. या प्रकाराबाबत माहिती घेण्यासाठी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनीही त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही तोच अनुभव आला.

-------

सरकारी योजनाना आम्ही प्रतिसाद दिला. पाच वर्षे पाठपुरावा करूनही ग्रामसेवकाने अनुदानाची रक्कम आमच्या खात्यावर जमा केली नाही. प्रशासनाने याची दखल घ्यायला हवी होती. आता त्यांच्यावर कारवाई करून रक्कम वसूल करावी, अशी आमची मागणी आहे.

- अजित उमराणी, लाभार्थी, होनमुर्गी

----