शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भक्तवत्सल परमपूज्य चन्नवीर महास्वामीजी...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 10:44 IST

लिं. ष. ब्र. परमपूज्य वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्यांचा आज पुण्यस्मरण दिवस!

ठळक मुद्देलहानपणापासून चन्नवीर स्वामीजी कुशाग्रबुद्धीचे होते.वयाच्या १५ व्या वर्षापासून चन्नवीर स्वामींनी अनुष्ठान सुरू केलेचन्नवीर स्वामींच्या आचार-विचारात पावित्र्य होते

लिं. ष. ब्र. परमपूज्य वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्यांचा आज पुण्यस्मरण दिवस! इ. स. १९२५ ते १९५६ पर्यंत ते होटगी मठाचे मठाधिपती होते. शेवटच्या क्षणापर्यंत ते मठाच्या कार्याला बांधील राहिले. त्यांच्या पवित्र भक्तांच्याप्रती त्यांच्या मनात असलेल्या वात्सल्यामुळे त्यांनी केलेल्या सामाजिक, शैक्षणिक कार्यामुळे बृहन्मठ होटगी मठाच्या इतिहासात त्यांचे नाव अजरामर झाले.

लहानपणापासून चन्नवीर स्वामीजी कुशाग्रबुद्धीचे होते. तेवढेच तेजस्वी रुप त्यांना लाभले होते. डोक्यावर जा, सडसडीत शरीरयष्टी, आरक्त गौर वर्ण, लांबूनही स्पष्ट दिसणारे त्यांच्या कपाळावरील भस्म, अंगावर भगवी सुती वस्त्रे, गळ्यात शिवलिंग, जोडीला एक पदरी रुद्राक्षाची माळ, पायात खडावा, हातामध्ये ‘श्री सिद्धान्त शिखामणी ग्रंथ’ त्यांचे नेत्र अभय देणारे होते. त्यांच्या वाणीत माधुर्य आणि जिव्हाळा होता. अतिशय प्रभावी, ओजस्वी वाणी! त्यामुळेच बिकट परिस्थितीत त्यांचा उपदेश लोकांच्या मनात रुजला आणि वाढला.त्यावेळी मौजे होटगी गाव आणि परिसरातील पंचक्रोशीत सामाजिक परिस्थिती अतिशय बिकट होती. जमीनदाराकडे सहकुटुंब मोलमजुरी करून टाकलेला तुकडा लाचारीने खाण्यापलीकडे सर्वसामान्य लोकांचे दुसरे जीवनच नव्हते. जिथे पोटापाण्याचा प्रश्न सुटत नव्हता, तिथे शिक्षणाचे नाव घेणेसुद्धा कोसोदूर होते. ग्रामीण जनतेची ही दशा चन्नवीर स्वामींना बघवेना. बृहन्मठात केवळ धार्मिक कार्यात गुंतणे त्यांना जमेना. ते मठाच्या बाहेर पडले. होटगी गावात, आजूबाजूच्या खेड्यात पायी चालत लोकांकडे जाऊन त्यांची विचारपूस करू लागले.

चन्नवीर स्वामींच्या आचार-विचारात पावित्र्य होते. स्वामींनी शिक्षणाचे महत्त्व पटवून सांगितले. त्यामुळे चन्नवीर स्वामीजींच्यावर ज्यांची भक्ती होती, ती वाढली आणि अतूट राहिली. नवीन भक्तांची संख्या वाढू लागली. गावात होत असणाºया पशुहत्येला ते विरोध करू लागले. अंधश्रद्धेने निष्पाप जनावरांना बळी देणे किती चुकीचे आहे,  हे त्यांनी लोकांना पटवून सांगितले. स्वामींनी सांगितलेला धर्म आपण सहज पाळू शकतो, असा विश्वास लोकांमध्ये निर्माण झाला. आपल्या मुलांना शिक्षण दिले तर ते स्वावलंबी होतील. आपल्यासारखे लाचारी जीवन त्यांच्या वाटेला येणार नाही, हे लोकांना कळून चुकले.

चन्नवीर स्वामी थोर साहित्यिक होते. त्यांनी अनेक भक्तीगीते आणि १७ नाटके स्वत:च्या हस्ताक्षरात लिहून ठेवलेली आहेत. समाज प्रबोधन हेच या नाटकाचं आणि भक्तीगीताचं सार आहे हे आजही आपल्याला जाणवतंय. आजही त्यांची भक्तीगीते श्रवणीय आहेत. आजही ग्रामीण भागात जत्रेच्या वेळी त्यांनी लिहिलेली नाटके आपल्याला जीवनातील सत्यता आणि वास्तवता सांगतात.शिक्षणाचा आणि धर्माचा प्रसार करीत चन्नवीर महास्वामीजी सोलापुरात आले. त्यांच्या भक्तांनी त्यांच्यासाठी उत्तर कसब्यामध्ये १९३९ मध्ये मोठे मठ बांधून दिले. स्वामीजींनी येथे ‘श्री मद्वीरशैव गुरुकुल’ नावाची संस्कृत पाठशाळा सुरू केली. त्यामुळे ग्रामीण भागातील व सोलापुरातील गरीब, होतकरू विद्यार्थ्यांची सोय झाली. या मठात शिक्षण घेऊन अनेक बटू तयार होऊन आपला जीवन व्यवसाय सुरू केला. काही बटू मठाधीश झाले तर काही पंचपीठाचे जगद्गुरू झाले. स्वामीजींनी सोलापुरातील भवानी पेठेत ‘सिद्धलिंगाश्रम’ वसतिगृह सुरू केले. सर्वधर्मीय गरीब विद्यार्थ्यांना इथे प्रवेश दिला. येथील अनेक विद्यार्थी उच्चपदावर कार्यरत राहून निवृत्त झाले. चन्नवीर महास्वामी दूरदृष्टीचे होते. १९४३ साली त्यांनी एम. आय. डी. सी. जवळची जागा विकत घेतली. आज त्याच जागेत भव्य शैक्षणिक संकुल आणि प्रेक्षणीय मंदिर उभे आहे.

वयाच्या १५ व्या वर्षापासून चन्नवीर स्वामींनी अनुष्ठान सुरू केले. त्यांचे अनुष्ठान कठीण व खडतर होते. त्यामुळेच त्यांना ‘बालतपस्वी’ व ‘वीरतपस्वी’ अशी पदवी बहाल करण्यात आली. त्यांचे सर्व तपोनुष्ठान भक्तांच्या कल्याणार्थ होते. त्यांनी केलेले कार्य सर्वांना संस्मरणीय आहे, अनुकरणीय आहे. त्यांच्या ‘आत्मज्योतीस’ प्रणाम!- चंद्रकला शीलवंत

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिक