शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

महिला भेदरतात, तरुणाई गांगरते...; महाराष्ट्रातील 'या' भागात रेल्वेने प्रवास करताना सावधान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2022 16:04 IST

जिंतीपासून कुर्डुवाडीपर्यंत रेल्वे प्रवाशांचा जीव मुठीत घेऊन प्रवास

सोलापूर: पुणे येथील कामे आटोपून परतत असलेला प्रवासी गाडी सुरू झाल्यानंतर काही वेळानंतर झोप घेऊ लागला. दौंड रेल्वे स्थानकानंतर सोलापूर जिल्ह्यातील जिंती रेल्वे स्थानक आले. अन खाकीवाला आला अन प्रवाशांनो, खिडक्या बंद करा पटकन, असे फर्मान सोडले. झोपेत असलेले प्रवासी दचकन उठले. गाढ झोप घेणाऱ्यांची झोपमोड झाली. 

सगळे इकडे तिकडे पाहू लागले. प्रवाशांनी खिडक्या पटापट बंद केल्या. महिलांनी दागिने आवरले. मोबाइलमध्ये गुंग असलेल्यांनी फोन खिशात ठेवले. माहिती नसलेल्यांना काय झालं, असं विचारणा करू लागले. दोन चार पुटपुटले रोजचे आहे हे...

रात्री ८:२५ वाजता सुरू झालेला खेळ ८:४५ ला संपला. जिंती रेल्वे स्थानकापासून सुरू झालेला भीतीचा प्रवास कुर्डुवाडी रेल्वे स्थानक आल्यानंतर संपला. तेथे प्रवाशांचा जीव भांड्यात पडला. पुण्यापासून सुरू झालेला प्रवास दौंडपासून भयभीत होण्यास सुरुवात झाली तर कुर्डुवाडीत सुटकेचा श्वास सोडल्यासारखे केले.

उपाययोजना करायला हव्या-

महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यामध्येच प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याची दुर्दैवी वेळ प्रवाशांवर रोज येत आहे. यासाठी संबंधितांनी एकत्र येऊन उपाययोजना करण्याची गरज आहे. आरपीएफ, तिकीट निरीक्षक, लोहमार्ग पोलिसांमध्ये समन्वय असल्यास आणखी सोपे होईल. सध्या असलेले मनुष्यबळही कमी पडत आहे. चोरट्यांमध्ये दहशत निर्माण होण्यासाठी बऱ्याच वेळा गोळीबारदेखील झाला आहे.

जिंती ते कुर्डुवाडीपर्यंत ब्लॅक स्पॉट-

सोलापूर रेल्वे स्थानक हे उत्तर भारताला दक्षिण भारताला जोडणारे रेल्वे स्थानक असल्यामुळे राज्यातीलच नव्हे तर देशभरातील प्रवासी हे प्रवास करीत असतात. प्रवास करीत असताना करमाळा तालुक्याच्या टोकाला असलेल्या जितीपासून माढा तालुक्यातील कुर्डुवाडी रेल्वे स्थानक गाठेपर्यंत जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याची परिस्थिती आहे. जिंतीपासून पारेवाडी, वाशिबे, पोफळज, जेऊर, भाळवणी, केम, ढवळस, कुईवाडीपर्यंतचा प्रवास हा ब्लॅक स्पॉट होत आहे.

या भागातच का चोरी-

जिंती ते कुर्डुवाडी हा भाग प्रामुख्याने उजनी धरणाचा बॅक वॉटर म्हणून ओळखला जातो. जवळपास ८० किमी परिसर अशा मोठ्या परिसरामध्ये पसरलेला हा भाग आहे. या भागामध्ये झाडे, शेती, चिलार यांची संख्या मोठी आहे. यामुळे चोरी करून चोरट्यांना पळण्यास मोठी संधी मिळते. शिवाय रेल्वे रुळाजवळ पसरलेल्या खडीचा फायदा घेऊन चोरटे पसार होतात. विस्तृत भागामध्ये पसरलेल्या चोरट्यांचा शोध घेणे पोलिसांनादेखील अवघड जाते.

चोरीची अशी आहे पध्दत-

रेल्वेची सिग्नल व्यवस्था बंद करून चोरी करण्याचे प्रकार जास्त आहे. रेल्वेच्या सिग्नलच्या वायर तोडणे, सिग्नल लाईटवर काळा कपडा टाकणे, चेन ओढणे, सर्कीट ब्रेक करण्याचे प्रकार चोरट्यांकडून केले जातात. कधी कधी तर रेल्वे रुळांवरच दगड ठेवण्याचेही प्रकार झालेले आहेत. या प्रकारानंतर गाडी थांबल्यानंतर स्टेशनपासून लांब असलेल्या शेवटच्या बोगीमध्ये चोरी करतात.

पेट्रोलिंगवर भर-

दौड़ते कुईवाडी हे अंतर जास्त आहे. रेल्वेमध्ये होणारी चोरी, दरोडा रोखण्यासाठी सशस्त्र जवानांकडून पेट्रोलिंग केली जात आहे. तसेच कोम्बिंग ऑपरेशनदेखील केले जाते. प्रवाशांनी चोरट्यांना चोरीची संधी न देता सुरक्षेची काळजी घ्यावी.- अमोल गवळी, पोलिस निरीक्षक, लोहमार्ग कुईवाडी ठाणे

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेRobberyचोरीMaharashtraमहाराष्ट्र