शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

महिला भेदरतात, तरुणाई गांगरते...; महाराष्ट्रातील 'या' भागात रेल्वेने प्रवास करताना सावधान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2022 16:04 IST

जिंतीपासून कुर्डुवाडीपर्यंत रेल्वे प्रवाशांचा जीव मुठीत घेऊन प्रवास

सोलापूर: पुणे येथील कामे आटोपून परतत असलेला प्रवासी गाडी सुरू झाल्यानंतर काही वेळानंतर झोप घेऊ लागला. दौंड रेल्वे स्थानकानंतर सोलापूर जिल्ह्यातील जिंती रेल्वे स्थानक आले. अन खाकीवाला आला अन प्रवाशांनो, खिडक्या बंद करा पटकन, असे फर्मान सोडले. झोपेत असलेले प्रवासी दचकन उठले. गाढ झोप घेणाऱ्यांची झोपमोड झाली. 

सगळे इकडे तिकडे पाहू लागले. प्रवाशांनी खिडक्या पटापट बंद केल्या. महिलांनी दागिने आवरले. मोबाइलमध्ये गुंग असलेल्यांनी फोन खिशात ठेवले. माहिती नसलेल्यांना काय झालं, असं विचारणा करू लागले. दोन चार पुटपुटले रोजचे आहे हे...

रात्री ८:२५ वाजता सुरू झालेला खेळ ८:४५ ला संपला. जिंती रेल्वे स्थानकापासून सुरू झालेला भीतीचा प्रवास कुर्डुवाडी रेल्वे स्थानक आल्यानंतर संपला. तेथे प्रवाशांचा जीव भांड्यात पडला. पुण्यापासून सुरू झालेला प्रवास दौंडपासून भयभीत होण्यास सुरुवात झाली तर कुर्डुवाडीत सुटकेचा श्वास सोडल्यासारखे केले.

उपाययोजना करायला हव्या-

महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यामध्येच प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याची दुर्दैवी वेळ प्रवाशांवर रोज येत आहे. यासाठी संबंधितांनी एकत्र येऊन उपाययोजना करण्याची गरज आहे. आरपीएफ, तिकीट निरीक्षक, लोहमार्ग पोलिसांमध्ये समन्वय असल्यास आणखी सोपे होईल. सध्या असलेले मनुष्यबळही कमी पडत आहे. चोरट्यांमध्ये दहशत निर्माण होण्यासाठी बऱ्याच वेळा गोळीबारदेखील झाला आहे.

जिंती ते कुर्डुवाडीपर्यंत ब्लॅक स्पॉट-

सोलापूर रेल्वे स्थानक हे उत्तर भारताला दक्षिण भारताला जोडणारे रेल्वे स्थानक असल्यामुळे राज्यातीलच नव्हे तर देशभरातील प्रवासी हे प्रवास करीत असतात. प्रवास करीत असताना करमाळा तालुक्याच्या टोकाला असलेल्या जितीपासून माढा तालुक्यातील कुर्डुवाडी रेल्वे स्थानक गाठेपर्यंत जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याची परिस्थिती आहे. जिंतीपासून पारेवाडी, वाशिबे, पोफळज, जेऊर, भाळवणी, केम, ढवळस, कुईवाडीपर्यंतचा प्रवास हा ब्लॅक स्पॉट होत आहे.

या भागातच का चोरी-

जिंती ते कुर्डुवाडी हा भाग प्रामुख्याने उजनी धरणाचा बॅक वॉटर म्हणून ओळखला जातो. जवळपास ८० किमी परिसर अशा मोठ्या परिसरामध्ये पसरलेला हा भाग आहे. या भागामध्ये झाडे, शेती, चिलार यांची संख्या मोठी आहे. यामुळे चोरी करून चोरट्यांना पळण्यास मोठी संधी मिळते. शिवाय रेल्वे रुळाजवळ पसरलेल्या खडीचा फायदा घेऊन चोरटे पसार होतात. विस्तृत भागामध्ये पसरलेल्या चोरट्यांचा शोध घेणे पोलिसांनादेखील अवघड जाते.

चोरीची अशी आहे पध्दत-

रेल्वेची सिग्नल व्यवस्था बंद करून चोरी करण्याचे प्रकार जास्त आहे. रेल्वेच्या सिग्नलच्या वायर तोडणे, सिग्नल लाईटवर काळा कपडा टाकणे, चेन ओढणे, सर्कीट ब्रेक करण्याचे प्रकार चोरट्यांकडून केले जातात. कधी कधी तर रेल्वे रुळांवरच दगड ठेवण्याचेही प्रकार झालेले आहेत. या प्रकारानंतर गाडी थांबल्यानंतर स्टेशनपासून लांब असलेल्या शेवटच्या बोगीमध्ये चोरी करतात.

पेट्रोलिंगवर भर-

दौड़ते कुईवाडी हे अंतर जास्त आहे. रेल्वेमध्ये होणारी चोरी, दरोडा रोखण्यासाठी सशस्त्र जवानांकडून पेट्रोलिंग केली जात आहे. तसेच कोम्बिंग ऑपरेशनदेखील केले जाते. प्रवाशांनी चोरट्यांना चोरीची संधी न देता सुरक्षेची काळजी घ्यावी.- अमोल गवळी, पोलिस निरीक्षक, लोहमार्ग कुईवाडी ठाणे

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेRobberyचोरीMaharashtraमहाराष्ट्र