शहरं
Join us  
Trending Stories
1
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
2
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
3
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
4
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
5
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
6
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
7
रतन टाटांच्या आवडत्या कंपनीला मोठा धक्का? मार्केट कॅप २००९ नंतर पहिल्यांदाच नीचांकी पातळीवर
8
सोनं १ लाखांपार, का उदय कोटक यांनी भारतीय महिलांना जगातील सर्वोत्तम फंड मॅनेजर म्हटलं?
9
डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
10
'या' ज्येष्ठ नागरिकांना आयकरात मिळते ५ लाखांची सवलत; आयटीआर भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या
11
वहिनीच्या बेडरूममधून येत होते चित्रविचित्र आवाज, दिराला आला संशय, दरवाजा उघडताच... 
12
छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक
13
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...
14
Astro Tips: अनेक जोडप्यांची इच्छा असूनही त्यांना संतती सौख्य लाभत नाही, असे का? जाणून घ्या!
15
UPSC परीक्षेचा निकाल जाहीर; पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा, प्रयागराजची शक्ती दुबे पहिल्या स्थानी
16
९ दिवसांत ३ शहरं! "व्हायरल झालो, आमच्याच बातम्या सर्वत्र"; जावयासह पळून गेलेली सासू म्हणाली...
17
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
18
१००-२०० नाही तर ट्रम्प यांनी थेट ३५२१% लावलं टॅरिफ, पण भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर बनले रॉकेट
19
छत्रपती संभाजीनगरात खंडपीठाला बॉम्बने उडवण्याची धमकी; कोर्टात शोध मोहीम, पोलिस अलर्ट
20
'पाच दिवसांत व्हिडीओ काढून टाका...', दिल्ली उच्च न्यायालयाचा रामदेव बाबांना दणका

महिला भेदरतात, तरुणाई गांगरते...; महाराष्ट्रातील 'या' भागात रेल्वेने प्रवास करताना सावधान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2022 16:04 IST

जिंतीपासून कुर्डुवाडीपर्यंत रेल्वे प्रवाशांचा जीव मुठीत घेऊन प्रवास

सोलापूर: पुणे येथील कामे आटोपून परतत असलेला प्रवासी गाडी सुरू झाल्यानंतर काही वेळानंतर झोप घेऊ लागला. दौंड रेल्वे स्थानकानंतर सोलापूर जिल्ह्यातील जिंती रेल्वे स्थानक आले. अन खाकीवाला आला अन प्रवाशांनो, खिडक्या बंद करा पटकन, असे फर्मान सोडले. झोपेत असलेले प्रवासी दचकन उठले. गाढ झोप घेणाऱ्यांची झोपमोड झाली. 

सगळे इकडे तिकडे पाहू लागले. प्रवाशांनी खिडक्या पटापट बंद केल्या. महिलांनी दागिने आवरले. मोबाइलमध्ये गुंग असलेल्यांनी फोन खिशात ठेवले. माहिती नसलेल्यांना काय झालं, असं विचारणा करू लागले. दोन चार पुटपुटले रोजचे आहे हे...

रात्री ८:२५ वाजता सुरू झालेला खेळ ८:४५ ला संपला. जिंती रेल्वे स्थानकापासून सुरू झालेला भीतीचा प्रवास कुर्डुवाडी रेल्वे स्थानक आल्यानंतर संपला. तेथे प्रवाशांचा जीव भांड्यात पडला. पुण्यापासून सुरू झालेला प्रवास दौंडपासून भयभीत होण्यास सुरुवात झाली तर कुर्डुवाडीत सुटकेचा श्वास सोडल्यासारखे केले.

उपाययोजना करायला हव्या-

महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यामध्येच प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याची दुर्दैवी वेळ प्रवाशांवर रोज येत आहे. यासाठी संबंधितांनी एकत्र येऊन उपाययोजना करण्याची गरज आहे. आरपीएफ, तिकीट निरीक्षक, लोहमार्ग पोलिसांमध्ये समन्वय असल्यास आणखी सोपे होईल. सध्या असलेले मनुष्यबळही कमी पडत आहे. चोरट्यांमध्ये दहशत निर्माण होण्यासाठी बऱ्याच वेळा गोळीबारदेखील झाला आहे.

जिंती ते कुर्डुवाडीपर्यंत ब्लॅक स्पॉट-

सोलापूर रेल्वे स्थानक हे उत्तर भारताला दक्षिण भारताला जोडणारे रेल्वे स्थानक असल्यामुळे राज्यातीलच नव्हे तर देशभरातील प्रवासी हे प्रवास करीत असतात. प्रवास करीत असताना करमाळा तालुक्याच्या टोकाला असलेल्या जितीपासून माढा तालुक्यातील कुर्डुवाडी रेल्वे स्थानक गाठेपर्यंत जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याची परिस्थिती आहे. जिंतीपासून पारेवाडी, वाशिबे, पोफळज, जेऊर, भाळवणी, केम, ढवळस, कुईवाडीपर्यंतचा प्रवास हा ब्लॅक स्पॉट होत आहे.

या भागातच का चोरी-

जिंती ते कुर्डुवाडी हा भाग प्रामुख्याने उजनी धरणाचा बॅक वॉटर म्हणून ओळखला जातो. जवळपास ८० किमी परिसर अशा मोठ्या परिसरामध्ये पसरलेला हा भाग आहे. या भागामध्ये झाडे, शेती, चिलार यांची संख्या मोठी आहे. यामुळे चोरी करून चोरट्यांना पळण्यास मोठी संधी मिळते. शिवाय रेल्वे रुळाजवळ पसरलेल्या खडीचा फायदा घेऊन चोरटे पसार होतात. विस्तृत भागामध्ये पसरलेल्या चोरट्यांचा शोध घेणे पोलिसांनादेखील अवघड जाते.

चोरीची अशी आहे पध्दत-

रेल्वेची सिग्नल व्यवस्था बंद करून चोरी करण्याचे प्रकार जास्त आहे. रेल्वेच्या सिग्नलच्या वायर तोडणे, सिग्नल लाईटवर काळा कपडा टाकणे, चेन ओढणे, सर्कीट ब्रेक करण्याचे प्रकार चोरट्यांकडून केले जातात. कधी कधी तर रेल्वे रुळांवरच दगड ठेवण्याचेही प्रकार झालेले आहेत. या प्रकारानंतर गाडी थांबल्यानंतर स्टेशनपासून लांब असलेल्या शेवटच्या बोगीमध्ये चोरी करतात.

पेट्रोलिंगवर भर-

दौड़ते कुईवाडी हे अंतर जास्त आहे. रेल्वेमध्ये होणारी चोरी, दरोडा रोखण्यासाठी सशस्त्र जवानांकडून पेट्रोलिंग केली जात आहे. तसेच कोम्बिंग ऑपरेशनदेखील केले जाते. प्रवाशांनी चोरट्यांना चोरीची संधी न देता सुरक्षेची काळजी घ्यावी.- अमोल गवळी, पोलिस निरीक्षक, लोहमार्ग कुईवाडी ठाणे

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेRobberyचोरीMaharashtraमहाराष्ट्र