शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
2
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
3
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
4
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
5
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
6
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
7
अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा रॉकेट! 'या' स्टॉकमध्ये १३% ची छप्परफाड वाढ; नेमकं काय घडलं?
8
"संजय राऊत सर्वात मोठा XXX, ते त्याच लायकीचे..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचं विधान
9
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
10
Video : दक्षिण कोरियात पोहोचले डोनाल्ड ट्रम्प; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केले तोंडभरून कौतुक! म्हणाले...
11
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
12
राम मंदिरासाठी भक्तांनी दिले तब्बल ३ हजार कोटींचे दान, १५०० कोटी खर्च; बांधकाम पूर्णत्वाकडे!
13
तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
14
गुड मॉर्निंग! उठल्यानंतर फॉलो करा २०-२०-२० रूल; दिवसभर राहाल पॉझिटिव्ह अन् एनर्जेटिक
15
IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
16
जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
17
निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
18
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
19
जेवण बनवता येत नाही, काही शिकवले नाही का? वरळीतील विवाहितेला छळ असह्य, सासरच्यांविरोधात दिली तक्रार
20
कमी भाड्याचं आमिष दाखवून महिलांना टॅक्सीत बसवायचे अन् रस्त्यातच...; कुठे घडत होत्या धक्कादायक घटना?

केवळ बापूंच्या स्मरणासाठी ९२ वर्षांपासून पलंगाची देखभाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 12:14 IST

महात्मा गांधींनी घेतली होती बैठक; वळसंगच्या तिसºया पिढीतील मेलकेरी कुटुंबाची अशीही सेवा

ठळक मुद्देमहात्मा गांधी यांच्या व्यक्तिमत्त्वाकडे फक्त भारतच नाही तर जगभर आदर्श म्हणून पाहिले जातेआदर्श महात्म्याची आठवण आपल्याकडे असणे हे भाग्याचे समजले जातेदक्षिण सोलापुरातील वळसंंग येथे महात्मा गांधी यांनी बसलेला पलंग आता सांभाळणे कठीण

शीतलकुमार कांबळे 

सोलापूर : महात्मा गांधी यांच्या व्यक्तिमत्त्वाकडे फक्त भारतच नाही तर जगभर आदर्श म्हणून पाहिले जाते. अशा आदर्श महात्म्याची आठवण आपल्याकडे असणे हे भाग्याचे समजले जाते. मात्र, दक्षिण सोलापुरातील वळसंंग येथे महात्मा गांधी यांनी बसलेला पलंग आता सांभाळणे कठीण जात असून, शासनाने तो आपल्या ताब्यात घ्यावा, अशी विनंती राजशेखर मेलकेरी यांनी केली आहे.

नागरिकांच्या मनात देशप्रेम जागृत करून स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी योगदान द्यावे, यासाठी महात्मा गांधी हे भारत भ्रमण करत होते. याचाच एक भाग म्हणून ते दक्षिण सोलापुरातील वळसंग येथे २७ फेब्रुवारी १९२७ मध्ये आले होते. शंकरलिंग मंदिरासमोरील कट्ट्यावर उभे राहून त्यांनी सभेला मार्गदर्शन केले. त्यांच्या भाषणामुळे गावात अनेक क्रांतिकारक तयार झाले. त्यांनी देश स्वतंत्र होण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले, अशी माहिती (कै.) स्वातंत्र्य सैनिक मल्लप्पा बिदरे यांची मुलगी गौराबाई बिदरे यांनी दिली. महात्मा गांधी यांची आठवण म्हणून त्या ठिकाणी एक फलक देखील लावण्यात आला आहे. महात्मा गांधी यांच्या जयंती दिवशी त्या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात येतो.

शंकरलिंग मंदिर येथे होणाºया बैठकीआधी महात्मा गांधी यांनी राचप्पा मेलके री यांच्या घरी बैठक घेतली होती. या बैठकीत सुमारे ३० नागरिक उपस्थित होते. या बैठकीत महात्मा गांधी हे एका पलंगावर बसले होते. महात्मा गांधी यांची आठवण म्हणून मागील तीन पिढ्यांपासून मेलकेरी कुटुंबीय या पलंगाची काळजी घेत आहेत. आता त्यांचा वाडा जुना झाला असून, तो केव्हाही कोसळू शकतो. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अर्ज केला असून, त्याची वाट पाहत असल्याचे राजशेखर मेलकेरी यांनी सांगितले.

इंग्रजांनी वाड्यातील वस्तू फेकल्या रस्त्यावर- महात्मा गांधी हे मेलकरी वाड्यात येऊन गेल्याची माहिती इंग्रजांना मिळाली होती. यानंतर त्यांनी या वाड्यातील वस्तू बाहेर फेकल्या. वाड्यातील काही हत्यारे, तिजोरीतील दागिने हस्तगत केले. तसेच वाड्याची मोडतोडही केली. आठवडाभर गावात तणाव होता. गावातील काही लोक गाव सोडून परागंदा झाले होते. इंग्रजांनी फोडलेली तिजोरी आजही मेलकरी वाड्यात आहे.

महात्मा गांधी व आजोबांची आठवण म्हणून हा पलंग इतके दिवस जपून ठेवला. या पलंगाशी आमच्या कुटुंबीयांच्या भावना जुळलेल्या आहेत. मी जोपर्यंत जिवंत असेन तोपर्यंत या पलंगाची काळजी घेईन, माझ्यानंतरही हा वारसा जतन व्हावा, असे वाटत असल्याने शासनाने हा पलंग ताब्यात घ्यावा, अशी माझी विनंती आहे. यासाठी मला कोणताही मोबदला नको आहे.- राजशेखर मेलकेरी, मेलकेरी वाड्याचे मालक

टॅग्स :SolapurसोलापूरMahatma Gandhiमहात्मा गांधी