शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
3
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
4
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
5
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
6
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
7
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
8
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
9
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
10
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
11
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
12
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
13
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
14
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
15
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
16
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
17
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
18
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
19
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
20
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात

माणूस बना, सांगतोय कोरोना...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 13:11 IST

जो निसर्ग माणसाला पिढ्यान्पिढ्यांपासून  दोस्तीचा, मैत्रीचा हात पुढे करतोय त्या निसर्गाचा हातच तोडून घेण्याचा प्रयत्न माणसानं केला.

कोरोना या महामारीनं जगात हाहा:कार माजवला आहे. कधी नव्हे ते विमानाचं, रेल्वेचं, साºयाच यंत्रांची चाकं जागेवर थांबविली या कोरोनानं. हे कमी झालं की काय म्हणून साºया साºया देवांना, अल्लाहला कुलूपबंद व्हावं लागलं. अनेक लग्नं थांबली. अंत्ययात्रेलासुद्धा चोरून जाता येईना. भारतात ४९,४०० बाधित असून, आजवर १,६९३ जण बळी गेलेत. उभ्या मानवजातीनं सारा निसर्ग ओरबाडून टाकला. नद्या बुजवल्या, समुद्र पुढे ढकलले, डोंगर, पर्वत होत्याचे नव्हते केले. ‘लवासा’सारखी शहरं यातून निर्माण झाली. प्राणिमात्रांचं तर विचारूच नका. ज्या चीनमधून कोरोनाचा उदय झाला त्या चीननं नको ते खाल्लं. कोंबडी, बकरी, जनावरं, मांस, मच्छी तर खाल्ली पण, घोरपडी, खेकड्याबरोबरच साप, पाली, उंदीर, झुरळंसुद्धा खाल्ली  अन् मग मात्र निसर्गाचा पारा चढला.

जो निसर्ग माणसाला पिढ्यान्पिढ्यांपासून  दोस्तीचा, मैत्रीचा हात पुढे करतोय त्या निसर्गाचा हातच तोडून घेण्याचा प्रयत्न माणसानं केला. मुंबईसारख्या मेट्रोपॉलिटन शहरात माणसांना राहायला जागा कमी पडायला लागली म्हणून खडी, माती, सिमेंटचे ठोकळे टाकून समुद्र पुढे ढकलला. चंद्रकोर मणिहारसारखा मरीन लाईन मार्ग तयार केला. मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झाले, २६/११ चा हल्ला झाला. तरी मुंबई क्षणभरही थांबली नाही. परंतु कोरोनाने मुंबई थांबवून एक महिना होऊन गेलाय, आता तरी माणसाने माणूस बनायचा प्रयत्न केला पाहिजे.

आई-वडिलांना, नातेवाईकांना विसरणारा दिल्ली, पुण्या-मुंबईचा माणूस आज खेड्यात, गावाकडे आलाय, अडकून पडलेला येऊ पाहतोय. शहरातल्या ‘एसी’त राहणारी माणसं आज छपरातील अन् झाडाखालची हवा, सावली चांगली म्हणून गोड मानून घेताहेत. पुण्या-मुंबईत नोकरी करणारा ‘नवरा’ पाहिजे म्हणणाºया पोरी आज ‘मला ममईचा नवरा नको गं बाई’ म्हणायला लागल्यात. असं असलं तरी आपले हे लोक ‘माणूस’ बदलायला तयार नाहीत. आपली सेवा अहोरात्र करणारे डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी अन् घरादारापासून, लेकरा-बाळांपासून दूर राहून उन्हातान्हात उभा राहून आपले रक्षण करणाºया पोलिसांवर हल्ला करणारी माणसं, महाराष्टÑापासून ते हरयाणापर्यंत दिसताहेत.

माणसानं हवेचं प्रदूषण केलं, ध्वनीचं प्रदूषण केलं, पाण्याचं प्रदूषण केलं, झाडं तोडली आणि म्हणून ‘ओझोन’चा स्तर वितळू लागला अशी तक्रार पर्यावरणप्रामी, खगोलशास्त्रज्ञ यांनी वारंवार केलेली होती. परंतु याकडे सगळ्यांनी दुर्लक्ष केलं होतं. ‘कोरोना’च्या लॉकडाऊनमुळे सारी यंत्रं थांबली, सगळी चाकं थांबलीत. पवित्र समजल्या जाणाºया गंगा नदीपासून ते आमच्या पंढरपूर येथील चंद्रभागापर्यंतच्या सर्व नद्या आज स्वच्छ होत आहेत. दिल्लीच्या वाहनांचा धूर आहे की वाहनांच्या धुरात, धुळीत दिल्ली आहे हे कळत नव्हतं. आमच्या सोलापूरची तºहाही यापेक्षा वेगळी नव्हती. परंतु आमचं सोलापूर आज प्रदूषणमुक्त होतंय.

कोरोनामुळे खरं मोकळा श्वास घेतलाय तो जलचर प्राणी, पक्षी, जंगली, हिंस्र प्राणी यांनी. मुंबईच्या भर चौकात येऊन मोर आज थुई थुई नाचताना दिसताहेत. सोलापूरच्या सिद्धेश्वर मंदिरात दर्शनासाठी येणारे भाविक थांबले अन् त्यांची जागा आज बदकांनी घेतली. मंदिराचा गाभारा बदकांनी भरलेलं छायाचित्र आम्हाला ‘लोकमत’नं दाखविलं. ही सारी किमया एका महाभयानक अशा सूक्ष्म कोरोनाने करून दाखविली. या कोरोनाला निमंत्रण आपणंच दिलंय. ‘माणूस’ माणुसकी शून्य झाला म्हणून कोरोना आला. तो आला अन् त्याने सारं जग व्यापून टाकलं. 

आता तरी आपण देव देवळात नाही, मंदिरात नाही, चर्चमध्ये नाही, मस्जिदीमध्ये नाही, आगºयात नाही तर आई-वडिलांमध्ये आहे. वृद्ध माणसात आहे. अंध, दिव्यांग, अधू माणसात आहे. अंध, मूकबधिर, मतिमंद, दिव्यांगात आहे. लहान लेकरात आहे. गायीच्या वासरात आहे. शेळीच्या कोकरात आहे. घोड्याच्या शिंगरात आहे. झाडावरच्या पाखरात आहे. हे आम्ही ओळखलं पाहिजे. तसं कळलं पाहिजे. तसं वागलं पाहिजे. यासाठी पहिल्यांदा आम्ही माणसातला माणूस शोधला पाहिजे. त्यासाठी आम्ही ‘माणूस’ झालं पाहिजे, लोक माणूस नाहीत ते माणूस बनण्याची प्रक्रिया आजपासून तरी सुरू करतील, ही अपेक्षा बाळगतो.- अण्णासाहेब भालशंकर(लेखक शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत.) 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याenvironmentपर्यावरण