शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

बार्शीचा विस्तार पोहोचला नऊ गावांच्या वेशीपर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:50 IST

बार्शी : दक्षिणोत्तर राज्यांशी जोडलेली उतारपेठ अशी पूर्वापार ओळख असणारी बार्शी शहर दक्षिण भारताची उत्तर काशी, शैक्षणिक माहेरघर, ...

बार्शी : दक्षिणोत्तर राज्यांशी जोडलेली उतारपेठ अशी पूर्वापार ओळख असणारी बार्शी शहर दक्षिण भारताची उत्तर काशी, शैक्षणिक माहेरघर, मेडिकल हब म्हणून जिल्ह्यात अग्रेसर आहे. शहराच्या उत्तरेला गाताचीवाडी, पश्चिमेला खांडवी अलीपूर, नागोबाची वाडी, वायव्येला लक्ष्याचीवाडी, गाडेगाव, दक्षिणेला कासारवाडी, तर पूर्वेला जामगावच्या पुढे आणि दक्षिण पूर्वेला कदम वस्तीपर्यंत रहिवासी वस्ती व प्लॉटिंग आणि औद्योगिकरण नऊ गावांच्या वेशीपर्यंत विस्तारले आहे.

सहा दशकांचा इतिहास असणारी बाजार समिती, तीन सहकारी औद्योगिक वसाहती, जिल्हा दूध संघाचा सरकारी प्रकल्प व खासगी उर्जित दूध उद्योग, कृषिनिष्ठ उत्पादनांच्या कारखानदारीमुळे, अन्नप्रक्रिया उद्योगापासून ते अत्याधुनिक दुचाकी, चारचाकी बहुउद्देशीय कंपन्यांच्या वितरकापर्यंत सर्वांगाने बार्शीची उद्यमशीलता वाढली आहे.

कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे संस्थापित शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, कर्मवीर लोहकरे गुरुजींच्या शिवाजी शिक्षण मंडळापासून बारबोले बंधूंच्या यशोदा शिक्षण प्रसारक मंडळापर्यंत या शहरातील शैक्षणिक संस्था समूहांची गुणवत्तापूर्ण वाढ झाली आहे.

आशिया खंडातील ग्रामीण भागातील सर्वात मोठे कॅन्सर हॉस्पिटल, राज्यातील सहकारी तत्त्वावरील पहिले डॉ. हिरेमठ हॉस्पिटल, डॉक्टर जगदाळे मामा हॉस्पिटल व अनेक खासगी हॉस्पिटल्समुळे बार्शी शहर मेडिकल हब बनले आहे. सोलापूर - उस्मानाबाद जिल्ह्यातून नागरिकांची बार्शी शहरात स्थायिक होण्याची संख्या ही विविध कारणांमुळे वाढली आहे.

-----

का आणि कशी वाढली बार्शी ?

आगळगाव रोड, लातूर रोड, कुर्डूवाडी रोड, तुळजापूर रोड याठिकाणी बहुउद्देशीय कंपन्यांच्या वाहनांचे वितरक व कृषिनिष्ठ उत्पादकांच्या मोठमोठ्या एजन्सीज.

अलीपूर रोड, उपळाई रोड, परंडा रोड, रेल्वे स्टेशन रोड, कासारवाडी रस्ता, फपळवाडी रस्ता, ताडसौदणे रस्ता, गाडेगाव रस्ता या भागात लघु, मध्यम तसेच मोठे रहिवासी गृह प्रकल्प कार्यान्वित.

बाह्यवळण रस्त्यामुळे जड वाहनांच्या रहदारीचा ओघ झाला कमी.

शहरातून जाणाऱ्या राज्य महामार्गांमुळे

हॉटेलिंग कल्चरमध्ये वाढ.

महानगरांमध्ये मिळणाऱ्या वैद्यकीय उपचारांची सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमुळे सोय.

अखिल भारतातील भगवंतरुपी हेमाडपंथी पुरातन मंदिर बनले हजारो यात्रेकरूंचे श्रद्धास्थान.

आंतरराष्ट्रीय नामांकीत शिक्षण संस्था अलीपूर, ताडसौदणे रोड, लातूर रोड येथे सोय.

---

उच्च माध्यमिक शिक्षण मी जेव्हा बार्शीत घेतले तेव्हापासून आजमितीस काही भाग हद्दवाढ झाला. रहिवासी वस्ती, शैक्षणिक व औद्योगिक वाढ आणि लोकसंख्या व रहदारी यांचा विचार केला तर आजची परिस्थिती आणि तेव्हाची परिस्थिती यामध्ये अक्षरशः जमीन आणि आकाश याचा फरक काय असतो, हे लक्षात येते.

- डॉ. बी. वाय. यादव

ज्येष्ठ सर्जन

---

लोकसंख्या आणि नागरी वस्ती वाढण्याबरोबरच औद्योगिकीकरण वाढले पाहिजे. सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावले पाहिजे. नव्याने येणाऱ्या उद्योगांसाठी राजकीय पाठबळाची आवश्यक्ता आहे.

-रामचंद्र सोमानी

ज्येष्ठ व्यापारी