शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
3
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
4
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
5
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
6
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
7
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
8
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
9
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
10
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
11
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
12
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
13
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
14
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
15
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
16
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
17
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
18
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
19
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
20
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज

बाबासाहेबांचा ‘जयभीम’ बुलंद करा, रामदास आठवले यांचे आवाहन, सोलापूर शहर-जिल्हा कार्यकर्ता मेळाव्याचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 11:39 IST

पक्ष रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया हा पक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील पक्ष असून  या माध्यमातून  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सर्व समाजात तळागाळापर्यंत रुजवून समता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

ठळक मुद्दे सामाजिक समता निर्माण करण्यासाठी सर्व जातीला घेऊन रिपाइं (अ) काम करीत आहे : रामदास आठवलेपक्ष विरोधात गेल्याने ३२ जणांना काढले : राजा सरवदेराज्यात दौरे करीत असताना मी एकटा फिरत नाही, तर माझ्यासोबत राजा सरवदे यांना : रामदास आठवले

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २६ :  पक्ष रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया हा पक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील पक्ष असून  या माध्यमातून  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सर्व समाजात तळागाळापर्यंत रुजवून समता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पक्षाची व्याप्ती देशभर वाढत आहे. आता सर्व समाजाला सोबत घ्या, बाबासाहेबांचा ‘जयभीम’ बुलंद करा, असे आवाहन रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (अ) च्या वतीने हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या सोलापूर शहर-जिल्हा कार्यकर्ता मेळाव्यात रामदास आठवले बोलत होते. यावेळी मंचावर रिपाइं (अ) चे प्रदेश सरचिटणीस राजा सरवदे, जिल्हाध्यक्ष अशोक सरवदे, सुनील सर्वगोड, आबासाहेब दैठणकर, प्रदेश उपाध्यक्ष के.डी. कांबळे, शहराध्यक्ष राजरत्न इंगळे, सुमित वंजाळ, अल्ताफ मुल्ला, जितेंद्र बनसोडे, डॉ. विजय मोरे, ज्ञानदेव खंडागळे, दीपक चंदनशिवे, सोमनाथ भोसले आदी पदाधिकारी उपस्थित होते. ‘मी वाजवतोय समतेचा बाजा, कारण माझ्या सोबत आहे सोलापूरचा राजा’ अशी शीघ्र कविता सादर करीत रामदास आठवले म्हणाले की, दि.२५ डिसेंबर १९२७ रोजी रायगड जिल्ह्यातील महाड गावी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा चवदार तळे येथे पाण्याचा सत्याग्रह केला तेव्हा समाजावर हल्ला झाला होता. प्रतिहल्ला करण्यासाठी त्यावेळी हजारो भीमसैनिकांनी तयारी केली होती, मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना दगडाचे उत्तर दगडाने देऊन चालणार नाही. परिवर्तन करण्याचा माझा प्रयत्न आहे, असे सांगितले होते. सामाजिक समता निर्माण करण्यासाठी सर्व जातीला घेऊन रिपाइं (अ) काम करीत आहे. मला मंत्रिपद महत्त्वाचे नाही, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसाठी मी काम करतोय. सत्तेत राहिल्यानंतर समाजाची छोटी- मोठी कामे होतात. ही कामे करण्याचा माझा प्रयत्न असतो. मी दररोज हजारो लोकांना भेटतो, त्यांच्या अडचणी जाणून घेतो. सध्या पक्ष अन्य राज्यांतही वाढत आहे, काम वाढले आहे. विविध राज्यांचे दौरे सुरू आहेत. दलित, बौद्ध, ख्रिश्चन, ओबीसी, मुस्लीम, माळी आदी समाजाला सोबत घेऊन काम करीत आहे. मराठा आघाडीचीही स्थापना केली असून पदाधिकाºयांच्या निवडीही झाल्या आहेत. खºया अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील पक्ष निर्माण करीत आहोत. पक्षाला व्यापक स्वरूप द्यायचे आहे. रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (अ) मजबूत करू, असेही यावेळी रामदास आठवले म्हणाले. ------------------------माझ्यानंतर मान राजाचा...रिपाइं (अ) च्या माध्यमातून आंबेडकरी चळवळ सर्वव्यापी करीत आहे. राज्यात दौरे करीत असताना मी एकटा फिरत नाही, तर माझ्यासोबत राजा सरवदे यांना घेत असतो. राजकीय वाटचालीत माझ्यानंतरचा मान मी राजा सरवदे यांनाच देणार आहे, असे रामदास आठवले यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले. -------------------------पक्ष विरोधात गेल्याने ३२ जणांना काढले : राजा सरवदे- २0१७ च्या महानगरपालिका निवडणुकीत अन्य पक्षाच्या तिकिटावर उमेदवारी घ्यायची नाही असे सांगितले असताना देखील काही लोकांनी मनाचा कारभार केला. पक्षाचा आदेश डावलून स्वार्थी कार्यकर्ते भाजपात गेले, त्यामुळे मी सोलापूरसह महाराष्ट्रातील ३२ जणांना पक्षातून काढून टाकले. भीमा- कोरेगाव येथील हल्ला हा नियोजित होता, त्या भागातील वडू, शिखरापूर, सणसवाडी येथे राष्ट्रवादीची सत्ता आहे. रिपब्लिकन ऐक्य व्हावे पण ते कायमस्वरूपी टिकावे अशी आपली भूमिका आहे. आगामी निवडणुकीसाठी बुथवाईज आपण आपले कार्यकर्ते मजबूत करा. कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षाचे काम केले पाहिजे. दि.१६ मार्च २०१८ रोजी तालकटोरा, दिल्ली येथे पक्षाचे अधिवेशन होणार आहे, असे यावेळी प्रदेश सरचिटणीस राजा सरवदे यांनी सांगितले. 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेSolapurसोलापूर