शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेबांचा ‘जयभीम’ बुलंद करा, रामदास आठवले यांचे आवाहन, सोलापूर शहर-जिल्हा कार्यकर्ता मेळाव्याचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 11:39 IST

पक्ष रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया हा पक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील पक्ष असून  या माध्यमातून  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सर्व समाजात तळागाळापर्यंत रुजवून समता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

ठळक मुद्दे सामाजिक समता निर्माण करण्यासाठी सर्व जातीला घेऊन रिपाइं (अ) काम करीत आहे : रामदास आठवलेपक्ष विरोधात गेल्याने ३२ जणांना काढले : राजा सरवदेराज्यात दौरे करीत असताना मी एकटा फिरत नाही, तर माझ्यासोबत राजा सरवदे यांना : रामदास आठवले

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २६ :  पक्ष रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया हा पक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील पक्ष असून  या माध्यमातून  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सर्व समाजात तळागाळापर्यंत रुजवून समता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पक्षाची व्याप्ती देशभर वाढत आहे. आता सर्व समाजाला सोबत घ्या, बाबासाहेबांचा ‘जयभीम’ बुलंद करा, असे आवाहन रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (अ) च्या वतीने हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या सोलापूर शहर-जिल्हा कार्यकर्ता मेळाव्यात रामदास आठवले बोलत होते. यावेळी मंचावर रिपाइं (अ) चे प्रदेश सरचिटणीस राजा सरवदे, जिल्हाध्यक्ष अशोक सरवदे, सुनील सर्वगोड, आबासाहेब दैठणकर, प्रदेश उपाध्यक्ष के.डी. कांबळे, शहराध्यक्ष राजरत्न इंगळे, सुमित वंजाळ, अल्ताफ मुल्ला, जितेंद्र बनसोडे, डॉ. विजय मोरे, ज्ञानदेव खंडागळे, दीपक चंदनशिवे, सोमनाथ भोसले आदी पदाधिकारी उपस्थित होते. ‘मी वाजवतोय समतेचा बाजा, कारण माझ्या सोबत आहे सोलापूरचा राजा’ अशी शीघ्र कविता सादर करीत रामदास आठवले म्हणाले की, दि.२५ डिसेंबर १९२७ रोजी रायगड जिल्ह्यातील महाड गावी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा चवदार तळे येथे पाण्याचा सत्याग्रह केला तेव्हा समाजावर हल्ला झाला होता. प्रतिहल्ला करण्यासाठी त्यावेळी हजारो भीमसैनिकांनी तयारी केली होती, मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना दगडाचे उत्तर दगडाने देऊन चालणार नाही. परिवर्तन करण्याचा माझा प्रयत्न आहे, असे सांगितले होते. सामाजिक समता निर्माण करण्यासाठी सर्व जातीला घेऊन रिपाइं (अ) काम करीत आहे. मला मंत्रिपद महत्त्वाचे नाही, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसाठी मी काम करतोय. सत्तेत राहिल्यानंतर समाजाची छोटी- मोठी कामे होतात. ही कामे करण्याचा माझा प्रयत्न असतो. मी दररोज हजारो लोकांना भेटतो, त्यांच्या अडचणी जाणून घेतो. सध्या पक्ष अन्य राज्यांतही वाढत आहे, काम वाढले आहे. विविध राज्यांचे दौरे सुरू आहेत. दलित, बौद्ध, ख्रिश्चन, ओबीसी, मुस्लीम, माळी आदी समाजाला सोबत घेऊन काम करीत आहे. मराठा आघाडीचीही स्थापना केली असून पदाधिकाºयांच्या निवडीही झाल्या आहेत. खºया अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील पक्ष निर्माण करीत आहोत. पक्षाला व्यापक स्वरूप द्यायचे आहे. रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (अ) मजबूत करू, असेही यावेळी रामदास आठवले म्हणाले. ------------------------माझ्यानंतर मान राजाचा...रिपाइं (अ) च्या माध्यमातून आंबेडकरी चळवळ सर्वव्यापी करीत आहे. राज्यात दौरे करीत असताना मी एकटा फिरत नाही, तर माझ्यासोबत राजा सरवदे यांना घेत असतो. राजकीय वाटचालीत माझ्यानंतरचा मान मी राजा सरवदे यांनाच देणार आहे, असे रामदास आठवले यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले. -------------------------पक्ष विरोधात गेल्याने ३२ जणांना काढले : राजा सरवदे- २0१७ च्या महानगरपालिका निवडणुकीत अन्य पक्षाच्या तिकिटावर उमेदवारी घ्यायची नाही असे सांगितले असताना देखील काही लोकांनी मनाचा कारभार केला. पक्षाचा आदेश डावलून स्वार्थी कार्यकर्ते भाजपात गेले, त्यामुळे मी सोलापूरसह महाराष्ट्रातील ३२ जणांना पक्षातून काढून टाकले. भीमा- कोरेगाव येथील हल्ला हा नियोजित होता, त्या भागातील वडू, शिखरापूर, सणसवाडी येथे राष्ट्रवादीची सत्ता आहे. रिपब्लिकन ऐक्य व्हावे पण ते कायमस्वरूपी टिकावे अशी आपली भूमिका आहे. आगामी निवडणुकीसाठी बुथवाईज आपण आपले कार्यकर्ते मजबूत करा. कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षाचे काम केले पाहिजे. दि.१६ मार्च २०१८ रोजी तालकटोरा, दिल्ली येथे पक्षाचे अधिवेशन होणार आहे, असे यावेळी प्रदेश सरचिटणीस राजा सरवदे यांनी सांगितले. 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेSolapurसोलापूर