शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
3
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
4
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
6
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
7
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
8
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
9
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
10
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
11
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
13
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
14
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
15
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
16
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
17
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
18
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
19
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
20
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

सामाजिक बांधिलकीची ठेवूनी जाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:20 IST

गुरुजी राबवताहेत तणाव मुक्ती अभियान संदीप लोणकर श्रीपूर : कोविडच्या काळात सर्वत्र श्रद्धांजलीच्या पोस्ट, फोटो, नकारात्मक बातम्या या बाबी ...

गुरुजी राबवताहेत तणाव मुक्ती अभियान

संदीप लोणकर

श्रीपूर : कोविडच्या काळात सर्वत्र श्रद्धांजलीच्या पोस्ट, फोटो, नकारात्मक बातम्या या बाबी गावकऱ्यांच्या मनामध्ये भीती, दहशत, मानसिक ताण निर्माण करण्यास कारणीभूत ठरत होत्या. अशावेळी पॉझिटिव्ह रुग्ण व त्यांचे नातेवाईक, सर्व गावकऱ्यांना या ताणतणावातून बाहेर काढून त्यांचे समुपदेशन करण्यासाठी कैलास गायकवाड सर सरसावले आहेत.

मूळ चाकोरे गावचे रहिवासी असलेले व सध्या अकलूज येथे कार्यरत असलेले कैलास गायकवाड गुरुजींनी ही कल्पना मांडली. इतर शिक्षकांनी लगेच सहमती देत या उपक्रमांमुळे गावातील वातावरण सकारात्मक होण्यास मदत होत आहे. चाकोरे (तालुका माळशिरस) हे गाव सध्या कोरोनाचा हॉटस्पॉट बनले आहे. अनेक व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. सध्या पंधरा ते सतरा व्यक्ती पॉझिटिव्ह असून, ते घरी विलगीकरणात आहेत. सहा ते आठ जण विविध हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. उजाडणारा दिवस कोणती बातमी घेऊन येतोय याचीच भीती प्रत्येकाच्या मनात दिसायला लागली होती.

या ग्रुपमध्ये बाळासाहेब शिंदे, गुरुनाथ स्वामी, एकनाथ कदम, दत्तात्रय टकले, हरी खरात, अर्जुन ननवरे, तात्याराम कुंभार,बाळासाहेब कुंभार, अमर गायकवाड, नाना वरकड, सचिन भोसले, विजय शिंदे, अजिनाथ शिंदे, विष्णू शिंदे, अभिजित बनकर,अनिल शिंदे, देविदास वरकड, ज्योतीराम भोसले, संतोष ढवळे हे सकारात्मक वातावरण तयार करण्यासाठी कार्य करीत आहेत.

आणि नकारात्मक पोस्ट बंद केल्या

गावात गावकऱ्यांचे दोन व्हॉट्‌सॲप ग्रुप आहेत. सरपंच अर्चना शिंदे व जि. प. सदस्या मंगल वाघमोडे यांच्याशी चर्चा करून गावकऱ्यांच्या दोन्ही व्हॉट्‌सॲप ग्रुपचे सेटिंग बदलून ओन्ली ॲडमिन कॅन सेन्ड मेसेजेस असे करण्यात आले. त्यामुळे या ग्रुपवर येणाऱ्या श्रद्धांजलीच्या व नकारात्मक पोस्ट बंद झाल्या.

--

असे केले जाते समुपदेशन

सध्या चाकोरेकर शिक्षक ग्रुपमध्ये वातावरण तणावमुक्त करण्यासाठी चर्चा केली जाते. यापूर्वी पॉझिटिव्ह आलेले पण सध्या कोरोना मुक्त झालेले शिक्षक आत्माराम गायकवाड गुरुजी मनोरंजक व्हिडिओ बनवून वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत तर ह.भ.प. तुकाराम वाघमोडे गुरुजी आपल्या सुश्राव्य वाणीतून ऑडिओ बनवून सकारात्मक विचारांची पेरणी करत आहेत. मच्छिंद्र ननवरे गुरुजी स्वतः जोखीम घेऊन ॲडमिट पेशंटच्या भेटी घेऊन पेशंटमध्ये बरे होण्याची उमेद निर्माण करत आहेत.

----

क्वारंटाईन सेंटर तयार करणार

मोबाईलमुळे तरुण पिढी बिघडली अशी ओरड सगळीकडे असताना या शिक्षकांनी मोबाईलचा सदुपयोग करून गावात सकारात्मक वातावरण निर्मितीचा प्रयत्न चालवला आहे. ॲड. चंद्रकांत शिंदे व माजी सरपंच किरणआप्पा वाघमोडे आणि गावकरी शिक्षक गावातच क्वारंटाईन सेंटर तयार करण्याच्या विचारात आहेत.गावामध्ये रुग्णसंख्या वाढत असल्याने गावातच लसीकरण सुविधा निर्माण करण्यात यावी अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे व पाठपुरावा चालू आहे.

----