शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
6
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
7
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
8
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
9
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
10
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
11
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
12
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
13
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
14
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
15
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
16
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
17
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
18
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
19
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
20
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ

सामाजिक बांधिलकीची ठेवूनी जाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:20 IST

गुरुजी राबवताहेत तणाव मुक्ती अभियान संदीप लोणकर श्रीपूर : कोविडच्या काळात सर्वत्र श्रद्धांजलीच्या पोस्ट, फोटो, नकारात्मक बातम्या या बाबी ...

गुरुजी राबवताहेत तणाव मुक्ती अभियान

संदीप लोणकर

श्रीपूर : कोविडच्या काळात सर्वत्र श्रद्धांजलीच्या पोस्ट, फोटो, नकारात्मक बातम्या या बाबी गावकऱ्यांच्या मनामध्ये भीती, दहशत, मानसिक ताण निर्माण करण्यास कारणीभूत ठरत होत्या. अशावेळी पॉझिटिव्ह रुग्ण व त्यांचे नातेवाईक, सर्व गावकऱ्यांना या ताणतणावातून बाहेर काढून त्यांचे समुपदेशन करण्यासाठी कैलास गायकवाड सर सरसावले आहेत.

मूळ चाकोरे गावचे रहिवासी असलेले व सध्या अकलूज येथे कार्यरत असलेले कैलास गायकवाड गुरुजींनी ही कल्पना मांडली. इतर शिक्षकांनी लगेच सहमती देत या उपक्रमांमुळे गावातील वातावरण सकारात्मक होण्यास मदत होत आहे. चाकोरे (तालुका माळशिरस) हे गाव सध्या कोरोनाचा हॉटस्पॉट बनले आहे. अनेक व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. सध्या पंधरा ते सतरा व्यक्ती पॉझिटिव्ह असून, ते घरी विलगीकरणात आहेत. सहा ते आठ जण विविध हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. उजाडणारा दिवस कोणती बातमी घेऊन येतोय याचीच भीती प्रत्येकाच्या मनात दिसायला लागली होती.

या ग्रुपमध्ये बाळासाहेब शिंदे, गुरुनाथ स्वामी, एकनाथ कदम, दत्तात्रय टकले, हरी खरात, अर्जुन ननवरे, तात्याराम कुंभार,बाळासाहेब कुंभार, अमर गायकवाड, नाना वरकड, सचिन भोसले, विजय शिंदे, अजिनाथ शिंदे, विष्णू शिंदे, अभिजित बनकर,अनिल शिंदे, देविदास वरकड, ज्योतीराम भोसले, संतोष ढवळे हे सकारात्मक वातावरण तयार करण्यासाठी कार्य करीत आहेत.

आणि नकारात्मक पोस्ट बंद केल्या

गावात गावकऱ्यांचे दोन व्हॉट्‌सॲप ग्रुप आहेत. सरपंच अर्चना शिंदे व जि. प. सदस्या मंगल वाघमोडे यांच्याशी चर्चा करून गावकऱ्यांच्या दोन्ही व्हॉट्‌सॲप ग्रुपचे सेटिंग बदलून ओन्ली ॲडमिन कॅन सेन्ड मेसेजेस असे करण्यात आले. त्यामुळे या ग्रुपवर येणाऱ्या श्रद्धांजलीच्या व नकारात्मक पोस्ट बंद झाल्या.

--

असे केले जाते समुपदेशन

सध्या चाकोरेकर शिक्षक ग्रुपमध्ये वातावरण तणावमुक्त करण्यासाठी चर्चा केली जाते. यापूर्वी पॉझिटिव्ह आलेले पण सध्या कोरोना मुक्त झालेले शिक्षक आत्माराम गायकवाड गुरुजी मनोरंजक व्हिडिओ बनवून वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत तर ह.भ.प. तुकाराम वाघमोडे गुरुजी आपल्या सुश्राव्य वाणीतून ऑडिओ बनवून सकारात्मक विचारांची पेरणी करत आहेत. मच्छिंद्र ननवरे गुरुजी स्वतः जोखीम घेऊन ॲडमिट पेशंटच्या भेटी घेऊन पेशंटमध्ये बरे होण्याची उमेद निर्माण करत आहेत.

----

क्वारंटाईन सेंटर तयार करणार

मोबाईलमुळे तरुण पिढी बिघडली अशी ओरड सगळीकडे असताना या शिक्षकांनी मोबाईलचा सदुपयोग करून गावात सकारात्मक वातावरण निर्मितीचा प्रयत्न चालवला आहे. ॲड. चंद्रकांत शिंदे व माजी सरपंच किरणआप्पा वाघमोडे आणि गावकरी शिक्षक गावातच क्वारंटाईन सेंटर तयार करण्याच्या विचारात आहेत.गावामध्ये रुग्णसंख्या वाढत असल्याने गावातच लसीकरण सुविधा निर्माण करण्यात यावी अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे व पाठपुरावा चालू आहे.

----