शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

सामाजिक बांधिलकीची ठेवूनी जाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:20 IST

गुरुजी राबवताहेत तणाव मुक्ती अभियान संदीप लोणकर श्रीपूर : कोविडच्या काळात सर्वत्र श्रद्धांजलीच्या पोस्ट, फोटो, नकारात्मक बातम्या या बाबी ...

गुरुजी राबवताहेत तणाव मुक्ती अभियान

संदीप लोणकर

श्रीपूर : कोविडच्या काळात सर्वत्र श्रद्धांजलीच्या पोस्ट, फोटो, नकारात्मक बातम्या या बाबी गावकऱ्यांच्या मनामध्ये भीती, दहशत, मानसिक ताण निर्माण करण्यास कारणीभूत ठरत होत्या. अशावेळी पॉझिटिव्ह रुग्ण व त्यांचे नातेवाईक, सर्व गावकऱ्यांना या ताणतणावातून बाहेर काढून त्यांचे समुपदेशन करण्यासाठी कैलास गायकवाड सर सरसावले आहेत.

मूळ चाकोरे गावचे रहिवासी असलेले व सध्या अकलूज येथे कार्यरत असलेले कैलास गायकवाड गुरुजींनी ही कल्पना मांडली. इतर शिक्षकांनी लगेच सहमती देत या उपक्रमांमुळे गावातील वातावरण सकारात्मक होण्यास मदत होत आहे. चाकोरे (तालुका माळशिरस) हे गाव सध्या कोरोनाचा हॉटस्पॉट बनले आहे. अनेक व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. सध्या पंधरा ते सतरा व्यक्ती पॉझिटिव्ह असून, ते घरी विलगीकरणात आहेत. सहा ते आठ जण विविध हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. उजाडणारा दिवस कोणती बातमी घेऊन येतोय याचीच भीती प्रत्येकाच्या मनात दिसायला लागली होती.

या ग्रुपमध्ये बाळासाहेब शिंदे, गुरुनाथ स्वामी, एकनाथ कदम, दत्तात्रय टकले, हरी खरात, अर्जुन ननवरे, तात्याराम कुंभार,बाळासाहेब कुंभार, अमर गायकवाड, नाना वरकड, सचिन भोसले, विजय शिंदे, अजिनाथ शिंदे, विष्णू शिंदे, अभिजित बनकर,अनिल शिंदे, देविदास वरकड, ज्योतीराम भोसले, संतोष ढवळे हे सकारात्मक वातावरण तयार करण्यासाठी कार्य करीत आहेत.

आणि नकारात्मक पोस्ट बंद केल्या

गावात गावकऱ्यांचे दोन व्हॉट्‌सॲप ग्रुप आहेत. सरपंच अर्चना शिंदे व जि. प. सदस्या मंगल वाघमोडे यांच्याशी चर्चा करून गावकऱ्यांच्या दोन्ही व्हॉट्‌सॲप ग्रुपचे सेटिंग बदलून ओन्ली ॲडमिन कॅन सेन्ड मेसेजेस असे करण्यात आले. त्यामुळे या ग्रुपवर येणाऱ्या श्रद्धांजलीच्या व नकारात्मक पोस्ट बंद झाल्या.

--

असे केले जाते समुपदेशन

सध्या चाकोरेकर शिक्षक ग्रुपमध्ये वातावरण तणावमुक्त करण्यासाठी चर्चा केली जाते. यापूर्वी पॉझिटिव्ह आलेले पण सध्या कोरोना मुक्त झालेले शिक्षक आत्माराम गायकवाड गुरुजी मनोरंजक व्हिडिओ बनवून वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत तर ह.भ.प. तुकाराम वाघमोडे गुरुजी आपल्या सुश्राव्य वाणीतून ऑडिओ बनवून सकारात्मक विचारांची पेरणी करत आहेत. मच्छिंद्र ननवरे गुरुजी स्वतः जोखीम घेऊन ॲडमिट पेशंटच्या भेटी घेऊन पेशंटमध्ये बरे होण्याची उमेद निर्माण करत आहेत.

----

क्वारंटाईन सेंटर तयार करणार

मोबाईलमुळे तरुण पिढी बिघडली अशी ओरड सगळीकडे असताना या शिक्षकांनी मोबाईलचा सदुपयोग करून गावात सकारात्मक वातावरण निर्मितीचा प्रयत्न चालवला आहे. ॲड. चंद्रकांत शिंदे व माजी सरपंच किरणआप्पा वाघमोडे आणि गावकरी शिक्षक गावातच क्वारंटाईन सेंटर तयार करण्याच्या विचारात आहेत.गावामध्ये रुग्णसंख्या वाढत असल्याने गावातच लसीकरण सुविधा निर्माण करण्यात यावी अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे व पाठपुरावा चालू आहे.

----