शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

अबब ! गायीच्या पोटात निघाला १०० किलो कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 11:49 IST

तीन तास शस्त्रक्रिया, प्लास्टिकसह अनेक वस्तूंचा समावेश

ठळक मुद्दे शस्त्रक्रियेद्वारे पोटातून प्लास्टिक, खिळे, काचा अशा अनेक वस्तू बाहेरमृत्यूशय्येवर असलेल्या गायीला जीवदानशस्त्रक्रियेत चार पदर मिळून एकूण १०० टाके घालण्यात आले. 

सोलापूर : पूर्व भागातील जय संतोषी माता गोशाळेत कोंडवाड्यातून आणून सोडलेल्या गायीच्या पोटात १०० किलोचा कचरा निघाला आहे. तीन तास चाललेल्या शस्त्रक्रियेद्वारे पोटातून प्लास्टिक, खिळे, काचा अशा अनेक वस्तू बाहेर निघाल्यामुळे मृत्यूशय्येवर असलेल्या गायीला जीवदान मिळाले आहे.

महानगरपालिकेच्या कोंडवाड्यात बेवारस जनावरांना आणून ठेवले जाते. यामध्ये गायींचे प्रमाण मोठे असते. ठराविक कालावधीत मूळ मालकाने ओळख पटवून गायी न नेल्यास गोशाळेला दान करण्यात येतात. अशाच प्रकारातील पाच गायी २६ आॅगस्ट रोजी जय संतोषी माता गोशाळेला महापालिकेच्या वतीने देण्यात आल्या. पाचपैकी एक गाय गेल्या चार दिवसांपासून आजारी होती. बुधवारपासून गायीने हालचाल करणे बंद केले होते. 

डोळेही पांढरे झाले होते. काहीतरी गंभीर आजार झाल्याचे लक्षात आल्याने गोशाळा चालकाने डॉक्टरांना पाचारण केले. डॉ. विश्वजित बडगेरी आणि त्यांचे सहकारी डॉ. अतकर यांनी गायीला तपासून तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. शुक्रवारी शस्त्रक्रिया करण्याचे ठरले. परंतु सायंकाळी गायीची प्रकृती अधिकच खालावल्याने गुरुवारी सायंकाळी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. सायंकाळी ६.३० ते रात्री ९.३० या दरम्यान शस्त्रक्रिया करून जवळपास गायीच्या पोटातून १०० किलोचा कचरा काढण्यात आला. या शस्त्रक्रियेमुळे मृत्यूशय्येवर असलेल्या गायीला जीवनदान मिळाले आहे.

...तर चारा खात नाही- रस्त्यावर भटकणाºया बेवारस गायींना प्लास्टिक आणि तत्सम पदार्थ खाण्याची सवय लागलेली असते. अशा गायी सकस आहार म्हणजे चारा किंवा भुसा खात नाहीत. त्यामुळे गोशाळेत आणल्यावर अनेक वेळा उपाशी राहून त्यांच्यावर प्राण गमवायची वेळ येते, अशी माहिती डॉ. गाजूल यांनी दिली.

शस्त्रक्रियेत १०० टाके- गायीच्या पोटात खिळे, बांगड्या, पैशाची नाणी, प्लास्टिकच्या पिशव्या, इलेक्ट्रिक साहित्य, नारळाच्या वाट्या, पेन्सिल, खोडरबर अशा अनेक वस्तू आढळल्या. तीन तास चाललेल्या शस्त्रक्रियेत चार पदर मिळून एकूण १०० टाके घालण्यात आले. 

घरातील शिळे अन्न एका प्लास्टिकच्या पिशवीत एकत्र करून रस्त्यावर टाकले जाते. त्याच पिशवीत, बांगड्या, खिळे, नारळाच्या वाट्या आणि इतर सर्व प्रकारचा कचरा असतो. हे शिळे अन्न गाय पिशवीसह खाते. त्यामुळे पोटात कचरा साठतो. लोकांनी कचरा टाकताना मुक्या जनावरांच्या जीवाला धोका होऊ नये, यासाठी केवळ शिळे अन्न टाकावे.- डॉ. राजेंद्र गाजूल, चालक, जय संतोषी माता गोशाळा

टॅग्स :Solapurसोलापूरhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरcowगाय