शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

आषाढी वारीचा निर्णय म्हणे पुण्यात; तीर्थक्षेत्री पंढरपूरकर मात्र अंधारात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 12:07 IST

पंढरपूरचे अर्थकारण यात्रांवर अवलंबून; नियोजनात स्थानिकांचाही आवाज ऐकला जावा

ठळक मुद्दे पंढरपूर शहराचे अर्थकारण हे शहरात भरणाºया यात्रांवर अवलंबून चैत्रीनंतर आता आषाढी यात्रा रद्द झाल्यास त्याचा मोठा परिणामआता सर्वात मोठ्या आषाढी यात्रेबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे

पंढरपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हाधिकाºयांकडून पुढच्या दोन दिवसात पालखी सोहळ्याबाबतची भूमिका स्पष्ट केली जाणार आहे. हे होत असताना ज्या तीर्थक्षेत्र पंढरपूर शहरात यात्रा भरणार आहे, त्याठिकाणचे अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्याशीही चर्चा होणे अपेक्षित आहे; मात्र यात्रेसंदर्भातील निर्णय पुणे, सोलापुरात होणार अन् अंमलबजावणी होणार पंढरपूर शहरात... असा प्रकार यात्रा नियोजनात होत असल्याचे दिसून येत आहे.

राज्याची आध्यामिक राजधानी असणाºया पंढरपूर शहरात आषाढी, कार्तिकी यात्रा काळात लाखो भाविक पंढरीत येत असतात. त्यांच्या सेवा सुविधांसाठी शासन दरवर्षी करोडो रूपये खर्च करते. पंढरपूर शहरात स्वच्छतेसंदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठ्या प्रमाणात कामे हाती घेण्यात आली. स्वच्छतागृहे, रस्ते, पार्किंग स्थळ, घाट विकसित करण्यात आले. हे करीत असताना त्यासंदर्भात बैठक या विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर होऊन नियोजन करण्यात आले. निधी खर्च करण्यात आला. अजूनही विविध प्रकारची कामे सुरू आहेत. स्थानिकांच्या सूचनांचा तसेच इतर बाबींचा विचार करण्यात आला नाही; मात्र करोडो रूपये खर्च करण्यात आले. 

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर होणाºया आषाढी यात्रेसंदर्भात होणाºया बैठकीत स्थानिक पातळीवरील परिस्थिती तसेच यापूर्वीचा अनुभव तपासून येणाºया सूचनांचा विचार होणे अपेक्षित आहे. पंढरपूर शहराचे अर्थकारण हे शहरात भरणाºया यात्रांवर अवलंबून आहे. चैत्रीनंतर आता आषाढी यात्रा रद्द झाल्यास त्याचा मोठा परिणाम याठिकाणच्या नागरिकांवर होणार आहे.

‘त्या’ दुकानदार विक्रेत्यांना, धर्मशाळा, मठ चालविणाºयांना काय मदत होऊ शकते का? त्यांना आर्थिक आधार दिला जाऊ शकतो का? याबाबतही शासन पातळीवर विचार होणे स्थानिकांना अपेक्षित असल्याची चर्चा होत आहे.

दोन महिन्यांपासून टाळ मृदंगाचा आवाज नाही- टाळ मृदंगाचा आवाज.., हरिनामाचा जयघोष.., मठ, मंदिरात भाविकांची ये-जा... लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून पंढरपूर शहरात सर्व काही शांत आहे. चार यात्रांपैकी चैत्री यात्रा होऊ शकली नाही. आता सर्वात मोठ्या आषाढी यात्रेबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. 

आषाढी यात्रेबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. स्थानिकांच्या सूचना विचारात घ्यायला हव्यात. अनेकदा वरिष्ठ पातळीवर निर्णय घेताना हे होत नाही.  सध्या कोरोनाला हद्दपार करणे हे महत्त्वाचे असून, प्रशासकीय पातळीवर योग्य तो निर्णय होणे अपेक्षित आहे.- साधना भोसले, नगराध्यक्षा, पंढरपूर

आषाढी संदर्भात पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्यामध्ये चर्चा होऊन जे आदेश येतील त्याचे पालन केले जाईल. कोरोना व्हायरसच्या अनुषंगाने परिस्थिती कशी राहील त्यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. - सचिन ढोले, प्रांताधिकारी, पंढरपूर

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरAshadhi Ekadashiआषाढी एकादशी