शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

आषाढी वारी विशेष ; डॉ. सुमेध अंदूरकर वारकºयांच्या आरोग्याचा सेवेकरी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 15:06 IST

२००७ सालची गोष्ट. मी आळंदी ग्रामीण रुग्णालयाचा अधीक्षक म्हणून कार्यरत होतो. पहाटे दोन-अडीचची वेळ असेल. आळंदीच्या मंदिरात कीर्तन चालू असताना एक वारकरी बसल्या ठिकाणी कोसळला. मंदिराच्या चारही बाजूला राहुट्या होत्या. अ‍ॅम्ब्युलन्स जाणे शक्य नव्हते. इतर वारकºयांनी उचलून त्याला आळंदीच्या आरोग्य केंद्रात आणले. त्या वारकºयाचे नाव माहीत नव्हते, सोबत नातेवाईकही नव्हते. ...

२००७ सालची गोष्ट. मी आळंदी ग्रामीण रुग्णालयाचा अधीक्षक म्हणून कार्यरत होतो. पहाटे दोन-अडीचची वेळ असेल. आळंदीच्या मंदिरात कीर्तन चालू असताना एक वारकरी बसल्या ठिकाणी कोसळला. मंदिराच्या चारही बाजूला राहुट्या होत्या. अ‍ॅम्ब्युलन्स जाणे शक्य नव्हते. इतर वारकºयांनी उचलून त्याला आळंदीच्या आरोग्य केंद्रात आणले. त्या वारकºयाचे नाव माहीत नव्हते, सोबत नातेवाईकही नव्हते. तपासणी केल्यानंतर वारकºयाला हृदयविकाराचा धक्का बसल्याचे निष्पन्न झाले.

 प्रथमोपचार केल्यानंतर आम्ही त्याला घेऊन पुण्याला गेलो. तिथे गेल्यानंतर नातेवाईकांना माहिती देऊन बोलावून घेतले. असाच दुसरा प्रकार. रिंगणावेळी मानाचा घोडा घसरू नये म्हणून फरशीवर बारदाना टाकला जातो. घोडा पुढे गेला की तोच बारदाना उचलून पुढे टाकला जातो. हे करीत असताना एक वृद्ध वारकरी बारदान्यावरून घसरून पडला. त्याच्या मणक्याचे हाड मोडले. गर्दीतून वाट काढीत त्या वारकºयाला आरोग्य केंद्रात आणले आणि पुढील उपचारासाठी पुण्याला घेऊन जावे लागले...

 पण १० वर्षांपूर्वी आळंदीमध्ये केलेल्या कामाच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. आषाढीच्या वारीत आरोग्य विभागाला २४ तास काम करावे लागते. पण हे काम अनेकांच्या लक्षात येत नाही. या वर्षी मी सोलापूर जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून रुजू झालोय. पालखी मार्ग असो वा परिसरातील आरोग्य केंद्राचे कर्मचारी सेवा बजावून दमून जातात. पण मी माझ्या सर्व सहकाºयांना सांगितले आहे की, वारीमध्ये सहभागी झालेले लोक भाऊक असतात. त्यांना फक्त पंढरपूरचा विठ्ठल दिसतो. कामाचा कितीही ताण आला तरी त्यांच्याशी प्रेमाने वागा. एरव्ही आपण आरोग्य खात्याचे कर्मचारी असतो. 

आता आपण वारकºयांचे सेवेकरी होऊया. त्यांची वारी सुकर व्हावी, यासाठी त्यांच्या वेदनेवर फुंकर घालूया.वारीला इव्हेंट मॅनेजर नाही. पण वारीतील शिस्त ही शासकीय यंत्रणेला खूप काही शिकायला देणारी आहे. यावर्षीही आम्ही जिल्हा परिषदेसह सर्व यंत्रणांशी समन्वय ठेवून काम करीत आहोत. आरोग्य दूत ही संकल्पना वारकºयांसाठी खूप चांगली ठरत आहे. बाहेरून ४० जणांचे पथक ग्रामीण रुग्णालयांच्या सेवेत आले आहे. पंढरपूरच्या वाटेवर येणारे मरण चांगले मानले जाते. नदीपात्रात अपघातही होतात. अशा वेळी आरोग्य विभागाची भूमिका महत्त्वाची ठरते. हीच त्यांची वारी असते.शब्दांकन : राकेश कदम

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळाPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpurपंढरपूर