शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

आषाढी वारी विशेष ; डॉ. सुमेध अंदूरकर वारकºयांच्या आरोग्याचा सेवेकरी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 15:06 IST

२००७ सालची गोष्ट. मी आळंदी ग्रामीण रुग्णालयाचा अधीक्षक म्हणून कार्यरत होतो. पहाटे दोन-अडीचची वेळ असेल. आळंदीच्या मंदिरात कीर्तन चालू असताना एक वारकरी बसल्या ठिकाणी कोसळला. मंदिराच्या चारही बाजूला राहुट्या होत्या. अ‍ॅम्ब्युलन्स जाणे शक्य नव्हते. इतर वारकºयांनी उचलून त्याला आळंदीच्या आरोग्य केंद्रात आणले. त्या वारकºयाचे नाव माहीत नव्हते, सोबत नातेवाईकही नव्हते. ...

२००७ सालची गोष्ट. मी आळंदी ग्रामीण रुग्णालयाचा अधीक्षक म्हणून कार्यरत होतो. पहाटे दोन-अडीचची वेळ असेल. आळंदीच्या मंदिरात कीर्तन चालू असताना एक वारकरी बसल्या ठिकाणी कोसळला. मंदिराच्या चारही बाजूला राहुट्या होत्या. अ‍ॅम्ब्युलन्स जाणे शक्य नव्हते. इतर वारकºयांनी उचलून त्याला आळंदीच्या आरोग्य केंद्रात आणले. त्या वारकºयाचे नाव माहीत नव्हते, सोबत नातेवाईकही नव्हते. तपासणी केल्यानंतर वारकºयाला हृदयविकाराचा धक्का बसल्याचे निष्पन्न झाले.

 प्रथमोपचार केल्यानंतर आम्ही त्याला घेऊन पुण्याला गेलो. तिथे गेल्यानंतर नातेवाईकांना माहिती देऊन बोलावून घेतले. असाच दुसरा प्रकार. रिंगणावेळी मानाचा घोडा घसरू नये म्हणून फरशीवर बारदाना टाकला जातो. घोडा पुढे गेला की तोच बारदाना उचलून पुढे टाकला जातो. हे करीत असताना एक वृद्ध वारकरी बारदान्यावरून घसरून पडला. त्याच्या मणक्याचे हाड मोडले. गर्दीतून वाट काढीत त्या वारकºयाला आरोग्य केंद्रात आणले आणि पुढील उपचारासाठी पुण्याला घेऊन जावे लागले...

 पण १० वर्षांपूर्वी आळंदीमध्ये केलेल्या कामाच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. आषाढीच्या वारीत आरोग्य विभागाला २४ तास काम करावे लागते. पण हे काम अनेकांच्या लक्षात येत नाही. या वर्षी मी सोलापूर जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून रुजू झालोय. पालखी मार्ग असो वा परिसरातील आरोग्य केंद्राचे कर्मचारी सेवा बजावून दमून जातात. पण मी माझ्या सर्व सहकाºयांना सांगितले आहे की, वारीमध्ये सहभागी झालेले लोक भाऊक असतात. त्यांना फक्त पंढरपूरचा विठ्ठल दिसतो. कामाचा कितीही ताण आला तरी त्यांच्याशी प्रेमाने वागा. एरव्ही आपण आरोग्य खात्याचे कर्मचारी असतो. 

आता आपण वारकºयांचे सेवेकरी होऊया. त्यांची वारी सुकर व्हावी, यासाठी त्यांच्या वेदनेवर फुंकर घालूया.वारीला इव्हेंट मॅनेजर नाही. पण वारीतील शिस्त ही शासकीय यंत्रणेला खूप काही शिकायला देणारी आहे. यावर्षीही आम्ही जिल्हा परिषदेसह सर्व यंत्रणांशी समन्वय ठेवून काम करीत आहोत. आरोग्य दूत ही संकल्पना वारकºयांसाठी खूप चांगली ठरत आहे. बाहेरून ४० जणांचे पथक ग्रामीण रुग्णालयांच्या सेवेत आले आहे. पंढरपूरच्या वाटेवर येणारे मरण चांगले मानले जाते. नदीपात्रात अपघातही होतात. अशा वेळी आरोग्य विभागाची भूमिका महत्त्वाची ठरते. हीच त्यांची वारी असते.शब्दांकन : राकेश कदम

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळाPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpurपंढरपूर