शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

आषाढी वारी विशेष ; डॉ. सुमेध अंदूरकर वारकºयांच्या आरोग्याचा सेवेकरी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 15:06 IST

२००७ सालची गोष्ट. मी आळंदी ग्रामीण रुग्णालयाचा अधीक्षक म्हणून कार्यरत होतो. पहाटे दोन-अडीचची वेळ असेल. आळंदीच्या मंदिरात कीर्तन चालू असताना एक वारकरी बसल्या ठिकाणी कोसळला. मंदिराच्या चारही बाजूला राहुट्या होत्या. अ‍ॅम्ब्युलन्स जाणे शक्य नव्हते. इतर वारकºयांनी उचलून त्याला आळंदीच्या आरोग्य केंद्रात आणले. त्या वारकºयाचे नाव माहीत नव्हते, सोबत नातेवाईकही नव्हते. ...

२००७ सालची गोष्ट. मी आळंदी ग्रामीण रुग्णालयाचा अधीक्षक म्हणून कार्यरत होतो. पहाटे दोन-अडीचची वेळ असेल. आळंदीच्या मंदिरात कीर्तन चालू असताना एक वारकरी बसल्या ठिकाणी कोसळला. मंदिराच्या चारही बाजूला राहुट्या होत्या. अ‍ॅम्ब्युलन्स जाणे शक्य नव्हते. इतर वारकºयांनी उचलून त्याला आळंदीच्या आरोग्य केंद्रात आणले. त्या वारकºयाचे नाव माहीत नव्हते, सोबत नातेवाईकही नव्हते. तपासणी केल्यानंतर वारकºयाला हृदयविकाराचा धक्का बसल्याचे निष्पन्न झाले.

 प्रथमोपचार केल्यानंतर आम्ही त्याला घेऊन पुण्याला गेलो. तिथे गेल्यानंतर नातेवाईकांना माहिती देऊन बोलावून घेतले. असाच दुसरा प्रकार. रिंगणावेळी मानाचा घोडा घसरू नये म्हणून फरशीवर बारदाना टाकला जातो. घोडा पुढे गेला की तोच बारदाना उचलून पुढे टाकला जातो. हे करीत असताना एक वृद्ध वारकरी बारदान्यावरून घसरून पडला. त्याच्या मणक्याचे हाड मोडले. गर्दीतून वाट काढीत त्या वारकºयाला आरोग्य केंद्रात आणले आणि पुढील उपचारासाठी पुण्याला घेऊन जावे लागले...

 पण १० वर्षांपूर्वी आळंदीमध्ये केलेल्या कामाच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. आषाढीच्या वारीत आरोग्य विभागाला २४ तास काम करावे लागते. पण हे काम अनेकांच्या लक्षात येत नाही. या वर्षी मी सोलापूर जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून रुजू झालोय. पालखी मार्ग असो वा परिसरातील आरोग्य केंद्राचे कर्मचारी सेवा बजावून दमून जातात. पण मी माझ्या सर्व सहकाºयांना सांगितले आहे की, वारीमध्ये सहभागी झालेले लोक भाऊक असतात. त्यांना फक्त पंढरपूरचा विठ्ठल दिसतो. कामाचा कितीही ताण आला तरी त्यांच्याशी प्रेमाने वागा. एरव्ही आपण आरोग्य खात्याचे कर्मचारी असतो. 

आता आपण वारकºयांचे सेवेकरी होऊया. त्यांची वारी सुकर व्हावी, यासाठी त्यांच्या वेदनेवर फुंकर घालूया.वारीला इव्हेंट मॅनेजर नाही. पण वारीतील शिस्त ही शासकीय यंत्रणेला खूप काही शिकायला देणारी आहे. यावर्षीही आम्ही जिल्हा परिषदेसह सर्व यंत्रणांशी समन्वय ठेवून काम करीत आहोत. आरोग्य दूत ही संकल्पना वारकºयांसाठी खूप चांगली ठरत आहे. बाहेरून ४० जणांचे पथक ग्रामीण रुग्णालयांच्या सेवेत आले आहे. पंढरपूरच्या वाटेवर येणारे मरण चांगले मानले जाते. नदीपात्रात अपघातही होतात. अशा वेळी आरोग्य विभागाची भूमिका महत्त्वाची ठरते. हीच त्यांची वारी असते.शब्दांकन : राकेश कदम

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळाPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpurपंढरपूर