शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

आषाढी वारी विशेष ; जीवनात चैतन्य निर्माण करणारी आषाढी वारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 14:55 IST

वारकºयांशी संवाद : पहिल्या वारीच्या आठवणी आजही कायम

ठळक मुद्देवारीचे सुख इतके आहे की, आता वारी सोडू शकत नाही - प्रल्हाद कोरकेपहिल्या वारीचे सुख आजही ते शोधत आहेत - शिवाजी रणदिवेपहिल्या वारीने विठ्ठलभेटीची आस लागली - शिवाजी कोळी

गोपालकृष्ण मांडवकरमाळशिरस : पहिल्या वारीची आत्मानुभूती काय वर्णावी? ही अनुभूती आयुष्यभर आठवणीत राहणारी, संपूर्ण आयुष्याला नवी चेतना देणारी आणि आयुष्याच्या रहाटगाडग्यात चैतन्याची सरिता प्रवाहित करणारी!

वारीला आलेल्या लाखो भाविकांमध्ये अनेकांच्या वाºया मोजदादीच्या पलीकडे गेल्या आहेत. वारीचे हे कितवे वर्ष आहे, याची मोजदाद ठेवण्यापेक्षा वारी आली की अंगात चैतन्य संचारल्यासारखे वारीला निघणारे लाखो वारकरी यात सहभागी आहेत. असे असले तरी पहिल्या वारीच्या आठवणी सुखसागरातील लाटांसारख्या आजही वारकºयांच्या मनात उचंबळत आहेत.

‘लोकमत’ने काही वारकºयांना भेटून पहिल्या वारीच्या आठवणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सोलापूर जिल्ह्यातील चिकमहूद (ता. सांगोला) येथील शंकर बंडगर म्हणाले, पहिली वारी नक्की कोणत्या वर्षी केली होती, ते आठवत नाही; पण म्हातारीसोबत आलो होतो. तिचे बोट धरून फिरलो. वाटेवरून चाललो, बºयाच अडचणी आल्या होत्या. मुक्कामापासून ते जेवणापर्यंत अडचणी होत्या; पण पहिल्याच वारीने असा काही लळा लावला की, आतापर्यंत चुकलीच नाही.

तुकाराम जाधव यांचा अनुभव जरासा वेगळा आहे. चौदा वर्षांपूर्वी ते पहिल्यांदा वारीला आले. दिंडीसोबत राहून ती वारी करायची होती; पण दिंडीत कामच अधिक सांगितले जायचे. वारीच्या आनंदापेक्षा दिंडीतील कष्टामुळे मन खचले. कशीबशी वारी उरकली; पण त्यानंतर एकट्यानेच वारी करण्याचा निर्धार त्यांनी केला. गेली चौदा वर्षे आता ते सलग येतात.

विठुमाऊलीच्या सुखसागराचा आनंद घेतात.शिवाजी केरू रणदिवे हे साठ वर्षीय गृहस्थ मंगळवेढा तालुक्यातील आहेत. गेल्या ३५ वर्षांपासून ते पायी वारी करीत आहेत. पहिल्या वारीला गळ्यात माळ घातली. ती आयुष्यभरासाठी. पहिल्या वारीचे सुख आजही ते शोधत आहेत. या वारीने आपल्या आयुष्यात गोडी आणल्याचे भक्तिभावाने सांगतात. मिरज तालुक्यातील मौजे दिग्रज या गावचे शिवाजी कोळी हे साठ वर्षीय गृहस्थ. त्यांची ही दुसरी वारी पहिल्या वारीने विठ्ठलभेटीची आस लागली. आता वारी तोडायची नाही, असा त्यांचा संकल्प आहे, सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मुकुंद संभाजी फडतरे यांची ही पहिलीच वारी आहे. वारीच्या वाटेवर आनंदाला सीमाच नाही, असे ते म्हणतात. नांदेड जिल्ह्यातील सूरजचंद  आडे (वय ६५) यांची ही पाचवी वारी आहे. तर नांदेड जिल्ह्यातील इस्लामपूरचे नारायण कदम यांची ही आठवी वारी आहे. पहिल्या वारीच्या सुखाबद्दल वर्णन करताना ते गहिवरले. वारीला पायी चालण्याच्या सुखातच माऊली भेटीच्या आतुरतेचा आनंद ते अनुभवत आहेत.

 आता वारी सोडू वाटत नाही!लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील प्रल्हाद गणपत कोरके हे ६७ वर्षांचे गृहस्थ म्हणाले, एकदा तरी वारी अनुभवावी, असे ऐकले होते. आपली ही सहावी वारी आहे. मात्र वारीचे सुख इतके आहे की, आता वारी सोडू शकत नाही, अशी मनाची अवस्था झाली आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळाAshadhi Ekadashiआषाढी एकादशीPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर