शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
2
'बापजाद्यांची पायवाट मोडू नका!'; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे,अजित पवारांना आपुलकीचा सल्ला!
3
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
4
दिवाळीसाठी गावी निघाले अन् एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! 'थार'च्या धडकेत पती-पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू
5
Bihar Election 2025 India Alliance: हेमंत सोरेन यांचा इंडिया आघाडीला 'टाटा', 'या' जागा स्वबळावर लढणार
6
नाशिकमधील भयंकर घटना! डोक्यात फरशी, तोंडात बंदूक घालून युवकास ठार मारण्याचा प्रयत्न
7
Bihar Election: म्हशीवरून मिरवणूक आणि भरला उमेदवारी अर्ज, तेज प्रताप यादवांच्या उमेदवाराची चर्चा
8
'अदीना मशीद नाही, आदिनाथ मंदिर', खासदार युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा निशाणा; प्रकरण काय?
9
Bihar Election: ती चूक  भोवली, मतदानापूर्वीच एक जागा गमावली, बिहारमध्ये NDA ला मोठा धक्का
10
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
11
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
12
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार
13
कोर्टाची नोटीस नाकारणे भोवले! IAS सुजाता सौनिक यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट; २६ नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश
14
Bigg Boss 19: क्रिकेटपटू दीपक चहरच्या बहिणीवर संतापला सलमान खान, सारेच झाले अवाक्, कारण काय? 
15
Diwali Sale: ७०००mAh बॅटरी आणि ३ कॅमेरे असलेला फोन ६७९ रुपयांच्या ईएमआयमध्ये उपलब्ध
16
Viral Video: "दात आहेत की वेटलिफ्टिंग मशीन?" तरुणाचा व्हिडीओ पाहून नेटकरी शॉक!
17
२७ महिन्यांपासून पगार नाही, सुट्टी मागितल्यास..., वैतागलेल्या कर्मचाऱ्याने सरकारी ऑफिससमोरच संपवलं जीवन 
18
संसदेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ब्रह्मपुत्र अपार्टमेंटला भीषण आग, इथेच आहेत अनेक खासदारांची निवासस्थाने
19
सोमवती अमावस्या आणि लक्ष्मी पूजनाचा दुर्मिळ योग; 'या' ७ राशींच्या आयुष्याला मिळणार कलाटणी
20
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर हा फक्त ट्रेलर, आता पाकिस्तानची एक-एक इंच जमीन ब्रह्मोसच्या रेंजमध्ये..."

आषाढी वारी विशेष ; जीवनात चैतन्य निर्माण करणारी आषाढी वारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 14:55 IST

वारकºयांशी संवाद : पहिल्या वारीच्या आठवणी आजही कायम

ठळक मुद्देवारीचे सुख इतके आहे की, आता वारी सोडू शकत नाही - प्रल्हाद कोरकेपहिल्या वारीचे सुख आजही ते शोधत आहेत - शिवाजी रणदिवेपहिल्या वारीने विठ्ठलभेटीची आस लागली - शिवाजी कोळी

गोपालकृष्ण मांडवकरमाळशिरस : पहिल्या वारीची आत्मानुभूती काय वर्णावी? ही अनुभूती आयुष्यभर आठवणीत राहणारी, संपूर्ण आयुष्याला नवी चेतना देणारी आणि आयुष्याच्या रहाटगाडग्यात चैतन्याची सरिता प्रवाहित करणारी!

वारीला आलेल्या लाखो भाविकांमध्ये अनेकांच्या वाºया मोजदादीच्या पलीकडे गेल्या आहेत. वारीचे हे कितवे वर्ष आहे, याची मोजदाद ठेवण्यापेक्षा वारी आली की अंगात चैतन्य संचारल्यासारखे वारीला निघणारे लाखो वारकरी यात सहभागी आहेत. असे असले तरी पहिल्या वारीच्या आठवणी सुखसागरातील लाटांसारख्या आजही वारकºयांच्या मनात उचंबळत आहेत.

‘लोकमत’ने काही वारकºयांना भेटून पहिल्या वारीच्या आठवणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सोलापूर जिल्ह्यातील चिकमहूद (ता. सांगोला) येथील शंकर बंडगर म्हणाले, पहिली वारी नक्की कोणत्या वर्षी केली होती, ते आठवत नाही; पण म्हातारीसोबत आलो होतो. तिचे बोट धरून फिरलो. वाटेवरून चाललो, बºयाच अडचणी आल्या होत्या. मुक्कामापासून ते जेवणापर्यंत अडचणी होत्या; पण पहिल्याच वारीने असा काही लळा लावला की, आतापर्यंत चुकलीच नाही.

तुकाराम जाधव यांचा अनुभव जरासा वेगळा आहे. चौदा वर्षांपूर्वी ते पहिल्यांदा वारीला आले. दिंडीसोबत राहून ती वारी करायची होती; पण दिंडीत कामच अधिक सांगितले जायचे. वारीच्या आनंदापेक्षा दिंडीतील कष्टामुळे मन खचले. कशीबशी वारी उरकली; पण त्यानंतर एकट्यानेच वारी करण्याचा निर्धार त्यांनी केला. गेली चौदा वर्षे आता ते सलग येतात.

विठुमाऊलीच्या सुखसागराचा आनंद घेतात.शिवाजी केरू रणदिवे हे साठ वर्षीय गृहस्थ मंगळवेढा तालुक्यातील आहेत. गेल्या ३५ वर्षांपासून ते पायी वारी करीत आहेत. पहिल्या वारीला गळ्यात माळ घातली. ती आयुष्यभरासाठी. पहिल्या वारीचे सुख आजही ते शोधत आहेत. या वारीने आपल्या आयुष्यात गोडी आणल्याचे भक्तिभावाने सांगतात. मिरज तालुक्यातील मौजे दिग्रज या गावचे शिवाजी कोळी हे साठ वर्षीय गृहस्थ. त्यांची ही दुसरी वारी पहिल्या वारीने विठ्ठलभेटीची आस लागली. आता वारी तोडायची नाही, असा त्यांचा संकल्प आहे, सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मुकुंद संभाजी फडतरे यांची ही पहिलीच वारी आहे. वारीच्या वाटेवर आनंदाला सीमाच नाही, असे ते म्हणतात. नांदेड जिल्ह्यातील सूरजचंद  आडे (वय ६५) यांची ही पाचवी वारी आहे. तर नांदेड जिल्ह्यातील इस्लामपूरचे नारायण कदम यांची ही आठवी वारी आहे. पहिल्या वारीच्या सुखाबद्दल वर्णन करताना ते गहिवरले. वारीला पायी चालण्याच्या सुखातच माऊली भेटीच्या आतुरतेचा आनंद ते अनुभवत आहेत.

 आता वारी सोडू वाटत नाही!लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील प्रल्हाद गणपत कोरके हे ६७ वर्षांचे गृहस्थ म्हणाले, एकदा तरी वारी अनुभवावी, असे ऐकले होते. आपली ही सहावी वारी आहे. मात्र वारीचे सुख इतके आहे की, आता वारी सोडू शकत नाही, अशी मनाची अवस्था झाली आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळाAshadhi Ekadashiआषाढी एकादशीPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर