शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
2
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
3
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
4
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
5
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
6
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
7
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!
8
आठ महिन्यांत चौघांची हत्या; २० वर्षांच्या गँगस्टरचा एन्काऊंटरमध्ये खात्मा, VIDEO आला समोर
9
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
10
खासदार प्रिया सरोज आणि क्रिकेटर रिंकू सिंह यांच्या लग्नाची तारीख टळली; समोर आलं मोठं कारण...
11
धारावीतील २४९ पैकी १६१ बांधकामे पात्र, पहिली यादी जाहीर; अपात्र लोकांना ५ जुलैपर्यंत संधी
12
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
13
सोहेलसोबत पळून जाऊन केलेलं लग्न, मग २४ वर्षांनी का झाला घटस्फोट? सीमा सजदेहने सांगितलं खरं कारण
14
कसली भारी दिसत्येय 'सैराट'मधील परश्याचा मित्र 'लंगड्या'ची गर्लफ्रेंड, सौंदर्यात नायिकांनाही देते टक्कर!
15
ठाणे: आणखी २ इमारतींवर हातोडा, मुंब्रा-शीळच्या बेकायदा इमारतींमधील रहिवासी रस्त्यावर
16
मध्य पूर्वेतील तणाव, हिंडगनबर्गचे आरोप अन् धारावी प्रकल्प; गौतम अदानी स्पष्टच बोलले
17
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
18
इराण-इस्रायल युद्धबंदीमुळे बाजार 'रॉकेट'; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
19
कोण आहे अलीफा अहमद?; पती डॉक्टर तर स्वत: TCS मध्ये करत होती नोकरी; आता बनल्या आमदार
20
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?

दोन एकर डाळिंबाची बाग जळून खाक; शेतकऱ्याचे ६ लाख रुपयांचे नुकसान 

By रेवणसिद्ध जवळेकर | Updated: March 25, 2023 16:47 IST

शेतकऱ्याचे ६ लाख रुपयांचे नुकसान 

रेवणसिद्ध जवळेकर

मंगळवेढा - महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे डाळिंब बागेतून गेलेल्या विद्युत खांबावरील तारांचे घर्षण होऊन गणेशवाडी  (ता.मंगळवेढा) येथील एका शेतकऱ्याची लाखो रुपयांचे उत्पन्न देणारी डाळिंब बाग , ठिबक सिंचन पाईप जळुन खाक झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास घडली. यामुळे सदरील शेतकरी  पूर्णतः रस्त्यावर आला असून त्याच्या डोळ्यादेखत त्याचे उपजीविकेचे साधन जळत असतांना त्याना  व त्याच्या कुटुंबियांना आश्रु अनावर झाले होते.   

आनंद दामू गुंगे  यांची  गणेशवाडी शिवारात गट नंबर १०२ /२/अ मध्ये दोन एकर डाळिंब शेती असुन यात ६००च्या आसपास झाडांची फळाला लागलेली डाळिंब बाग आहे. याच शेतात हायवेवरील लाईन शिफ्ट केली असून यावरील जम्प तुटलेला होता येथे लग्ज घालण्यात आला नव्हता . तारेचा पीळ दिला होता त्यामुळे  वारंवार घर्षण होऊन ठिणग्या पडत होत्या  याबाबत  महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना बदलण्याबाबत सांगण्यात आले होते. मात्र याकडे दुर्लक्ष केले गेले. शुक्रवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किट होऊन ठिणग्या पडून  सर्वच्या सर्व ६०० डाळिंब झाडे जळून खाक झाली.तेच ठिबक सिंचन पाईप  जळून खाक झाले आहेत. डाळिंब बाग जोपासण्यासाठी शेतकरी गुंगे व त्यांच्या कुटुंबियांनी खूप मेहनत केली होती. उन्हा-तान्हात कष्ट तर केलेच शिवाय झाडा़ना फळधारणा व्हावी म्हणून रासायनिक खते व औषधासाठी  मोठा खर्च केला होता. त्यामुळे त्यांचे खूप मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. बऱ्याच ठिकाणी महावितरण कंपनीच्या विद्युत खांबावरील तार खूप जीर्ण झाल्या असून ते केव्हाही तुटतात. एकत्र जमा होतात. त्यामुळे ताराखाली असलेला शेतकऱ्यांची शेती जळून जाते.  मंगळवेढा नगरपालिका अग्निशमक दलाने तत्काळ बोलवून सदरचे आग विझवण्याचा प्रयत्न केला असून जळालेल्या डाळिंब बागेची नुकसान भरपाई त्वरित मिळावी अशी मागणी आनंद गुगे यांनी महावितरण उपकार्यकारी अभियंता यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे. तलाठी यांनी नुकसानीचा पंचनामा केला आहे मात्र महावितरण अधिकारी अद्याप इकडे फिरकले नाहीत.

शॉर्टसर्किट मुळे माझी दोन एकर डाळिंब बाग व ठिबक सिंचन सह अन्य साहित्य जळून सहा लाखाचे नुकसान झाले आहे. महावितरणकडून मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे तात्काळ नुकसानीचा पंचनामा करून महावितरणने नुकसान भरपाई द्यावी   आनंद गुंगे , शेतकरी 

 

टॅग्स :FarmerशेतकरीSolapurसोलापूर