शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
2
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
3
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
4
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
5
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
6
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
7
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
8
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
9
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
10
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
11
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
12
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
13
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
14
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
15
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
16
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
17
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
18
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
19
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा

दोन एकर डाळिंबाची बाग जळून खाक; शेतकऱ्याचे ६ लाख रुपयांचे नुकसान 

By रेवणसिद्ध जवळेकर | Updated: March 25, 2023 16:47 IST

शेतकऱ्याचे ६ लाख रुपयांचे नुकसान 

रेवणसिद्ध जवळेकर

मंगळवेढा - महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे डाळिंब बागेतून गेलेल्या विद्युत खांबावरील तारांचे घर्षण होऊन गणेशवाडी  (ता.मंगळवेढा) येथील एका शेतकऱ्याची लाखो रुपयांचे उत्पन्न देणारी डाळिंब बाग , ठिबक सिंचन पाईप जळुन खाक झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास घडली. यामुळे सदरील शेतकरी  पूर्णतः रस्त्यावर आला असून त्याच्या डोळ्यादेखत त्याचे उपजीविकेचे साधन जळत असतांना त्याना  व त्याच्या कुटुंबियांना आश्रु अनावर झाले होते.   

आनंद दामू गुंगे  यांची  गणेशवाडी शिवारात गट नंबर १०२ /२/अ मध्ये दोन एकर डाळिंब शेती असुन यात ६००च्या आसपास झाडांची फळाला लागलेली डाळिंब बाग आहे. याच शेतात हायवेवरील लाईन शिफ्ट केली असून यावरील जम्प तुटलेला होता येथे लग्ज घालण्यात आला नव्हता . तारेचा पीळ दिला होता त्यामुळे  वारंवार घर्षण होऊन ठिणग्या पडत होत्या  याबाबत  महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना बदलण्याबाबत सांगण्यात आले होते. मात्र याकडे दुर्लक्ष केले गेले. शुक्रवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किट होऊन ठिणग्या पडून  सर्वच्या सर्व ६०० डाळिंब झाडे जळून खाक झाली.तेच ठिबक सिंचन पाईप  जळून खाक झाले आहेत. डाळिंब बाग जोपासण्यासाठी शेतकरी गुंगे व त्यांच्या कुटुंबियांनी खूप मेहनत केली होती. उन्हा-तान्हात कष्ट तर केलेच शिवाय झाडा़ना फळधारणा व्हावी म्हणून रासायनिक खते व औषधासाठी  मोठा खर्च केला होता. त्यामुळे त्यांचे खूप मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. बऱ्याच ठिकाणी महावितरण कंपनीच्या विद्युत खांबावरील तार खूप जीर्ण झाल्या असून ते केव्हाही तुटतात. एकत्र जमा होतात. त्यामुळे ताराखाली असलेला शेतकऱ्यांची शेती जळून जाते.  मंगळवेढा नगरपालिका अग्निशमक दलाने तत्काळ बोलवून सदरचे आग विझवण्याचा प्रयत्न केला असून जळालेल्या डाळिंब बागेची नुकसान भरपाई त्वरित मिळावी अशी मागणी आनंद गुगे यांनी महावितरण उपकार्यकारी अभियंता यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे. तलाठी यांनी नुकसानीचा पंचनामा केला आहे मात्र महावितरण अधिकारी अद्याप इकडे फिरकले नाहीत.

शॉर्टसर्किट मुळे माझी दोन एकर डाळिंब बाग व ठिबक सिंचन सह अन्य साहित्य जळून सहा लाखाचे नुकसान झाले आहे. महावितरणकडून मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे तात्काळ नुकसानीचा पंचनामा करून महावितरणने नुकसान भरपाई द्यावी   आनंद गुंगे , शेतकरी 

 

टॅग्स :FarmerशेतकरीSolapurसोलापूर