शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
3
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
4
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
5
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
6
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
7
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
8
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
9
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
10
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
11
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
12
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
13
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
14
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
15
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
16
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
17
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
18
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
19
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
20
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

मोठी बातमी! तब्बल १० हजार वाहनधारकांनी केले वेग मर्यादेचे उल्लंघन; दहा महिन्यांत १० कोटींचा दंड

By appasaheb.patil | Updated: December 2, 2022 16:07 IST

रस्ते अपघाताला आळा बसावा यासाठी शासनाकडून प्रवासी वाहनांना ‘ स्पीड लॉक ’ बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे.

सोलापूर -

रस्ते अपघाताला आळा बसावा यासाठी शासनाकडून प्रवासी वाहनांना ‘ स्पीड लॉक ’ बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र अनेक वाहनांमध्ये हे बसविले गेले नाही. बसविलेल्या वाहनांमध्ये काही वाहनधारकांनी छेडछाड केली आहे. दरम्यान, स्पीड लॉक न बसविणे व छेडछाड केल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याचे उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून सांगण्यात आले. ज्या वाहनांनी ‘ स्पीड लॉक ’ बसवले नाही अशा वाहनांनी त्वरित ‘ स्पीड लॉक ’ बसवून घ्यावे अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे असेही आरटीओ प्रशासनाने कळविले आहे.दरम्यान, मागील दहा महिन्यात सोलापूर जिल्ह्यातील दहा हजार वाहनधारकांनी वेग मर्यादेचे उल्लंघन केले असून त्यांना दहा कोटी रुपयांचा दंड ठोठवण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेने दिली.प्रवासी वाहनात ‘ स्पीड लॉक ’ आवश्यकवेगात गाडी चालविल्याने अपघाताची शक्यता दाट असते. अनेक वाहनचालक वेगात वाहन चालवितात परिणामी अपघात होतो, त्यात अनेकांना जीव गमवावा लागतो. यासाठी वाहतूक नियमांचे पालन करून वाहने मर्यादेपेक्षा जास्त वेगाने चालवू नये. प्रवासी वाहनात ‘ स्पीड लॉक ’ लावणे आवश्यक आहे.१० हजार वाहनांना २ कोटींचा ठोठावला दंडभरधाव वेगात वाहने चालविल्याने सोलापूर शहर व जिल्ह्याच्या हद्दीत दररोज अनेक अपघात होतात. मागील दहा महिन्यांत सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या वाहतूक शाखेने ९ हजार ४७० वाहनांना वेग मर्यादेचे उल्लघंन केल्याप्रकरणी १ कोटी ८८ लाख ५८ हजार ५०० रूपयांचा दंड ठोठावला असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पाेलिस निरीक्षक महेश स्वामी यांनी लोकमतशी बोलताना दिली.

तर परवाना १२० दिवसांपर्यंत निलंबित होते...विना परवाना चोरटी प्रवासी वाहतूक केल्यास अथवा आसन क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक केल्यास कलम ६६/१९२-अ अन्वये न्यायालयीन कारवाई होऊन रुपये ५ हजारापर्यंत दंड होऊ शकतो. तसेच वाहनाचे रजिस्ट्रेशन १२० दिवसांपर्यंत निलंबित केले जाऊ शकते. अशा प्रवासी वाहतुकीस विम्याचे संरक्षण नसते.

टॅग्स :Solapurसोलापूर