शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

माऊलीच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन

By admin | Updated: July 9, 2016 18:21 IST

हरिनामाचा जयघोष करत गेले दहा दिवस वाटचाल करणा-या संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखी सोहळ्याने शनिवारी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला

ऑनलाइन लोकमत - 
सोलापूर, दि. 09 - भागवत धर्माची पताका उंचावत अन अखंड हरिनामाचा जयघोष करत गेले दहा दिवस वाटचाल करणा-या संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखी सोहळ्याने शनिवारी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. पालकमंत्री विजयकुमार देशमुख व कॅबिनेट मंत्री सुभाष देशमुख यांनी धर्मपुरी येथे पालखीचे स्वागत केले.
 
३५० दिंड्या, दोन अश्व, चांदीचा रथ, नगारखाना असा वैभवी लवाजमा आज पालखी येणार म्हणून स्वागताला सोलापूर जिल्हा सज्ज होता. धर्मपुरी येथे स्वागत कमान उभारण्यात आली होती. रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. राजश्री जुन्नरकरसह स्थानिक कलाकारांनी काढलेल्या रांगोळ्या मनमोहक होत्या. स्वच्छता दूत व कलापथकाची तुफान बॅटींग सुरू होती़ माऊलीच्या आगमनाच्या प्रतिक्षेत असलेल्या भक्तांसाठी तो एक करमणुकीची मेजवानी होती. पालखीच्या स्वागतासाठी आलेले जिल्हाधिकारी रणजितकुमार,  जि़ प अध्यक्षा जयमाला गायकवाड, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा देसाई, आमदार हणमंत डोळस, पोलीस अधिक्षक एस़ विरेश प्रभू, प्रभारी सीईओ पोपट बनसोडे, भाजपा जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, सचिन कल्याणशेट्टी, आ़ प्रशांत परिचारक आदी विविध विभागाचे प्रमुख, राजकीय मंडळी उपस्थित होते.
 
सकाळपासूनच बिगर क्रमांकाच्या दिंड्या पुढे येवून कॅनॉलवर जमल्या होत्या.  सकाळी १०.३० वाजता माऊलीच्या रथापुढील चौघडा आला तेव्हा अवघ्या मंडपाचे लक्ष तिकडे गेले. चौघडया पाठोपाठ २७ नंबर दिंडी त्यापाठोपाठ दोन्ही अश्व येताच अवघे मान्यवर दोन्ही अश्वासमोर नतमस्तक झाले़ दोन्ही अश्वांचे हार घालून स्वागत झाल्यानंतर एकेक करून २६ दिंड्या पुढे गेल्यानंतर माऊलीच्या चांदीचा रथ आला. रथामध्ये विराजमान माऊलीच्या पादुकावर नतमस्तक होत सर्व मान्यवरांनी वैष्णवी सोहळ्याचे स्वागत केले.
 
आज सकाळपासूनच पावसाने पूर्णत विश्रांती दिली असली तरी ढगाळ वातावरणात वाटचाल चांगली झाली. सकाळच्या विसाव्याला साधुबुवाच्या ओढ्याजवळची न्याहरी उरकून दुपारच्या भोजनाला सोहळा धर्मपुरी बंगला येथे विसावला. शिखर शिंगणापूरच्या डोंगरावरून येणारे गार वारे झेलत आणि शिवशंभुनी आळवणी करत वारकºयांनी दुपारची वाटचाल केली.
शिंगणापूर फाटा येथील विश्रांती वगळता आज दुपारनंतर शंभूमहादेवाचे कापडियाचे अभंग ऐकायला मिळाले. तिन्ही सांजेला सोहळा नातेपुते नगरात दाखल होताच नातेपुते करांनी माऊलीचे हर्षभरे स्वागत केले.
 
रिंगण पुरंदावडे येथे
माऊलीच्या पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण रविवारी दुपारी सदाशिवनगरऐवजी पुरंदावडे येथील नवीन जागी होणार आहे.  मांडवे ओढ्यावर दुपारचे भोजन उरकून दुपारी सोहळा माळशिरसकडे रवाना होईल.
आमच्या घरातच वारकरी परंपरा आहे़ कालच माझा मंत्री मंडळात समावेश झाला आणि आज मला माऊलीचे स्वागत घरी न जाता करण्याची संधी मिळाली़ मुंबईहुन मी थेट वारकºयांच्या चरणी लीन होण्यासाठी आलो हे मी माझे भाग्यच समजतो़
-सुभाष देशमुख, कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्य़
 
 
रिंगणावेळी पोलिसांना सहकार्य करा
माऊलीच्या सोहळ्यातील रिंगणाचा सोहळा बघण्यासारखा असतो़ मात्र प्रेक्षकांनी वारकºयांना त्रास होणार नाही अशा ठिकाणी बसावे व पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन राजाभाऊ चोपदार यांनी केले. रिंगणाच्या ठिकाणी पालखी, पतकाधारी आणि दिंडीकरी यांच्या विशिष्ट जागा असतात. प्रेक्षकांसाठी विशिष्ट जागा असतात़ प्रेक्षकांनी प्रेक्षकांच्या जागेत बसून रिंगण पहावे म्हणजे पोलिसांवरचा ताण कमी होईल व रिंगण परंपरेप्रमाणे होईल़ रिंगणात अश्व उधळण्याचीही भीती असते़ तेव्हा सावध रहावे असं राजाभाऊ चोपदार बोलले आहेत.
 
रिंगण सोहळ्याची मेजवानी
सोलापूर जिल्ह्यात उदयापासून प्रेक्षकांना रिंगणाची मेजवानीच आहे. रविवारी पुरंदावडेला पहिले रिंगण झाल्यानंतर सोमवारी खूडूस पाटीला तर मंगळवारी ठाकूरबुवाची समाधी उघडेवाडी येथे गोल रिंगण होणार आहे.