शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

रांगेत उभा राहणाºया मतदारांना बसण्याची व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 14:21 IST

मतदान केंद्रावर सुविधा; निवडणूक केंद्रांवर प्रथमच दिसणार ‘मदतनीस केंद्र’ फलक

ठळक मुद्देतीन-चार मतदान केंद्रे असलेल्या इमारतीत एक खोली मदतनीस केंद्र(हेल्प डेस्क) केले जाणारमहिला मतदारांच्या कडेवर मुल असेल तर अशा मुलांसाठी तात्पुरते पाळणाघर तयार करण्यात येणारदिव्यांग व्यक्तीला मतदान करण्यासाठी व्हीलचेअरचा वापर करण्यासाठी सामाजिक संस्था किंवा शासनाने दिलेल्या तीनचाकी सायकलीचा वापर केला जाणार

अरुण बारसकर

सोलापूर : दिव्यांगांसाठी व्हीलचेअर व मतदान केंद्रापर्यंत मदतीला शालेय विद्यार्थी..कर्मचारी व मतदार राजासाठी पिण्याचे शुद्ध पाणी..मतदारांना रांगेत उभा राहण्याची वेळ आली तर डेस्क किंवा बसण्याची सोय.. तर कडेवर मुले घेऊन येणाºया महिलांच्या मदतीला अंगणवाडी किंवा आशाताई़ या केल्या जाणार आहेत मतदान केंद्रांवर सुविधा. लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्रालगतच्या एका खोलीला ‘मदतनीस केंद्र’(हेल्प डेस्क) चा फलक व त्यात या सुविधा प्रथमच पुरविल्या जाणार आहेत.

जानेवारीपासूनच लोकसभा निवडणुकीची तयारी प्रशासन पातळीवर सुरू आहे. मतदार याद्यांपासून मतदान करुन घेण्याचे प्रशिक्षण हे काही नवे नाही, मात्र मतदान केंद्रांवरील सुविधांबाबतच्या सूचना या नवीन आहेत. मतदान केंद्रांवरील कर्मचारी व मतदारांसाठी सुविधा देण्याबाबतच्या मिळालेल्या सूचनेनुसार सहायक निवडणूक अधिकाºयांनी शहरात बुथस्तरावर तर ग्रामीण भागात तलाठ्यांना सूचना दिल्या आहेत. निवडणूक आयोगाने यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचाºयांपासून मतदार राजाचीही काळजी घेतल्याचे यावरुन दिसत आहे. 

दिव्यांग व्यक्तीला मतदान करण्यासाठी व्हीलचेअरचा वापर करण्यासाठी सामाजिक संस्था किंवा शासनाने दिलेल्या तीनचाकी सायकलीचा वापर केला जाणार आहे. याला कोणतेही मूल्य दिले जाणार नाही, मात्र मोफत सायकल उपलब्ध झाली नाही तर भाडेतत्वावर घेण्याच्या सूचना तलाठ्याला दिल्या आहेत. दिव्यांग मतदाराला मतदानासाठी मदत करण्यासाठी शालेय (शक्यतो एन.सी.सी.) विद्यार्थ्यांची मदत घेतली जाणार आहे. माध्यमिक शाळेच्या मुलांची नावे अगोदरच तलाठ्यांनी कळवायची आहेत. या मुलांनी स्वयंसेवक म्हणून काम करावयाचे असून, त्यांना केवळ फूड पाकीट दिले जाणार आहे.

तीन-चार मतदान केंद्रे असलेल्या इमारतीत एक खोली मदतनीस केंद्र(हेल्प डेस्क) केले जाणार आहे. या ठिकाणी पिण्याचे पाणी, रांगेत उभा राहावे लागत असेल तर बसण्याची व्यवस्था केली जाणार आहे. यासाठी तलाठ्यांनी जारवाल्यांचे संपर्क नंबर घेतले आहेत. महिला मतदारांच्या कडेवर मुल असेल तर अशा मुलांसाठी तात्पुरते पाळणाघर तयार करण्यात येणार असून, त्या ठिकाणी अंगणवाडी सेविका किंवा आशाताईची नियुक्ती केली जाणार आहे. या ताईला मानधन दिले जाणार आहे. 

जेवणाची काळजीही घेतली जातेयआजवर ग्रामीण भागात तर राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून जेवणाची व्यवस्था केली जात असे. परंतु या निवडणुकीसाठी कर्मचाºयांच्या जेवणाची काळजी घेण्यात आली आहे. निवडणूक कर्मचाºयांना विशेष भत्ता दिला जातो. त्यातूनच हा खर्च भागवायचा असून, त्यासाठी ग्रामीण भागात महिला बचत गटांवर जबाबदारी सोपवली आहे. शहरी भागात मतदान केंद्राच्या जवळच्या दोन खानावळीचे संपर्क क्रमांक घेण्यात आले असून, त्या ठिकाणाहून जेवण मागविण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsolapur-pcसोलापूरmadha-pcमाढाElectionनिवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग