शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

रांगेत उभा राहणाºया मतदारांना बसण्याची व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 14:21 IST

मतदान केंद्रावर सुविधा; निवडणूक केंद्रांवर प्रथमच दिसणार ‘मदतनीस केंद्र’ फलक

ठळक मुद्देतीन-चार मतदान केंद्रे असलेल्या इमारतीत एक खोली मदतनीस केंद्र(हेल्प डेस्क) केले जाणारमहिला मतदारांच्या कडेवर मुल असेल तर अशा मुलांसाठी तात्पुरते पाळणाघर तयार करण्यात येणारदिव्यांग व्यक्तीला मतदान करण्यासाठी व्हीलचेअरचा वापर करण्यासाठी सामाजिक संस्था किंवा शासनाने दिलेल्या तीनचाकी सायकलीचा वापर केला जाणार

अरुण बारसकर

सोलापूर : दिव्यांगांसाठी व्हीलचेअर व मतदान केंद्रापर्यंत मदतीला शालेय विद्यार्थी..कर्मचारी व मतदार राजासाठी पिण्याचे शुद्ध पाणी..मतदारांना रांगेत उभा राहण्याची वेळ आली तर डेस्क किंवा बसण्याची सोय.. तर कडेवर मुले घेऊन येणाºया महिलांच्या मदतीला अंगणवाडी किंवा आशाताई़ या केल्या जाणार आहेत मतदान केंद्रांवर सुविधा. लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्रालगतच्या एका खोलीला ‘मदतनीस केंद्र’(हेल्प डेस्क) चा फलक व त्यात या सुविधा प्रथमच पुरविल्या जाणार आहेत.

जानेवारीपासूनच लोकसभा निवडणुकीची तयारी प्रशासन पातळीवर सुरू आहे. मतदार याद्यांपासून मतदान करुन घेण्याचे प्रशिक्षण हे काही नवे नाही, मात्र मतदान केंद्रांवरील सुविधांबाबतच्या सूचना या नवीन आहेत. मतदान केंद्रांवरील कर्मचारी व मतदारांसाठी सुविधा देण्याबाबतच्या मिळालेल्या सूचनेनुसार सहायक निवडणूक अधिकाºयांनी शहरात बुथस्तरावर तर ग्रामीण भागात तलाठ्यांना सूचना दिल्या आहेत. निवडणूक आयोगाने यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचाºयांपासून मतदार राजाचीही काळजी घेतल्याचे यावरुन दिसत आहे. 

दिव्यांग व्यक्तीला मतदान करण्यासाठी व्हीलचेअरचा वापर करण्यासाठी सामाजिक संस्था किंवा शासनाने दिलेल्या तीनचाकी सायकलीचा वापर केला जाणार आहे. याला कोणतेही मूल्य दिले जाणार नाही, मात्र मोफत सायकल उपलब्ध झाली नाही तर भाडेतत्वावर घेण्याच्या सूचना तलाठ्याला दिल्या आहेत. दिव्यांग मतदाराला मतदानासाठी मदत करण्यासाठी शालेय (शक्यतो एन.सी.सी.) विद्यार्थ्यांची मदत घेतली जाणार आहे. माध्यमिक शाळेच्या मुलांची नावे अगोदरच तलाठ्यांनी कळवायची आहेत. या मुलांनी स्वयंसेवक म्हणून काम करावयाचे असून, त्यांना केवळ फूड पाकीट दिले जाणार आहे.

तीन-चार मतदान केंद्रे असलेल्या इमारतीत एक खोली मदतनीस केंद्र(हेल्प डेस्क) केले जाणार आहे. या ठिकाणी पिण्याचे पाणी, रांगेत उभा राहावे लागत असेल तर बसण्याची व्यवस्था केली जाणार आहे. यासाठी तलाठ्यांनी जारवाल्यांचे संपर्क नंबर घेतले आहेत. महिला मतदारांच्या कडेवर मुल असेल तर अशा मुलांसाठी तात्पुरते पाळणाघर तयार करण्यात येणार असून, त्या ठिकाणी अंगणवाडी सेविका किंवा आशाताईची नियुक्ती केली जाणार आहे. या ताईला मानधन दिले जाणार आहे. 

जेवणाची काळजीही घेतली जातेयआजवर ग्रामीण भागात तर राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून जेवणाची व्यवस्था केली जात असे. परंतु या निवडणुकीसाठी कर्मचाºयांच्या जेवणाची काळजी घेण्यात आली आहे. निवडणूक कर्मचाºयांना विशेष भत्ता दिला जातो. त्यातूनच हा खर्च भागवायचा असून, त्यासाठी ग्रामीण भागात महिला बचत गटांवर जबाबदारी सोपवली आहे. शहरी भागात मतदान केंद्राच्या जवळच्या दोन खानावळीचे संपर्क क्रमांक घेण्यात आले असून, त्या ठिकाणाहून जेवण मागविण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsolapur-pcसोलापूरmadha-pcमाढाElectionनिवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग