शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
2
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
3
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
4
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
5
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
6
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
7
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
8
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
9
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
10
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
11
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
12
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
13
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
14
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
15
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
16
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
17
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
18
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
19
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
20
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे

चैत्री यात्रेनिमित्त ११०० पोलिसांचा बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:23 IST

चैत्री यात्रेला अंदाजे ३ ते ४ लाख भाविक महाराष्ट्र व इतर राज्यातून येतात. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे ...

चैत्री यात्रेला अंदाजे ३ ते ४ लाख भाविक महाराष्ट्र व इतर राज्यातून येतात. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे राज्य शासनाने मंदिर उघडण्यास व यात्रेस बंदी घातली आहे. अशा पार्श्वभूमीवर एवढ्या मोठ्या प्रमाणावर पंढरपुरात भाविक आले तर, कोरोनाचा अधिक संसर्ग होऊ शकतो. ही बाब विचारात घेऊन मंदिर समितीने चैत्री यात्रा प्रतीकात्मक स्वरुपात करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या कालावधीत विठ्ठलाचे सर्व नित्योपचार परंपरेनुसार सुरू आहेत. त्यामुळे प्रतिवर्षाप्रमाणे परंपरेनुसार येणाऱ्या सर्व दिंड्या व सर्व पायी येणाऱ्या वारकरी भाविकांनी यात्रा रद्द झाली असल्याने कृपया कोणीही पंढरपूरला येऊ नये, असे आवाहन श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने करण्यात येत आहे.

त्याचबरोबर चैत्री यात्रेनिमित्त गर्दी हाेऊ नये यासाठी ११०० जणांचा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. यामध्ये ५०० पोलीस कर्मचारी, ५०० होमगार्ड, एसआरपी कंपनी, ३ उपविभागीय पोलीस अधिकारी, ५ पोलीस निरीक्षक, ५० सहाय्यक पाेलीस निरीक्षक, १५ महिला सहाय्यक पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे. हा पोलीस बंदोबस्त २० एप्रिल ते २४ एप्रिलपर्यंत राहणार असल्याचे उपविभागीय पाेलीस अधिकारी विक्रम कदम यांनी सांगितले.